
Bank Merger Plan : भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय यांच्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलयाबाबत चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. देशाच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी 'जागतिक दर्जाच्या' बँका तयार करण्याचा उद्देश असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. "देशाला मोठ्या बँकांची गरज आहे, ज्या जागतिक स्तरावर काम करतील आणि ग्राहकांच्या सर्व समस्या सोडवतील, असे त्या म्हणाल्या. उद्योग, पायाभूत सुविधा आणि कर्ज मागणी वाढत असल्याने हे आवश्यक आहे. 1990 आणि 2000 मधील आधीच्या विलयांप्रमाणे यावेळी कर्मचाऱ्यांच्या अस्वस्थतेवर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे निर्मला सितारमण म्हणाल्या.
सध्या 12 सार्वजनिक बँका आहेत, ज्या भविष्यात फक्त 4 पर्यंत आणल्या जाणार आहेत. यात स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), बँक ऑफ बडोदा, केनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) आणि युको बँक यांचा समावेश आहे. 2019 ते 2020 मध्ये 21 बँकांपासून ही संख्या 12 वर आणली गेली, ज्यामुळे बँकांच्या आर्थिक आरोग्य सुधारल्याचे सांगण्यात येते. तसेच सरकार विलयासोबत बँकिंग क्षेत्राची स्थिरता, कर्ज सुविधा वाढवणे आणि बँकांना स्वतंत्रपणे विकसित होण्यास मदत करेल, अशी माहितीही देण्यात आली.
|
|
विलयामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरी जाणार नाही. विलय ही एक प्रक्रिया आहे, त्यामुळे नोकरी संकट, शाखा बंद किंवा बँका बंद होणार नाहीत," असे त्या म्हणाल्या. आधीच्या विलयांमध्ये कर्मचाऱ्यांना प्रोमोशनमध्ये विलंब, कामकाज पद्धतीत बदल यासारख्या समस्या भेडसावल्या, पण आता अशा चिंता दूर केल्या जातील. सरकार कर्मचाऱ्यांच्या हितरक्षणावर भर देणार आहे, जेणेकरून विलय यशस्वी होईल.
भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मजबूत भांडवल असलेल्या मोठ्या बँकांची गरज आहे. सीतारामन म्हणाल्या, "अर्थव्यवस्थेची वाढ होत असल्याने कर्ज देण्याची क्षमता वाढवणे आवश्यक आहे." जागतिक दर्जाच्या बँका तयार करून उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी क्रेडिट उपलब्ध करणे हा मुख्य फोकस आहे. यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल आणि बँकिंग क्षेत्र अधिक सक्षम होईल.
सरकार फक्त विलयावरच नाही, तर बँकिंग इकोसिस्टम मजबूत करण्यावर भर देत आहे. बँक आणि नियामकांमधील सखोल चर्चा होईल, ज्यामुळे बँका स्वावलंबी होऊ शकतील, अशी माहिती देण्यात आली. आधीचे विलय यशस्वी झाले असून, आता अधिक स्थिरता आणि सुधारणा सरकारला अपेक्षित आहे. हे पाऊल देशाच्या आर्थिक महत्त्वाकांक्षेला साजेसे आहे, ज्यामुळे सर्व नागरिकांना फायदा होईल, असे केंद्राच्या वतीने सांगण्यात येत आहे.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel



