
Bank Merger Plan : भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय यांच्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलयाबाबत चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. देशाच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी 'जागतिक दर्जाच्या' बँका तयार करण्याचा उद्देश असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. "देशाला मोठ्या बँकांची गरज आहे, ज्या जागतिक स्तरावर काम करतील आणि ग्राहकांच्या सर्व समस्या सोडवतील, असे त्या म्हणाल्या. उद्योग, पायाभूत सुविधा आणि कर्ज मागणी वाढत असल्याने हे आवश्यक आहे. 1990 आणि 2000 मधील आधीच्या विलयांप्रमाणे यावेळी कर्मचाऱ्यांच्या अस्वस्थतेवर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे निर्मला सितारमण म्हणाल्या.
सध्या 12 सार्वजनिक बँका आहेत, ज्या भविष्यात फक्त 4 पर्यंत आणल्या जाणार आहेत. यात स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), बँक ऑफ बडोदा, केनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) आणि युको बँक यांचा समावेश आहे. 2019 ते 2020 मध्ये 21 बँकांपासून ही संख्या 12 वर आणली गेली, ज्यामुळे बँकांच्या आर्थिक आरोग्य सुधारल्याचे सांगण्यात येते. तसेच सरकार विलयासोबत बँकिंग क्षेत्राची स्थिरता, कर्ज सुविधा वाढवणे आणि बँकांना स्वतंत्रपणे विकसित होण्यास मदत करेल, अशी माहितीही देण्यात आली.
|
|
विलयामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरी जाणार नाही. विलय ही एक प्रक्रिया आहे, त्यामुळे नोकरी संकट, शाखा बंद किंवा बँका बंद होणार नाहीत," असे त्या म्हणाल्या. आधीच्या विलयांमध्ये कर्मचाऱ्यांना प्रोमोशनमध्ये विलंब, कामकाज पद्धतीत बदल यासारख्या समस्या भेडसावल्या, पण आता अशा चिंता दूर केल्या जातील. सरकार कर्मचाऱ्यांच्या हितरक्षणावर भर देणार आहे, जेणेकरून विलय यशस्वी होईल.
भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मजबूत भांडवल असलेल्या मोठ्या बँकांची गरज आहे. सीतारामन म्हणाल्या, "अर्थव्यवस्थेची वाढ होत असल्याने कर्ज देण्याची क्षमता वाढवणे आवश्यक आहे." जागतिक दर्जाच्या बँका तयार करून उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी क्रेडिट उपलब्ध करणे हा मुख्य फोकस आहे. यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल आणि बँकिंग क्षेत्र अधिक सक्षम होईल.
सरकार फक्त विलयावरच नाही, तर बँकिंग इकोसिस्टम मजबूत करण्यावर भर देत आहे. बँक आणि नियामकांमधील सखोल चर्चा होईल, ज्यामुळे बँका स्वावलंबी होऊ शकतील, अशी माहिती देण्यात आली. आधीचे विलय यशस्वी झाले असून, आता अधिक स्थिरता आणि सुधारणा सरकारला अपेक्षित आहे. हे पाऊल देशाच्या आर्थिक महत्त्वाकांक्षेला साजेसे आहे, ज्यामुळे सर्व नागरिकांना फायदा होईल, असे केंद्राच्या वतीने सांगण्यात येत आहे.
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"

























Subscribe to my channel




