वुमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आयसीसी वनडे वर्ल्ड कप विजयानंतर आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टीम इंडियाने यजमान ऑस्ट्रेलियावर तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात 17 धावांनी मात केली आहे. स्मृती मंधाना हीच्या 82 धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 176 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 159 धावांपर्यंतच पोहचता आलं. टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली आहे. भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. टीम इंडियाने यासह इतिहास घडवला आहे. भारताची ऑस्ट्रेलियाच्या भूमीत आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. याआधी वूमन्स टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात कोणतीही मालिका जिंकता आली नव्हती. मात्र हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने ही कामगिरी करुन दाखवली आहे.
स्मृती मंधानाची विस्फोटक बॅटिंग
टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने फलंदाजी निवडली. भारतासाठी तिघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. स्मृती मंधाना हीला शतकाची संधी होती. मात्र स्मतीचं शतक 18 धावांनी हुकलं. स्मृतीने 55 बॉलमध्ये 82 रन्स केल्या. स्मृतीने या खेळीत 3 सिक्स आणि 8 फोर लगावले. जेमीमाह रॉड्रिग्स हीने अर्धशतक झळकावलं. जेमिमाहने 46 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 59 धावांची खेळी केली. तर ऋचा घोष हीने अखेरच्या क्षणी 18 धावांनी निर्णायक खेळी केली.
टीम इंडियाची कडक बॉलिंग
भारतीय गोलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरला झटपट मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ठोस सुरुवात मिळाली नाही. जॉर्जिया वॉल हीने 10 तर बेथ मुनीने 6 धावांचं योगदान दिलं. फोबी लिचफिल्ड हीला चांगली सुरुवात मिळाली. मात्र तिला मोठी खेळी करण्याआधीच आऊट केलं. फोबीने 26 धावा केल्या.
एलिसा पेरी 1 रनव आऊट झाली. जॉर्जिया वॉरहम हीने 12 तर अन्नाबेल सदरलँड हीने 14 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी एश्ले गार्डनर हीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. गार्डनरने अर्धशतक झळकावलं. गार्डनरने 45 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 1 फोरसह एकूण 57 धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांसमोर विजयी धावांपर्यंत पोहचता आलं नाही. टीम इंडियासाठी श्री चरणी आणि श्रेयांका पाटील या दोघींनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. अरुंधती रेड्डी हीने कांगारुंच्या 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रेणुका सिंह ठाकुर हीने 1 विकेट मिळवली.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




