राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडले होते. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून अंतिम निकाल आता हाती आला आहे. महानगर पालिकांच्या निकालाप्रमाणेच या निवडणुकीतही महायुतीने बाजी मारली आहे. 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तर 2 ठिकाणी शिवसेना आणि 2 ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. तर एका जिल्हा परिषदेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. कोणत्या जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाने विजय मिळवला ते सविस्तर जाणून घेऊयात.
कोणत्या जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाची सत्ता?
राज्यातील 12 पैकी 7 जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. यात सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा आणि सोलापूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्हा परिषदांवर भगवा फडकवला आहे. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने शानदार विजय मिळवला आहे. सांगलीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने विजय मिलवला आहे.
कोणत्या पक्षाने किती जिल्हा परिषदा जिंकल्या?
- भाजप (7) – सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा, सोलापूर.
- शिवसेना (2) – रायगड, रत्नागिरी
- राष्ट्रवादी (2) – पुणे, कोल्हापूर
- राष्ट्रवादी शरद पवार (1) – सांगली
कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
सिंधुदुर्ग मध्ये भाजपने 50 पैकी 27 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे, तर शिवसेनेला 14 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला 3 आणि इतरांना 6 जागा मिळाल्या आहेत. साताऱ्यात भाजपला 65 पैकी 24 जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादीला 23 आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. सोलापूरमध्ये भाजपला 68 पैकी 42 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला 63 पैकी 23 आणि शिवसेनेला 21 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. परभणीत 54 पैकी भाजपला 24 आणि राष्ट्रवादीला 15 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. धाराशिवमध्ये भाजपला 55 पैकी 18 आणि शिवसेनेला 15 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाला 8 जागा मिळाल्या आहेत. लातूरमध्ये भाजपला 59 पैकी 18 आणि राष्ट्रवादीला 12 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी काँग्रेसला 23 जागा मिळाल्या आहेत, मात्र काँग्रेसला बहुमत गाठता येणार नसल्याचे समोर आले आहे.
पुण्यात राष्ट्रवादीचा विजय
पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार आहे. पुण्यातील 73 पैकी 51 जागांवर राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत. कोल्हापूर मध्ये राष्ट्रवादीला 68 पैकी 20, भाजपला 12 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी महायुती सत्ता स्थापन करणार आहे. रायगडमध्ये शिवसेनेने 59 पैकी 21, भाजपने 15 आणि राष्ट्रवादीने 16 जागांवर विजय मिळवला आहे. तर रत्नागिरीत 56 पैकी 40 जागांवर शिवसेनेचा विजय झाला आहे.
[embedded content]
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




