राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडले होते. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून अंतिम निकाल आता हाती आला आहे. महानगर पालिकांच्या निकालाप्रमाणेच या निवडणुकीतही महायुतीने बाजी मारली आहे. 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तर 2 ठिकाणी शिवसेना आणि 2 ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. तर एका जिल्हा परिषदेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. कोणत्या जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाने विजय मिळवला ते सविस्तर जाणून घेऊयात.
कोणत्या जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाची सत्ता?
राज्यातील 12 पैकी 7 जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. यात सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा आणि सोलापूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्हा परिषदांवर भगवा फडकवला आहे. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने शानदार विजय मिळवला आहे. सांगलीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने विजय मिलवला आहे.
कोणत्या पक्षाने किती जिल्हा परिषदा जिंकल्या?
- भाजप (7) – सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा, सोलापूर.
- शिवसेना (2) – रायगड, रत्नागिरी
- राष्ट्रवादी (2) – पुणे, कोल्हापूर
- राष्ट्रवादी शरद पवार (1) – सांगली
कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
सिंधुदुर्ग मध्ये भाजपने 50 पैकी 27 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे, तर शिवसेनेला 14 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला 3 आणि इतरांना 6 जागा मिळाल्या आहेत. साताऱ्यात भाजपला 65 पैकी 24 जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादीला 23 आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. सोलापूरमध्ये भाजपला 68 पैकी 42 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला 63 पैकी 23 आणि शिवसेनेला 21 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. परभणीत 54 पैकी भाजपला 24 आणि राष्ट्रवादीला 15 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. धाराशिवमध्ये भाजपला 55 पैकी 18 आणि शिवसेनेला 15 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाला 8 जागा मिळाल्या आहेत. लातूरमध्ये भाजपला 59 पैकी 18 आणि राष्ट्रवादीला 12 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी काँग्रेसला 23 जागा मिळाल्या आहेत, मात्र काँग्रेसला बहुमत गाठता येणार नसल्याचे समोर आले आहे.
पुण्यात राष्ट्रवादीचा विजय
पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार आहे. पुण्यातील 73 पैकी 51 जागांवर राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत. कोल्हापूर मध्ये राष्ट्रवादीला 68 पैकी 20, भाजपला 12 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी महायुती सत्ता स्थापन करणार आहे. रायगडमध्ये शिवसेनेने 59 पैकी 21, भाजपने 15 आणि राष्ट्रवादीने 16 जागांवर विजय मिळवला आहे. तर रत्नागिरीत 56 पैकी 40 जागांवर शिवसेनेचा विजय झाला आहे.
[embedded content]
शहर
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
- कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- मुंबई: महिला उद्योजिकांसाठी महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा! पर्यटन व्यवसायासाठी मिळणार १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
महाराष्ट्र
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
- कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- मुंबई: महिला उद्योजिकांसाठी महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा! पर्यटन व्यवसायासाठी मिळणार १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
देश विदेश
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
- नवी दिल्ली: रेल्वेचा नवा नियम; व्हॉट्सॲप वरील तिकीटाचा स्क्रीनशॉट चालणार नाही, अन्यथा भरावा लागू शकतो दंड
























Subscribe to my channel




