अमरावती: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित एक अत्यंत संतापजनक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच, अवघ्या २४ तासांच्या आत जिल्ह्यातील बिजुधावडी, सावलीखेडा आणि सुसर्दा या इतर आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनाही अन्नातून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. एकापाठोपाठ एका अशा तीन वेगवेगळ्या आश्रमशाळांमध्ये विषबाधेच्या घटना समोर आल्याने मेळघाट आणि अमरावती जिल्ह्यात एकच खडबळ उडाली आहे.
प्राप्त झालेल्या सविस्तर माहितीनुसार, शाळांमधील विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या जेवणाच्या आणि अन्नधान्याच्या गुणवत्तेबद्दल याआधीही अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, प्रशासकीय दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरूच असल्याचे या लागोपाठ घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होते. टिटंबा येथील आश्रमशाळेत जेवणानंतर अचानक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, त्यांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा तीव्र त्रास होऊ लागला. हा प्रकार ताजे असतानाच बिजुधावडी, सावलीखेडा आणि सुसर्दा येथील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनाही असाच त्रास जाणवल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
शासकीय आणि आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत चालवल्या जाणाऱ्या या शाळांमध्ये मुलांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याचा गंभीर आरोप पालकांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित ठेकेदार आणि दोषी प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून व विविध संघटनांकडून आक्रमकपणे केली जात आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन सर्व आश्रमशाळांच्या अन्न पुरवठ्याची व गुणवत्तेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




