
Akola News : अकोल्यात गेल्या महिन्याभरात दोन महिलांचा मृत्यू झालाय. हा मृत्यू दूषित पाणी पिल्याने झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. अकोल्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी खुर्द गावात स्वतंत्र विहिरीचे दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे दोन महिलांचा मृत्यू झालाय, असा आरोप मृतांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी देखील केलाय. या प्रकारामुळे बार्शिटाकळी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, निंबी खुर्दवासीयांच्या या आरोपानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झालीय. आता या गावातल्या स्वतंत्र विहिरीतल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे आरोग्य जिल्हाधिकारी बळीराम गाढवे यांनी साम टिव्हीशी बोलतांना म्हटलंय. दरम्यान गावात सध्या एकही रुग्ण किंवा साथ नाहीये, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
|
Praniti Shinde News : भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल |
या निंबी खुर्द गावातल्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार, आरोग्य विभागाच्या पथकानं काल शनिवारी स्वतंत्र विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोन महिलांचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाला की नाहीये, हे स्पष्ट होणार आहे. आरोग्य विभागानं गावात भेट दिली असता गावात सध्या एकही रुग्ण किंवा साथ नाहीये. तरीही उद्या या ठिकाणी आम्ही सुद्धा भेटी देणार आहो. असेही बळीराम गाढवे यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, निंबी खुर्द येथील 19 वर्षीय कुमारी प्रतीक्षा किशोर शिवणकार हिला मळमळ, उलट्या अशा समस्या सुरू होत्या. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दरम्यान प्रतिक्षाची प्रकृती अचानक खालावली आणि तिचा मृत्यू झालाय. तर सरस्वताबाई जनार्दन गावंडे यांचे पोट दुखत होते. त्यांनाही उलट्या आणि मळमळ होऊ लागल्यानं एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थ नेले होते. परंतु त्यांचाही मृत्यू झाला.
या गावात सरकारी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नाहीये. सध्या गावकरी स्वतंत्र विहिरीचे पाणी पित आहेत. या विहिरीचे पाणी पीत असताना गेल्या चार ते पाच महिन्यापासून या पाण्यामुळे अनेकांना आजार होत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.
आता दोन दिवसांच्या सुट्या आल्यामुळे सदर पाण्याचा अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झाला नाहीये. त्यामुळे पाणी दूषित आहे किंवा नाही? याबाबत काही सांगता येणार नाहीये. असे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पाणी तपासणीचा अहवाल आल्यानंतरच सर्व बाबी निष्पन्न होणार, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




