रविवारचा सुट्टीचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक ठरला आहे. राज्यातील अमरावती, नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर) या तीन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घडलेल्या दुर्घटनेत एकूण ६ निष्पाप चिमुरड्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खेळायला गेलेली ही मुले काळाच्या पडद्याआड गेल्याने संबंधित गावांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
१) अमरावती: दर्यापूरमध्ये नदीत बुडून ३ बालकांचा मृत्यू
पहिली हृदयद्रावक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात असलेल्या सामदा गावालगत घडली. येथील चंद्रभागा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांची नावे प्रज्वल गजानन काकड (वय १०), शिवम गजानन काकड (वय १२) आणि सुमित रवींद्र काकड (वय ११) अशी आहेत. हे तिघेही एकाच कुटुंबातील (सख्खे आणि चुलत भाऊ) होते. रविवारी सुट्टी असल्याने हे तिघेही दुपारच्या सुमारास नदीवर अंघोळीसाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पात्रात बुडू लागले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण सामदा गावावर शोककळा पसरली आहे.
२) नाशिक: मालेगावात खदाणीच्या पाण्यात २ मुलांचा अंत
दुसरी घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी शिवारात घडली. येथील एका बंद पडलेल्या खदाणीमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. अयान हुसेन शहा (वय ९) आणि रेहान हुसेन शहा (वय ७) अशी मृत भावंडांची नावे आहेत. हे दोघे भाऊ खदाणीच्या परिसरात खेळत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खोल पाण्यात पडले. दोन्ही लहान मुलांचा पाण्यात गुदमरून जागीच मृत्यू झाला. एकाच घरातील दोन चिमुरड्यांचा असा अंत झाल्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
३) अहिल्यानगर: कोपरगावात तलावात बुडून एकाचा मृत्यू
तिसरी दुर्दैवी घटना अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मंजूर परिसरात घडली. येथे एका शेततळ्यात खेळताना पाय घसरून पडल्याने एका ८ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. खेळता खेळता तो शेततळ्याच्या प्लास्टिक पेपरवरून घसरला आणि थेट पाण्यात गेला. त्याला वेळेत मदत न मिळाल्यामुळे त्याचा श्वास कोंडून मृत्यू झाला.
या तीनही वेगवेगळ्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले असून, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा वीकेंडला मुलांकडे पालकांनी विशेष लक्ष देणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिसांनी या सर्व प्रकरणांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


