अमरावती: अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कालीमाता नगर परिसरातून एक अत्यंत वेदनादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे.
जन्मानंतर अवघ्या पाचच दिवसांत एका निष्पाप नवजात बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, बालिकेच्या मृत्यूची कोणतीही माहिती पोलिसांना न देता कुटुंबीयांनी घाईघाईत तिच्यावर अंत्यसंस्कार करत मृतदेह जमिनीत दफन केला होता. मात्र, पोलिसांना या प्रकरणाचा संशय आल्याने त्यांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन (Postmortem) केले. या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर पोलिसांनी नवजात बालिकेच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भीषण उन्हामुळे जीव गुदमरून झाला मृत्यूपोलिसांनी दिलेल्या आणि शवविच्छेदन अहवालातून (Postmortem Report) समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या विदर्भासह अमरावतीत उन्हाचा पारा कमालीचा वाढला असून उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. या कडक उन्हाचा फटका या पाच दिवसांच्या चिमुकलीला बसला. अत्यंत कडक ऊन आणि उष्णतेमुळे या नवजात बालिकेचा श्वास कोंडला आणि जीव गुदमरून तिचा जागीच मृत्यू झाला. नवजात बालकांची त्वचा आणि शरीर अत्यंत नाजूक असल्याने ते वातावरणातील हा अचानक झालेला बदल आणि वाढलेले तापमान सहन करू शकले नाही.
गुपचूप अंत्यसंस्कार आणि पोलिसांचा संशयबालिकेचा मृत्यू झाल्यानंतर पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता किंवा कोणालाही न सांगता कालिमाता नगर परिसरातील स्मशानभूमीत तिचा मृतदेह जमिनीत पुरून टाकला. मात्र, या संशयास्पद मृत्यूची गुप्त माहिती बडनेरा पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत दफन केलेला मृतदेह जमिनीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखलशवविच्छेदन अहवालात बालिकेचा मृत्यू उन्हामुळे जीव गुदमरून झाल्याचे आणि तिच्या संगोपनात कमालीचा हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले. नवजात बालकाची काळजी घेण्यात हलगर्जीपणा करणे, त्याच्या जिवाला धोका निर्माण करणे आणि मृत्यूची माहिती लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे या कारणास्तव बडनेरा पोलिसांनी अखेर बालिकेच्या आई आणि वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.
शहर
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
महाराष्ट्र
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.

























Subscribe to my channel



