“स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!” दरवर्षी 15 ऑगस्ट आला की आपण अगदी सहज एकमेकांना शुभेच्छा देतो. सोशल मीडियावर तिरंगा झळकतो, देशभक्तीची गाणी ऐकू येतात, स्टेटसवर ‘जय हिंद’ लिहिलं जातं. शाळांमध्ये ध्वजारोहण होतं, भाषणं होतात आणि आपण अभिमानाने म्हणतो—“आपला देश स्वतंत्र झाला.” पण यंदा दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा ‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर मनात एक प्रश्न वारंवार येतोय, ज्यांच्यासाठी स्वातंत्र्याच्या त्या पहाटेने घराचा दरवाजा बंद केला होता, त्यांना त्या स्वातंत्र्याचा आनंद खरंच तितकाच झाला असेल का? 1947 मध्ये एकीकडे भारत स्वतंत्र होत होता आणि दुसरीकडे लाखो माणसं आपल्या घरापासून, गावापासून, जमिनीपासून आणि आपल्या माणसांपासून तुटून निर्वासित म्हणून वणवण फिरत होती. पंजाबमधील हिंदू, शीख कुटुंबं असोत, सिंधी कुटुंबं असोत किंवा हिंसेमुळे आपली घरं सोडावी लागलेली इतर असंख्य कुटुंबं—त्यांच्यासाठी 15 ऑगस्ट 1947 हा फक्त आनंदाचा दिवस नव्हता. एका बाजूला स्वातंत्र्याची पहाट होती… तर दुसऱ्या बाजूला घर सोडण्याची वेळ आली होती. ज्या घरात पिढ्यान्पिढ्या संसार केला, ते घर मागे सोडावं लागलं. ज्या मातीत बालपण गेलं, ती माती मागे सोडावी लागली. ज्या शेजाऱ्यांसोबत वर्षानुवर्षे राहिलो, त्यांच्यापासून अचानक दुरावावं लागलं आणि हातात होतं तेवढंच सामान घेऊन अनोळखी दिशेने निघावं लागलं. हा कोणत्या स्वातंत्र्याचा उत्सव होता? एका कुटुंबासाठी 15 ऑगस्ट म्हणजे तिरंगा असेल… पण दुसऱ्या कुटुंबासाठी तो दिवस कदाचित आपल्या घराला शेवटचं पाहिल्याची तारीख असेल. काहींच्या वाट्याला निर्वासित छावण्या आल्या. काहींना रेल्वेच्या डब्यांमधून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. काहींना वाटेत आपली माणसं गमवावी लागली. काही कुटुंबं कायमची तुटली आणि अनेक महिलांच्या आयुष्यावर अशा जखमा झाल्या, ज्यांची वेदना त्या आयुष्यभर मनात घेऊन जगल्या. फाळणीच्या हिंसेत महिलांवर लैंगिक अत्याचार झाले, त्यांचं अपहरण झालं, जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. काही कुटुंबांनी आपल्या महिलांना वाचवण्यासाठी स्वतःच्या मनाला हादरवून टाकणारे निर्णय घेतले. इतिहासाच्या पुस्तकात कदाचित या घटना काही परिच्छेदांत संपतात. पण त्या महिलांसाठी? तो त्यांचा संपूर्ण उरलेला आयुष्यकाळ होता. म्हणूनच आज आपण सहज म्हणतो— “स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!” तेव्हा क्षणभर थांबून स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा— ज्यांनी स्वातंत्र्याच्या वेळी आपलं घर गमावलं, त्यांना या स्वातंत्र्याचा आनंद खरंच झाला असेल का? ज्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची माणसं मारली गेली… ज्यांच्या भावंडांचा पत्ता लागला नाही... ज्यांच्या मुलींवर अत्याचार झाले… ज्यांना आपल्या जन्मभूमीतून निर्वासित म्हणून बाहेर पडावं लागलं… त्यांच्यासाठी ‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा अर्थ काय असेल? कदाचित त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा पहिला अर्थ होता—जिवंत राहणं. दुसरा अर्थ होता—आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणं. आणि तिसरा—पुन्हा एकदा कुठेतरी घर उभं करणं. सिंधी निर्वासितांनी नव्या भूमीत पुन्हा संसार उभा केला. पंजाबमधून आलेल्या लाखो कुटुंबांनी नव्याने आयुष्य सुरू केलं. शीख, हिंदू आणि इतर अनेक विस्थापितांनी आपली माती मागे ठेवली, पण आपल्या कष्टाने नवीन मातीला आपलंसं केलं. त्यांनी घर गमावलं, पण घर करण्याची जिद्द गमावली नाही. म्हणून आज आपण स्वतंत्र भारतात उभे आहोत, तेव्हा आपल्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करणं नक्कीच योग्य आहे. पण त्या आनंदाला इतिहासाची जाणीव असणंही तितकंच आवश्यक आहे. कारण आपल्या तिरंग्याच्या सावलीत अशा लाखो लोकांच्या आठवणी आहेत, ज्यांनी देश स्वतंत्र होताना आपली घरं गमावली. हा भारत महान बनवणाऱ्यांमध्ये त्या निर्वासितांचाही वाटा आहे, ज्यांनी सर्वस्व गमावूनही हार मानली नाही. ज्यांनी पुन्हा दुकानं उघडली. पुन्हा घरं बांधली. पुन्हा मुलांना शिकवलं. पुन्हा संसार केला. आणि सर्वांत महत्त्वाचं— पुन्हा जगायला शिकले. म्हणून यंदा 15 ऑगस्टला एकमेकांना शुभेच्छा देताना आपण फक्त “Happy Independence Day” म्हणू नये. क्षणभर त्या वृद्धाचा विचार करूया, ज्याने आपलं जन्मगाव मागे सोडलं. त्या मुलीचा विचार करूया, जिचं आयुष्य फाळणीच्या हिंसेने कायमचं बदलून टाकलं. त्या कुटुंबाचा विचार करूया, ज्याने एका रात्रीत आपलं घर गमावलं. आणि त्या निर्वासिताचा विचार करूया, ज्याने आयुष्यभर मनात एकच प्रश्न जपला— “मी माझ्या घरी पुन्हा कधी जाईन?” कदाचित आपण त्यांचं दुःख पूर्णपणे समजू शकणार नाही. पण त्यांची आठवण ठेवू शकतो. त्यांच्या त्यागाला मान देऊ शकतो आणि आपल्या पुढच्या पिढीला सांगू शकतो की— स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेलं नाही. या स्वातंत्र्याच्या पहाटेच्या मागे आनंदाबरोबरच अश्रू होते. तिरंग्याबरोबरच निर्वासितांच्या हातात सामानाच्या छोट्या गाठोड्या होत्या. देशाच्या निर्मितीबरोबरच हजारो घरांचा अंत झाला होता. म्हणून… “स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!” पण त्या शुभेच्छांसोबत एक क्षण त्या लाखो विस्थापितांना सलाम करूया. कारण त्यांनी देशाचा इतिहास फक्त पाहिला नाही— त्यांनी तो आपल्या आयुष्याने भोगला. आणि कदाचित म्हणूनच ‘मैं वापस आऊंगा’ चित्रपट हा एक सिनेमा म्हणून कदाचित भारावून टाकणार नाही पण आपल्याला शेवटी एकच गोष्ट सांगून जातो— देश स्वतंत्र होतो एका दिवशी;
पण माणसाला आपल्या हरवलेल्या घरातून, हरवलेल्या माणसांतून आणि हरवलेल्या आठवणींतून मुक्त व्हायला कधी कधी संपूर्ण आयुष्यही पुरत नाही. जय हिंद. जय भारत
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




