
12th HSC RESULT : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी बारावी पास झाली आहे. वैभवी देशमुखला बारावीला ८५.३३ टक्के गुण मिळाले. वडिलांच्या हत्येनंतरच्या कठीण काळात वैभवीने चिकाटीने बारावीची परीक्षा दिली आणि तिला चांगले यश मिळाले. बारावीचा निकाल लागल्यानंतर संतोष देशमुखांची मुलगी खूपच भावुक झाली. निकालानंतर कौतुकाची थाप द्यायला आज माझे वडील नाहीत अशी खंत व्यक्त करत वैभवी देशमुख रडली. माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशीच शिक्षा द्या अशी मागणी तिने यावेळी केली.
वैभवी देशमुखने सांगितले की, 'मला ८५.३३ टक्के मार्क्स मिळाले आहेत. पण आज मला खरंच ऐवढे मार्क्स मिळाले याचा मला काहीच आनंद वाटत नाही. कारण आमचा आनंद यांनी हिरावून घेतला. माझ्या वडिलांना न्याय मिळावा ऐवढीच अपेक्षा आहे. ऐवढ्या मार्क्सची अपेक्षा नव्हती. पण महाराष्ट्राच्या साथीने आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाचा हात आमच्या पाठीशी आहे म्हणून आज हे सर्व मार्क्स त्यांच्यामुळेच आहेत.'
वडिलांच्या हत्येनंतरच्या कठीण काळात वैभवीने परीक्षेची तयार करून परीक्षा दिली. त्याबद्दल तिने सांगितले की,'तो काळ खूपच कठीण होता. आज आम्ही विचार देखील करू शकत नाही. ते दु:खाचे डोंगर याआधी आम्ही कधीच अनुभवले नाही आणि आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता. पण कुणाचीही मानसिकता नव्हती तरी देखील सर्वांना वाटते की मी माझ्या करिअरमुळे परीक्षा द्यावी. म्हणू मी परीक्षा दिली. सर्वांच्या साथीने आणि वडिलांच्या आशीर्वादाने निकाल चांगला लागला.'
|
12th HSC Result : संतोष देशमुखांची लेक झाली पास! बारावीला मिळाले इतके गुण, कुटुंबियांचे डोळे डबडबले |
वडिलांची काय इच्छा होती याबद्दल वैभवी म्हणाली की, 'दहावीनंतर माझी नीटची तयारी सुरू होती तर त्यांना वाटत होते की ही नीटची तयारी करते तर हिने स्वत:च्या पायावर उभं राहावं. ती जे करते त्यात तिला यश मिळावे असे माझ्या वडिलांना वाटत होते. काल मी दिलेला नीटचा पेपर खूप अवघड गेला. माझे स्कोरिंग १५०च्या खाली आहे. पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.पण आज या गोष्टीची खंत वाटते की माझ्या या यशात माझे वडील माझ्यासोबत नाही. त्यांच्या शाबासकीची थाप माझ्या पाठीवर नाही आहे.'
तसंच, 'माझ्या वडिलांची हत्या निर्घृण झाली. त्याचे दु:ख आम्हाला खूप होते ते कायम राहिल. आम्ही स्वप्नातही त्या दु:खाचा विचार केला नाही. आज सर्वजण सोबत आहेत पण माझे वडील नाहीत. त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडणार नाही. ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून आणि गावापासून हिरावून घेतले त्या सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी. माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या आणि आरोपींना फाशीवर लटकवा.', अशी मागणी वैभवी देशमुखने केली.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




