यंदाचं वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे. आरएसएसच्या (RSS) 100व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईतील नेहरू सेंटर इथे संघाकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह बॉलिवूड दिग्गजांनीही हजेरी लावली होती. आता या प्रकरणावरुन संजय राऊत यांनी संघावर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. संघाच्या कार्यक्रमाला सिनेकलाकार, शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मात्र, त्यातील काही लोकांची पार्श्वभूमी पाहता भाजप आणि संघाच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
देश अमेरिकेचा गुलाम झाला
भाजप आणि संघ सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संघामुळे भाजपला अच्छे दिन आले, पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे देशातील अच्छे दिन निघून गेले आहेत. हा देश अमेरिकेचा गुलाम झाला याची जबाबदारी सरसंघचालकांनी घ्यायला हवी, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संघाच्या कार्यक्रमाला अनेक लोकांना आमंत्रण होतं. सिनेकलाकार, शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रातील मान्यवर होते. त्यातील काही लोकांना पाहिल्यावर आम्हाला भाजपच्या आणि संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल धक्का बसला. हे किती ढोंगी आणि पाखंडी आहेत. गायक अदनान सामी हा सरसंघचालकांसोबत बसून ब्रेकफास्ट करत होता. सरसंघचालकांना कदाचित माहिती नसावं किंवा ज्यांनी निमंत्रण दिलं त्यांना माहिती नसावं की हा व्यक्ती देशविरोधी कृत्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. अदनान सामीचे वडील हर्षद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलात होतो. १९६५ च्या युद्धात या हर्षद खान यांनी भारतावर बॉम्बिंग केलं होतं. पठाणकोठचं तळ उद्धवस्त केला होता आणि त्यांचा मुलगा अदनान सामी हा सरसंघचालकांच्या बंगल्यात बसला होता. तुम्ही भारताला कोणती प्रेरणा देताय, कोणते इतिहासाचे धडे देताय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
संघामुळे भाजपला अच्छे दिन आले
एका नटीने आय लव्ह भागवत असे म्हटले. तिच्यावर आर्थिक अफरातफरीबद्दल लुकआऊट नोटीस आहे. तिच्या नवऱ्यावर पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप होता आणि तो अटकेत होता. असे असंख्य लोकं तिथे होते. संघाचे चारित्र्य किती बिघडलं आहे, हे त्यांना माहिती नसेल. या सर्वांना बोलवून तुम्ही देशाला काय संदेश देताय, संघ पापावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला संघाविषयी आदर आहे, प्रेम आहे. देशाला अजून अच्छे दिन आलेले नाहीत. याला जबाबदार संघ आहे. संघामुळे भाजपला अच्छे दिन आले, पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे देशातील अच्छे दिन निघून गेले आहेत. हा देश अमेरिकेचा गुलाम झाला याची जबाबदारी सरसंघचालकांनी घ्यायला हवी, असेही संजय राऊत म्हणाले.
भाजप आणि संघ सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू
त्यांनी चारित्र्याच्या गोष्टी केल्या. पण देशभरातील सर्व गुन्हेगार, व्याभिचारी बलात्कारी पक्षात घेऊन सत्ता आणणाऱ्यामुळे आपल्या देशात कोणते सामाजिक परिवर्तन होणार आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. त्यांचं सरकार आहे. संघाचे सरसंघचालक ज्या सरकारमध्ये आहे आणि जे सरकार सत्तेवर आणण्यासाठी लाखो स्वयंसेवकांनी जिवाचे रान केले आहे. ते सरकार वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही, हा सवाल त्यांनी भाषणात विचारण्यापेक्षा त्यांनी तो थेट मोदींना विचारायला हवा. भाजप आणि संघ सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असेही संजय राऊतांनी म्हटले.
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



