यंदाचं वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे. आरएसएसच्या (RSS) 100व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईतील नेहरू सेंटर इथे संघाकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह बॉलिवूड दिग्गजांनीही हजेरी लावली होती. आता या प्रकरणावरुन संजय राऊत यांनी संघावर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. संघाच्या कार्यक्रमाला सिनेकलाकार, शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मात्र, त्यातील काही लोकांची पार्श्वभूमी पाहता भाजप आणि संघाच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
देश अमेरिकेचा गुलाम झाला
भाजप आणि संघ सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संघामुळे भाजपला अच्छे दिन आले, पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे देशातील अच्छे दिन निघून गेले आहेत. हा देश अमेरिकेचा गुलाम झाला याची जबाबदारी सरसंघचालकांनी घ्यायला हवी, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संघाच्या कार्यक्रमाला अनेक लोकांना आमंत्रण होतं. सिनेकलाकार, शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रातील मान्यवर होते. त्यातील काही लोकांना पाहिल्यावर आम्हाला भाजपच्या आणि संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल धक्का बसला. हे किती ढोंगी आणि पाखंडी आहेत. गायक अदनान सामी हा सरसंघचालकांसोबत बसून ब्रेकफास्ट करत होता. सरसंघचालकांना कदाचित माहिती नसावं किंवा ज्यांनी निमंत्रण दिलं त्यांना माहिती नसावं की हा व्यक्ती देशविरोधी कृत्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. अदनान सामीचे वडील हर्षद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलात होतो. १९६५ च्या युद्धात या हर्षद खान यांनी भारतावर बॉम्बिंग केलं होतं. पठाणकोठचं तळ उद्धवस्त केला होता आणि त्यांचा मुलगा अदनान सामी हा सरसंघचालकांच्या बंगल्यात बसला होता. तुम्ही भारताला कोणती प्रेरणा देताय, कोणते इतिहासाचे धडे देताय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
संघामुळे भाजपला अच्छे दिन आले
एका नटीने आय लव्ह भागवत असे म्हटले. तिच्यावर आर्थिक अफरातफरीबद्दल लुकआऊट नोटीस आहे. तिच्या नवऱ्यावर पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप होता आणि तो अटकेत होता. असे असंख्य लोकं तिथे होते. संघाचे चारित्र्य किती बिघडलं आहे, हे त्यांना माहिती नसेल. या सर्वांना बोलवून तुम्ही देशाला काय संदेश देताय, संघ पापावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला संघाविषयी आदर आहे, प्रेम आहे. देशाला अजून अच्छे दिन आलेले नाहीत. याला जबाबदार संघ आहे. संघामुळे भाजपला अच्छे दिन आले, पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे देशातील अच्छे दिन निघून गेले आहेत. हा देश अमेरिकेचा गुलाम झाला याची जबाबदारी सरसंघचालकांनी घ्यायला हवी, असेही संजय राऊत म्हणाले.
भाजप आणि संघ सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू
त्यांनी चारित्र्याच्या गोष्टी केल्या. पण देशभरातील सर्व गुन्हेगार, व्याभिचारी बलात्कारी पक्षात घेऊन सत्ता आणणाऱ्यामुळे आपल्या देशात कोणते सामाजिक परिवर्तन होणार आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. त्यांचं सरकार आहे. संघाचे सरसंघचालक ज्या सरकारमध्ये आहे आणि जे सरकार सत्तेवर आणण्यासाठी लाखो स्वयंसेवकांनी जिवाचे रान केले आहे. ते सरकार वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही, हा सवाल त्यांनी भाषणात विचारण्यापेक्षा त्यांनी तो थेट मोदींना विचारायला हवा. भाजप आणि संघ सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असेही संजय राऊतांनी म्हटले.
शहर
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- जालना: मनोज जरांगे पाटलांचा आंतरवाली सराटीतून एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि शंभूराज देसाईंवर कडक शब्दांत हल्लाबोल, दिला थेट इशारा
- धाराशिव: मराठा आरक्षणावरून संतापाचा लाव्हा उसळला! उमरगा तहसील कार्यालयात घुसून आंदोलकांनी पेटवली तहसीलदारांची खुर्ची; चौघे जण ताब्यात
- कोल्हापुर: माजी सैनिक आणि शेतकऱ्यांचा एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा, शिरोळमध्ये गेट तोडले; थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हल्ल्याचा इशारा
- यवतमाळ: सहकार विभागाची कठोर कारवाई! लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना नोटिसा जारी, सहकार वर्तुळात खळबळ
गुन्हा
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल




























Subscribe to my channel



