राजेंद्र जंजाळ, संजय शिरसाटImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Rajendra Janjal on Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजपचे समीर राजूरकर हे महापौर झालेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर राजेंद्र जंजाळ हे उपमहापौर पदी विराजमान झाले. पण जंजाळ आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यातील वाद शमता शमलेला नाही. आता शिवसेना जिल्हा प्रमुख आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे.
मुलीला उपमहापौर करण्याचा अट्टहास
छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार संजय शिरसाट यांच्यावर त्यांच्या मुलीला उपमहापौर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नसून ते सत्य असल्याचा दावा जिल्हा प्रमुख आणि उप महापौर राजेंद्र जंजाळ यांच्याकडून करण्यात आला आहे. संजय शिरसाट हे नेहमीच “महाभारतातील संजयप्रमाणे मला राजकारणातील पुढचे दिसते” असे म्हणत असल्याची टोला लगावण्यात आला. कदाचित त्यांना माझे राजकारणातील उज्ज्वल भविष्यही दिसले असेल, असा उपरोधिक उल्लेख जंजाळ यांनी केला आहे.
शिरसाट यांच्यावर मोठी टीका
“मला राजकारणात काय व्हायचे हे माझे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे ठरवतील. मला मोठे करण्याची ताकद त्यांच्यात आहे, त्यामुळे कुणी चिंता करण्याची गरज नाही,” असे स्पष्ट वक्तव्य जंजाळ यांच्याकडून करण्यात आले. जिल्हा परिषद निवडणुकीत संदिपान भुमरे, रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार यांसारखे नेते यशस्वी ठरले, मात्र पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपेक्षित यश मिळाले नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.गंगापूरमध्ये आमदार नसतानाही एक जागा जिंकण्यात यश आल्याचेही जंजाळ यांनी सांगितले.
जिल्हा प्रमुख असताना संजय शिरसाट यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी येऊ दिले नाही, असा आरोपही करण्यात आला. “शिरसाट माझ्याबद्दल बोलतील तर मी उत्तर देत राहणार,” असा इशारा देत भविष्यात दोघांनीही आपापल्या क्षेत्रात काम करावे, असे मत जंजाळ यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.
जंजाळ भविष्यात मुख्यमंत्री
तर मंत्री संजय शिरसाट यांनी जंजाळ भविष्यात मुख्यमंत्री होवोत असा खोचक टोला लगावला. जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी आता चांगले काम करावे आणि पुढे जाऊन ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत असा उपरोधिक टोला शिरसाट यांनी उपमहापौर जंजाळ यांनी लगावला.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



