‘सार्वभौमत्व’ हा या वर्षातील सर्वाधिक वापरला जाणाराशब्द ठरू शकतो. ट्रम्प यांनी याला चलनात आणले आहे.जागतिकीकरणावर गेल्या तीन दशकांपासून जे एकमत झालेहोते, ते त्यांनी मोडून काढले आहे. त्या सहमतीने मित्र-देशआणि सहकाऱ्यांसोबतच्या आघाडीत आपले सार्वभौमत्वसामायिक करण्याचे फायदे दाखवले होते. परंतु, ट्रम्प यांनीकॅनडापासून भारतापर्यंत प्रत्येक देशाला सार्वभौमत्वाचेमहत्त्व पुन्हा समजून घेण्यास भाग पाडले . याला तुम्ही आपल्या वसाहतवादी इतिहासाशी जोडूनपाहू शकता किंवा पाश्चात्त्य देशांच्या (अमेरिका)दबावाशीही जोडू शकता, कारण पाकिस्तान त्यांचासहकारी बनला होता. 1974 आणि 1998 मध्येपोखरणमधील अणुचाचण्यांनंतर आपल्यावर आर्थिकनिर्बंध लादले गेले आणि आपल्याला तंत्रज्ञानापासून वंचितठेवले गेले. आपल्या अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर‘रोखा, मागे घ्या आणि संपवा’ या काळातील जो दबावपडला, तो अमेरिकेच्या बाजूनेच होता. सार्वभौमत्वाबाबतभारतात जो व्यापक विचार होता, त्याकडे अमेरिका-विरोधम्हणून पाहिले जाऊ लागले. या अनुभवाने अशाराष्ट्रवादाला जन्म दिला, जो मजबूतही होता आणिअमेरिकेबद्दल संशयाने भरलेलाही. ‘विदेशी हात’ यालानेहमीच अमेरिकेचा हात मानले गेले. त्याचे विरोधक,म्हणजेच सोव्हिएत युनियन आणि त्यांचे सोबती, भारताचेनैसर्गिक मित्र मानले गेले. परंतु हे तोपर्यंतच राहिले, जोपर्यंत1990-91 मध्ये सोव्हिएत युनियन संपुष्टात आले नाही.तेव्हापासून भारत या नवीन, एकध्रुवीय जगात स्वतःसाठीजागा बनवण्याच्या प्रयत्नात आहे. याचा परिणाम असाझाला की भारत हळूहळू पश्चिमेकडे झुकत गेला. भारताचाप्रत्येक नेता या विवंचनेचा सामना करत आला आहे की,शीतयुद्धानंतरच्या जगात कोणत्याही एका गटात न जातासंबंध कसे प्रस्थापित करावेत.
भारताचा तणावपूर्ण शेजार त्याच्या धोरणात्मक पर्यायांना मर्यादित करतो. ही भारताची दुहेरी कोंडी आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध नेहमीच तणावाचे असतात आणि चीनकडून नेहमीच धोका असतो. अमेरिकेची इच्छा आहेकी भारताने एकाच वेळी अनेक आव्हाने पेलावीत. तथापि भारतासाठी चीन-पाकिस्तान युती हे अधिक मोठे आव्हान आहे. याला दुहेरी कोंडी यासाठी म्हटले जाते, कारण भारताला आपले सैन्य नेहमीच सज्ज ठेवावे लागते. बरेचसे लष्करी साहित्य रशियन बनावटीचे आहे आणि या अवलंबित्वेतून लगेच सुटका होऊ शकत नाही. याशिवाय भारताच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये, जसे की अणु पाणबुडी (एसएसएन), रशियाची मोठी भूमिका आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, दोन आघाड्यांवरचा संघर्ष टाळण्यासाठीभारताला चीनसोबतही संबंध टिकवून ठेवावे लागतात, मग यासाठी व्यापारात काही तडजोडी का कराव्या लागेनात. संबंध टिकवून ठेवण्याचा अर्थ असा आहे की भारत युक्रेनच्या मुद्द्यावर रशियाविरुद्ध फार कठोर भूमिका घेऊ शकत नाही किंवा ट्रम्प यांच्या त्या दाव्याची उघडपणे पुष्टीकरू शकत नाही की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणेबंद केले आहे. ही परिस्थिती गुंतागुंतीची आहे, कारण युक्रेन युद्धापूर्वी जेव्हा युरोप व अमेरिकेला वाटत होते की भारताने रशियाकडून तेल खरेदी करावे, जेणेकरून जागतिक किंमत संतुलित राहील, तेव्हा भारत त्यातून खूप कमी तेल खरेदीकरत असे. त्या काळी रशियाचे तेल भारताच्या ऊर्जासुरक्षेसाठी आवश्यक आहे, असेही म्हटले जात नसे. पणआता परिस्थिती उलट आहे. आज जनमताचा दबाव आहेकी रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली जावी आणिसांगितले जावे की आम्ही एक सार्वभौम देश आहोत.
भारताच्या मागील सरकारांनी अमेरिकन दबावाकडेदुर्लक्ष केले होते आणि इंदिरा गांधींनी रिचर्ड निक्सन आणिहेन्री किसिंजर यांचा खंबीरपणे सामना केला होता, याचीआठवण काढली जाते. पण हे पूर्ण सत्य नाही. दुसरे सत्य हेआहे की इंदिरा गांधी दुसऱ्या गटाच्या, म्हणजेच सोव्हिएतयुनियनच्या जवळ गेल्या होत्या. आपले सरकारवाचवण्यासाठी त्यांना कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा हवा होता,म्हणून 1969 नंतर भारताचा कल सोव्हिएत युनियनकडेवाढला. 9 ऑगस्ट 1971 रोजी भारत सोव्हिएत युनियनचासहकारी बनला. हा करार खूप मजबूत नव्हता, परंतु यातपरस्पर सुरक्षेची बाब समाविष्ट होती. याचा फायदा तेव्हाझाला जेव्हा अमेरिकेचा ‘सातवा ताफा’ भारतावर दबावटाकण्यासाठी आला होता. सोव्हिएत युनियनने संयुक्तराष्ट्रात ‘व्हेटो’ केला आणि भारताला लष्करी साहित्यलवकर उपलब्ध करून दिले, ज्यात पोलंडमधून आलेलेटी-55 टँकही समाविष्ट होते. त्याच वेळी, अमेरिकेचा नवीनसहकारी चीन पाकिस्तानला शस्त्रे पुरवत होता. 1971च्या विजयाने इंदिरा गांधी आणि भारत दोघांची प्रतिष्ठावाढवली आणि निक्सन सरकारला लाजवले, पण याचाअर्थ असा होता का की भारत पूर्णपणे सार्वभौम झालाहोता? नाही. भारताला अनेक प्रकरणांमध्ये सोव्हिएतयुनियनचे समर्थन करावे लागले, जसे की कंबोडिया आणिअफगाणिस्तानच्या मुद्द्यावर. अफगाणिस्तानमुळेभारतासमोर नवीन धोरणात्मक समस्या निर्माण झाल्या.यामुळे अमेरिका-पाकिस्तान संबंध मजबूत झाले, जिहादीसंस्कृती वाढली आणि पाकिस्तान अणुशक्ती बनला. 1969 ते 1989 दरम्यान भारताने आपल्या सार्वभौमत्वाशीतडजोड केली का? उत्तर आहे- नाही. सार्वभौमत्व हा काहीकायमस्वरूपी शिक्का नसतो. अमेरिका असो वा चीन,प्रत्येक देशासाठी सार्वभौमत्वाचा अर्थ आपले निर्णयघेण्याचे स्वातंत्र्य आहे. शीतयुद्धात भारताने सोव्हिएतयुनियनशी संबंध जपले. नंतर अमेरिकेसोबत संबंधसुधारले, रशियासोबतचे संबंध कायम ठेवले, चीनसोबतस्थिरतेचा प्रयत्न झाला आणि पाकिस्तानचा सामनाकरण्याची शक्ती वाढवली गेली. पाहिले तर कोणताही देशपूर्णपणे सार्वभौम नसतो. सर्वजण आपले निर्णय आणिकरार करतात. आज जग एकमेकांवर अवलंबून आहे, जिथेसार्वभौमत्वाकडे लवचिक पद्धतीने पाहावे लागते. सर्व देशनवीन आघाड्या बनवत आहेत आणि आपल्या हितानुसारनिर्णय घेत आहेत. एकदा मी माकप नेते हरकिशनसिंहसुरजित यांना विचारले की, तुम्ही त्या सरकारांना पाठिंबाका देता जे अमेरिकेशी संबंध सुधारतात? त्यांनी उत्तर दिले:भारताला तंत्रज्ञान हवे आहे. पूर्वी हे सोव्हिएत युनियनकडूनमिळायचे, आता मिळत नाही. म्हणून आता अमेरिकेचीगरज आहे. आपण आपल्या राष्ट्रीय हितानुसार काम केलेपाहिजे. सार्वभौमत्वावर हा एक महत्त्वाचा धडा आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) विचारधारा आणि नैतिकतेचेमहत्त्व आता कमी झाले आहे.कोणताही देश पूर्णपणे सार्वभौम नसतो.सर्वजण आपले निर्णय आणि करारकरतात. आज जग एकमेकांवर अवलंबूनआहे. जगातील सर्वच देश आता नवीनआघाड्या बनवत आहेत आणि आपल्याहितानुसार निर्णय घेत आहेत. विचारधाराआणि नैतिकतेला आता पूर्वीसारखे महत्त्वउरलेले नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




