‘सार्वभौमत्व’ हा या वर्षातील सर्वाधिक वापरला जाणाराशब्द ठरू शकतो. ट्रम्प यांनी याला चलनात आणले आहे.जागतिकीकरणावर गेल्या तीन दशकांपासून जे एकमत झालेहोते, ते त्यांनी मोडून काढले आहे. त्या सहमतीने मित्र-देशआणि सहकाऱ्यांसोबतच्या आघाडीत आपले सार्वभौमत्वसामायिक करण्याचे फायदे दाखवले होते. परंतु, ट्रम्प यांनीकॅनडापासून भारतापर्यंत प्रत्येक देशाला सार्वभौमत्वाचेमहत्त्व पुन्हा समजून घेण्यास भाग पाडले . याला तुम्ही आपल्या वसाहतवादी इतिहासाशी जोडूनपाहू शकता किंवा पाश्चात्त्य देशांच्या (अमेरिका)दबावाशीही जोडू शकता, कारण पाकिस्तान त्यांचासहकारी बनला होता. 1974 आणि 1998 मध्येपोखरणमधील अणुचाचण्यांनंतर आपल्यावर आर्थिकनिर्बंध लादले गेले आणि आपल्याला तंत्रज्ञानापासून वंचितठेवले गेले. आपल्या अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर‘रोखा, मागे घ्या आणि संपवा’ या काळातील जो दबावपडला, तो अमेरिकेच्या बाजूनेच होता. सार्वभौमत्वाबाबतभारतात जो व्यापक विचार होता, त्याकडे अमेरिका-विरोधम्हणून पाहिले जाऊ लागले. या अनुभवाने अशाराष्ट्रवादाला जन्म दिला, जो मजबूतही होता आणिअमेरिकेबद्दल संशयाने भरलेलाही. ‘विदेशी हात’ यालानेहमीच अमेरिकेचा हात मानले गेले. त्याचे विरोधक,म्हणजेच सोव्हिएत युनियन आणि त्यांचे सोबती, भारताचेनैसर्गिक मित्र मानले गेले. परंतु हे तोपर्यंतच राहिले, जोपर्यंत1990-91 मध्ये सोव्हिएत युनियन संपुष्टात आले नाही.तेव्हापासून भारत या नवीन, एकध्रुवीय जगात स्वतःसाठीजागा बनवण्याच्या प्रयत्नात आहे. याचा परिणाम असाझाला की भारत हळूहळू पश्चिमेकडे झुकत गेला. भारताचाप्रत्येक नेता या विवंचनेचा सामना करत आला आहे की,शीतयुद्धानंतरच्या जगात कोणत्याही एका गटात न जातासंबंध कसे प्रस्थापित करावेत.
भारताचा तणावपूर्ण शेजार त्याच्या धोरणात्मक पर्यायांना मर्यादित करतो. ही भारताची दुहेरी कोंडी आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध नेहमीच तणावाचे असतात आणि चीनकडून नेहमीच धोका असतो. अमेरिकेची इच्छा आहेकी भारताने एकाच वेळी अनेक आव्हाने पेलावीत. तथापि भारतासाठी चीन-पाकिस्तान युती हे अधिक मोठे आव्हान आहे. याला दुहेरी कोंडी यासाठी म्हटले जाते, कारण भारताला आपले सैन्य नेहमीच सज्ज ठेवावे लागते. बरेचसे लष्करी साहित्य रशियन बनावटीचे आहे आणि या अवलंबित्वेतून लगेच सुटका होऊ शकत नाही. याशिवाय भारताच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये, जसे की अणु पाणबुडी (एसएसएन), रशियाची मोठी भूमिका आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, दोन आघाड्यांवरचा संघर्ष टाळण्यासाठीभारताला चीनसोबतही संबंध टिकवून ठेवावे लागतात, मग यासाठी व्यापारात काही तडजोडी का कराव्या लागेनात. संबंध टिकवून ठेवण्याचा अर्थ असा आहे की भारत युक्रेनच्या मुद्द्यावर रशियाविरुद्ध फार कठोर भूमिका घेऊ शकत नाही किंवा ट्रम्प यांच्या त्या दाव्याची उघडपणे पुष्टीकरू शकत नाही की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणेबंद केले आहे. ही परिस्थिती गुंतागुंतीची आहे, कारण युक्रेन युद्धापूर्वी जेव्हा युरोप व अमेरिकेला वाटत होते की भारताने रशियाकडून तेल खरेदी करावे, जेणेकरून जागतिक किंमत संतुलित राहील, तेव्हा भारत त्यातून खूप कमी तेल खरेदीकरत असे. त्या काळी रशियाचे तेल भारताच्या ऊर्जासुरक्षेसाठी आवश्यक आहे, असेही म्हटले जात नसे. पणआता परिस्थिती उलट आहे. आज जनमताचा दबाव आहेकी रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली जावी आणिसांगितले जावे की आम्ही एक सार्वभौम देश आहोत.
भारताच्या मागील सरकारांनी अमेरिकन दबावाकडेदुर्लक्ष केले होते आणि इंदिरा गांधींनी रिचर्ड निक्सन आणिहेन्री किसिंजर यांचा खंबीरपणे सामना केला होता, याचीआठवण काढली जाते. पण हे पूर्ण सत्य नाही. दुसरे सत्य हेआहे की इंदिरा गांधी दुसऱ्या गटाच्या, म्हणजेच सोव्हिएतयुनियनच्या जवळ गेल्या होत्या. आपले सरकारवाचवण्यासाठी त्यांना कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा हवा होता,म्हणून 1969 नंतर भारताचा कल सोव्हिएत युनियनकडेवाढला. 9 ऑगस्ट 1971 रोजी भारत सोव्हिएत युनियनचासहकारी बनला. हा करार खूप मजबूत नव्हता, परंतु यातपरस्पर सुरक्षेची बाब समाविष्ट होती. याचा फायदा तेव्हाझाला जेव्हा अमेरिकेचा ‘सातवा ताफा’ भारतावर दबावटाकण्यासाठी आला होता. सोव्हिएत युनियनने संयुक्तराष्ट्रात ‘व्हेटो’ केला आणि भारताला लष्करी साहित्यलवकर उपलब्ध करून दिले, ज्यात पोलंडमधून आलेलेटी-55 टँकही समाविष्ट होते. त्याच वेळी, अमेरिकेचा नवीनसहकारी चीन पाकिस्तानला शस्त्रे पुरवत होता. 1971च्या विजयाने इंदिरा गांधी आणि भारत दोघांची प्रतिष्ठावाढवली आणि निक्सन सरकारला लाजवले, पण याचाअर्थ असा होता का की भारत पूर्णपणे सार्वभौम झालाहोता? नाही. भारताला अनेक प्रकरणांमध्ये सोव्हिएतयुनियनचे समर्थन करावे लागले, जसे की कंबोडिया आणिअफगाणिस्तानच्या मुद्द्यावर. अफगाणिस्तानमुळेभारतासमोर नवीन धोरणात्मक समस्या निर्माण झाल्या.यामुळे अमेरिका-पाकिस्तान संबंध मजबूत झाले, जिहादीसंस्कृती वाढली आणि पाकिस्तान अणुशक्ती बनला. 1969 ते 1989 दरम्यान भारताने आपल्या सार्वभौमत्वाशीतडजोड केली का? उत्तर आहे- नाही. सार्वभौमत्व हा काहीकायमस्वरूपी शिक्का नसतो. अमेरिका असो वा चीन,प्रत्येक देशासाठी सार्वभौमत्वाचा अर्थ आपले निर्णयघेण्याचे स्वातंत्र्य आहे. शीतयुद्धात भारताने सोव्हिएतयुनियनशी संबंध जपले. नंतर अमेरिकेसोबत संबंधसुधारले, रशियासोबतचे संबंध कायम ठेवले, चीनसोबतस्थिरतेचा प्रयत्न झाला आणि पाकिस्तानचा सामनाकरण्याची शक्ती वाढवली गेली. पाहिले तर कोणताही देशपूर्णपणे सार्वभौम नसतो. सर्वजण आपले निर्णय आणिकरार करतात. आज जग एकमेकांवर अवलंबून आहे, जिथेसार्वभौमत्वाकडे लवचिक पद्धतीने पाहावे लागते. सर्व देशनवीन आघाड्या बनवत आहेत आणि आपल्या हितानुसारनिर्णय घेत आहेत. एकदा मी माकप नेते हरकिशनसिंहसुरजित यांना विचारले की, तुम्ही त्या सरकारांना पाठिंबाका देता जे अमेरिकेशी संबंध सुधारतात? त्यांनी उत्तर दिले:भारताला तंत्रज्ञान हवे आहे. पूर्वी हे सोव्हिएत युनियनकडूनमिळायचे, आता मिळत नाही. म्हणून आता अमेरिकेचीगरज आहे. आपण आपल्या राष्ट्रीय हितानुसार काम केलेपाहिजे. सार्वभौमत्वावर हा एक महत्त्वाचा धडा आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) विचारधारा आणि नैतिकतेचेमहत्त्व आता कमी झाले आहे.कोणताही देश पूर्णपणे सार्वभौम नसतो.सर्वजण आपले निर्णय आणि करारकरतात. आज जग एकमेकांवर अवलंबूनआहे. जगातील सर्वच देश आता नवीनआघाड्या बनवत आहेत आणि आपल्याहितानुसार निर्णय घेत आहेत. विचारधाराआणि नैतिकतेला आता पूर्वीसारखे महत्त्वउरलेले नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




