दिल्ली तीन टेकड्यांनी वेढलेली आहे. या काहीसामान्य टेकड्या नाहीत. एकेकाळी कचरा टाकण्यासाठीवापरल्या जाणाऱ्या या भूभराव जागा होत्या. आताकचऱ्याचे हे डोंगर दरवर्षी उंचच उंच होत चाललेआहेत. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी हे आरोग्याचेगंभीर धोके आहेत. गाझीपूरचा कचरा डेपो तरजवळपास कुतुबमिनारइतका उंच झाला असून 70 एकरपरिसरात पसरलेल्या कचऱ्याच्या क्षेत्रावर स्थित आहे.भलसावा आणि ओखला येथील कचरा डेपोहीगाझीपूरप्रमाणेच काठोकाठ भरलेले आहेत, विषारी वायूउत्सर्जित करतात आणि किमान 500 मीटर परिघातीलभूजल प्रदूषित झाले आहे. कचरा ही एक जागतिक समस्या आहे. दरडोई कचरा उत्पादन हे आर्थिक वाढीचे एक सशक्त मोजमाप आहे, हे जाणून वाचकांना आश्चर्य वाटेल. हे ग्राहकांचीखरेदी-शक्ती आणि औद्योगिक क्रियाकलापांचे प्रतिनिधी निदर्शक आहे. काही शहरे आणि देश इतरांच्या तुलनेत कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करतात.पुनर्वापर आणि पॅकेजिंगच्या आपल्या संस्कृतीमुळेभारतात दरडोई कचरा उत्पादन अनेक देशांच्या तुलनेतकमी आहे. तरीही, दिल्लीच्या कचरा-डोंगरांवरून हेस्पष्ट होते की, जर प्रभावी व्यवस्थापन नसेल तर कचराविषारी ढिगाऱ्यात बदलू शकतो. ज्याप्रमाणे कचरा निर्मितीहे आर्थिक वाढीचे माप आहे, त्याचप्रमाणे कचऱ्याचेप्रभावी व्यवस्थापन हे विकासाचे माप आहे. हे मीअलीकडेच जपानच्या माझ्या प्रवासादरम्यान शिकले.जपानमध्ये कदाचित जगातील सर्वात व्यापक कचरासंकलन प्रणाली आहे. तिथला समाज विविध प्रकारचेपुनर्वापर करण्यायोग्य पदार्थ आणि विघटनशील वअविघटनशील कचरा वेगळा करण्याबाबत पूर्णपणेशिक्षित आहे. टोकियोमधील एका उपहारात मी स्क्रीनच्यामाध्यमातून ऑर्डर दिली आणि जेवण तयार झाल्यावर तेघेतले. या संपूर्ण प्रक्रियेत माणसांशी खूप कमी संपर्कआला. परंतु ट्रेची विल्हेवाट लावताना एक कर्मचारी तिथेउपस्थित होता, ज्याने ट्रे घेऊन कचरा योग्य डब्यांमध्येटाकला. टोकियोमधील अनेक उपाहारागृहांमध्ये हीचव्यवस्था पाहायला मिळाली. शहरात कचरा संकलनाचेनिकष इतके कडक आहेत की, ग्राहकांवर कचऱ्याच्याविल्हेवाटीची जबाबदारी सोडली जाऊ शकत नाही. टोकियोमध्ये मी अनेक गल्ल्यांपर्यंत एक कागदी ग्लासफेकण्यासाठी कचराकुंडी शोधत राहिले, पण यशस्वीझाले नाही. एका परिसंवादात मी विद्यार्थ्यांच्या एकागटाला विचारले : तुम्ही तुमच्या कचऱ्याचे काय करता?एकाने उत्तर दिले, आम्हाला लहानपणापासून शिकवलेगेले आहे की कचरा घरी घेऊन जा, बाहेर सोडू नका.दुसऱ्याने सांगितले, आमच्यापैकी बहुतेक जण अशावस्तू विकत घेत नाहीत, ज्यामुळे कचरा निर्माण होईलआणि आम्ही कचरा ठेवण्यासाठी एक छोटी पिशवीसोबत ठेवतो. भारतात कचरा विल्हेवाटीचे निकषवेगळे आहेत. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी कचराकुंडीशोधणे कठीण असायचे; आपल्याला जिथे वाटेल तिथेआपण कचरा फेकून द्यायचो. आता किमान विमानतळआणि रुग्णालयांमध्ये कचराकुंड्या मिळतात, पण आपणत्या रिकाम्या करायला विसरतो. बिहारमधील पूर्णिया येथे एका भेटीदरम्यान माझ्या पदरीनिराशा आली, जेव्हा एका वाटसरूने मला सांगितले कीबिहारमध्ये कचराकुंड्या नाहीत. रस्त्याच्या कडेला कचराटाकणे इथे स्वीकार्य आहे. जेव्हा माझ्या सहकाऱ्यानेशालेय मुलांना सांगितले की चॉकलेटचे वेष्टनकचराकुंडीत टाकावे, तेव्हा मुलांनी तेच सांगितले की,आमच्याकडे कचराकुंड्या नाहीत. आपण सार्वजनिकस्वच्छतेबाबत आपला दृष्टिकोन बदलल्याशिवाय स्वच्छराष्ट्र बनू शकत नाही. जर आपल्याला कचऱ्याचे डोंगरसपाट करायचे असतील, तर आपल्याला शाळेपासूनचमुलांना कचरा विल्हेवाटीचे धडे शिकवावे लागतील. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतआपला दृष्टिकोन बदलल्या शिवायआपण स्वच्छ राष्ट्र बनू शकत नाही.कचऱ्याचे डोंगर सपाट करायचे असतील,तर आपल्याला शाळेपासूनच मुलांना धडेशिकवावे लागतील
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



