दिल्ली तीन टेकड्यांनी वेढलेली आहे. या काहीसामान्य टेकड्या नाहीत. एकेकाळी कचरा टाकण्यासाठीवापरल्या जाणाऱ्या या भूभराव जागा होत्या. आताकचऱ्याचे हे डोंगर दरवर्षी उंचच उंच होत चाललेआहेत. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी हे आरोग्याचेगंभीर धोके आहेत. गाझीपूरचा कचरा डेपो तरजवळपास कुतुबमिनारइतका उंच झाला असून 70 एकरपरिसरात पसरलेल्या कचऱ्याच्या क्षेत्रावर स्थित आहे.भलसावा आणि ओखला येथील कचरा डेपोहीगाझीपूरप्रमाणेच काठोकाठ भरलेले आहेत, विषारी वायूउत्सर्जित करतात आणि किमान 500 मीटर परिघातीलभूजल प्रदूषित झाले आहे. कचरा ही एक जागतिक समस्या आहे. दरडोई कचरा उत्पादन हे आर्थिक वाढीचे एक सशक्त मोजमाप आहे, हे जाणून वाचकांना आश्चर्य वाटेल. हे ग्राहकांचीखरेदी-शक्ती आणि औद्योगिक क्रियाकलापांचे प्रतिनिधी निदर्शक आहे. काही शहरे आणि देश इतरांच्या तुलनेत कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करतात.पुनर्वापर आणि पॅकेजिंगच्या आपल्या संस्कृतीमुळेभारतात दरडोई कचरा उत्पादन अनेक देशांच्या तुलनेतकमी आहे. तरीही, दिल्लीच्या कचरा-डोंगरांवरून हेस्पष्ट होते की, जर प्रभावी व्यवस्थापन नसेल तर कचराविषारी ढिगाऱ्यात बदलू शकतो. ज्याप्रमाणे कचरा निर्मितीहे आर्थिक वाढीचे माप आहे, त्याचप्रमाणे कचऱ्याचेप्रभावी व्यवस्थापन हे विकासाचे माप आहे. हे मीअलीकडेच जपानच्या माझ्या प्रवासादरम्यान शिकले.जपानमध्ये कदाचित जगातील सर्वात व्यापक कचरासंकलन प्रणाली आहे. तिथला समाज विविध प्रकारचेपुनर्वापर करण्यायोग्य पदार्थ आणि विघटनशील वअविघटनशील कचरा वेगळा करण्याबाबत पूर्णपणेशिक्षित आहे. टोकियोमधील एका उपहारात मी स्क्रीनच्यामाध्यमातून ऑर्डर दिली आणि जेवण तयार झाल्यावर तेघेतले. या संपूर्ण प्रक्रियेत माणसांशी खूप कमी संपर्कआला. परंतु ट्रेची विल्हेवाट लावताना एक कर्मचारी तिथेउपस्थित होता, ज्याने ट्रे घेऊन कचरा योग्य डब्यांमध्येटाकला. टोकियोमधील अनेक उपाहारागृहांमध्ये हीचव्यवस्था पाहायला मिळाली. शहरात कचरा संकलनाचेनिकष इतके कडक आहेत की, ग्राहकांवर कचऱ्याच्याविल्हेवाटीची जबाबदारी सोडली जाऊ शकत नाही. टोकियोमध्ये मी अनेक गल्ल्यांपर्यंत एक कागदी ग्लासफेकण्यासाठी कचराकुंडी शोधत राहिले, पण यशस्वीझाले नाही. एका परिसंवादात मी विद्यार्थ्यांच्या एकागटाला विचारले : तुम्ही तुमच्या कचऱ्याचे काय करता?एकाने उत्तर दिले, आम्हाला लहानपणापासून शिकवलेगेले आहे की कचरा घरी घेऊन जा, बाहेर सोडू नका.दुसऱ्याने सांगितले, आमच्यापैकी बहुतेक जण अशावस्तू विकत घेत नाहीत, ज्यामुळे कचरा निर्माण होईलआणि आम्ही कचरा ठेवण्यासाठी एक छोटी पिशवीसोबत ठेवतो. भारतात कचरा विल्हेवाटीचे निकषवेगळे आहेत. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी कचराकुंडीशोधणे कठीण असायचे; आपल्याला जिथे वाटेल तिथेआपण कचरा फेकून द्यायचो. आता किमान विमानतळआणि रुग्णालयांमध्ये कचराकुंड्या मिळतात, पण आपणत्या रिकाम्या करायला विसरतो. बिहारमधील पूर्णिया येथे एका भेटीदरम्यान माझ्या पदरीनिराशा आली, जेव्हा एका वाटसरूने मला सांगितले कीबिहारमध्ये कचराकुंड्या नाहीत. रस्त्याच्या कडेला कचराटाकणे इथे स्वीकार्य आहे. जेव्हा माझ्या सहकाऱ्यानेशालेय मुलांना सांगितले की चॉकलेटचे वेष्टनकचराकुंडीत टाकावे, तेव्हा मुलांनी तेच सांगितले की,आमच्याकडे कचराकुंड्या नाहीत. आपण सार्वजनिकस्वच्छतेबाबत आपला दृष्टिकोन बदलल्याशिवाय स्वच्छराष्ट्र बनू शकत नाही. जर आपल्याला कचऱ्याचे डोंगरसपाट करायचे असतील, तर आपल्याला शाळेपासूनचमुलांना कचरा विल्हेवाटीचे धडे शिकवावे लागतील. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतआपला दृष्टिकोन बदलल्या शिवायआपण स्वच्छ राष्ट्र बनू शकत नाही.कचऱ्याचे डोंगर सपाट करायचे असतील,तर आपल्याला शाळेपासूनच मुलांना धडेशिकवावे लागतील
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

