अनेक संमिश्र, ऊन-सावलीसारख्या भावनांसह मीछत्तीसगडचा निरोप घेतला. या राज्यात मी जवळपासदोन आठवडे घालवले. या काळात रात्री उशिरापर्यंतसाल वनस्पतीच्या दाट जंगलातून मोटारसायकलवरूनप्रवास केला होता. चांदण्यात चमकणारी, पाने गळूनगेलेली पांढरट भुताटकी झाडे एक विलक्षण दृश्य निर्माणकरत होती. दुर्गम आदिवासी वस्तीपर्यंत पोहोचण्यासाठीवाहत्या नद्या पार कराव्या लागल्या. बस्तर आणि कवर्धा येथील प्रवासात मी जंगलाच्या आतअसलेल्या गोंड जमातीच्या गावात राहिले. तेथेवीजेसारखी मूलभूत सुविधाही नव्हती. नक्षलप्रभावितम्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात मी यजमानकुटुंबासोबत शेकोटीजवळ बसून आदिवासीजीवनातील गुंतागुंत व त्याबाबत समाजात प्रचलितगैरसमज समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. धुरवाजमातीचे पारंपरिक उत्सव पाहिले. एका पारंपरिक वैद्याच्या झोपडीत औषधी वनस्पतींसोबतपक्ष्यांचे पंजे व अनेक वर्षांपूर्वी जमा केलेले खवल्यामांजराचे खवलेही पाहायला मिळाले. दुर्गम गावांत धातू आणि बांबूपासून हस्तकला करणाऱ्या कलाकारांनाभेटले. त्यांचे असामान्य जीवन आणि दुर्मीळ कौशल्य‘इतर मागासवर्ग’ या सरकारी वर्गीकरणामागे जणूझाकोळून गेले आहे. स्थानिक आदिवासी बाजारात तेंदूपानाच्या द्रोणात मला लांदा हे तांदळापासून बनविलेले पारंपरिक पेय प्यायला मिळाले. ते किंचित दाणेदार असते. एका विशालमोहाच्या झाडाखाली बैगा जमातीच्या प्रेमळ कुटुंबाचीभेट झाली. ते मोहाची दारू तयार करत होते. सकाळचानाश्ता करून बराच वेळ झाला नसतानाही त्यांनीपानाच्या द्रोणातून त्या गरम आणि तीव्र पेयाची चवचाखल्याशिवाय मला जाऊ दिले नाही. आजहीकपाळावर, हातांवर आणि पायांवर पारंपरिक गोंदणगोंदवून घेणाऱ्या बैगा समाजातील महिलांनाही भेटले. त्या मातीच्या घरांत राहतात आणि अस्वल, बिबट्या,वाघ तसेच जंगलातील इतर प्राण्यांसोबत त्याच परिसरातआपले आयुष्य जगतात.त्या मातीच्या घरांत राहतात आणि अस्वल, बिबट्या,वाघ तसेच जंगलातील इतर प्राण्यांसोबत त्याच परिसरातआपले आयुष्य जगतात. संध्याकाळी तीरथगड धबधब्याच्या प्रचंड वेगानेकोसळणाऱ्या पाण्याच्या तुषारांत उभे राहून मलाअचानक स्वातंत्र्याचीविलक्षण अनुभूती आली होती. तोक्षण आणखी काही काळ अनुभवत राहावे, अशीमनापासून इच्छा झाली होती. मात्र, छत्तीसगडच्याआदिवासी समाजात वावरताना मनात एक खोलउदासीही सतत होती. कारण जुने विधी, पारंपरिकपोशाख, केशरचना, जंगल आणि आदिवासी हाटातीलसामाजिक संवाद या सर्व गोष्टी आधुनिकतेच्या लाटेतहळूहळू वाहून जात आहेत. याकडे मात्र कुणाचे लक्षदिसत नाही. एकेकाळी भरड धान्य, कोदो, शेवगा आणिमोहासारख्या पौष्टिक पारंपरिक अन्नावर आधारलेलाआदिवासींचा आहार आता तांदूळ आणि डाळीपुरतामर्यादित झाला आहे. परिणामी कुपोषण वाढले. जंगलआणि त्यातील संसाधनांचा शाश्वत तसेच‘शून्य-कचरा’ तत्त्वावर वापर करण्याचे त्यांचे समृद्धपारंपरिक ज्ञानही हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.या समुदायांनी शतकानुशतके या अमूल्य जंगलांचेसंरक्षण केले. त्यांनाच जंगलापासून दूर केले गेले आहे.वनसंरक्षणाच्या तथाकथित आधुनिक पद्धतींमुळे हाफटका बसू लागला आहे. अनेक आदिवासी समाजांचा जंगलाशी असलेलापारंपरिक संबंधही आता तुटत चालला आहे. आदिवासीकुटुंबांसोबत राहताना, ताऱ्यांनी भरलेल्याआकाशाखाली एका ओझासोबत भोजन करताना आणिसामाजिकदृष्ट्या प्रगत परंपरांच्या कथा ऐकताना माझ्यामनात एकच विचार वारंवार येत राहिला. आदिवासीवडीलधाऱ्यांची आजची पिढी ही भारताच्या प्राचीनस्वदेशी ज्ञानपरंपरेचे जतन करण्याची आपल्याकडेउरलेली कदाचित शेवटची संधी आहे. निसर्गाशी शाश्वत सहअस्तित्व कसे राखावे, हे ज्ञानत्यांच्याकडे आहे. या समुदायाच्या रक्तात आजही जंगलवाहते. अशा त्यांच्या मुलांना केवळ अकुशल मजूरबनविण्याऐवजी त्यांना निसर्गतज्ज्ञ, पर्यटन मार्गदर्शकआणि वनसंरक्षक म्हणून प्रशिक्षित करता येईल. भौतिक लालसा आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाने ग्रासलेल्याया जगात छत्तीसगडच्या प्रवासाने मला पुन्हा एकदाजाणवून दिले की, ‘प्रगती’च्या दिशेने धावताना आपणवाटेत किती मौल्यवान गोष्टी गमावण्याचा धोका पत्करतआहोत. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) भौतिक लालसा, पर्यावरणाच्या ऱ्हासानेग्रासलेल्या या जगात छत्तीसगडच्याप्रवासाने मला पुन्हा एकदा जाणवून दिलेकी, ‘प्रगती’च्या दिशेने धावताना आपणवाटेत कितीतरी मौल्यवान गोष्टीगमावण्याचा धोका पत्करत आहोत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
- मुंबई: प्रवाशांच्या जिवाशी खेळ वांद्रे पश्चिम स्टेशनबाहेर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली कळेना, अपघाताचा धोका वाढला
महाराष्ट्र
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- सिंधुदुर्ग: मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्यात आढळला
- नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर माता साहेब गुरुद्वारा परिसरात प्राणघातक हल्ला; खासगी रुग्णालयात दाखल
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!
- नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."




























Subscribe to my channel




