Sunil Tatkare On NCP Merger : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेनंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण होणार होते, असा दावा शरद पवार यांच्या पक्षाकडून केला जात आहे. तर अजितदादांनी आम्हाला विलीनीकरणाबाबत कोणालाही सांगितलेले नाही, असे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेते सांगत आहेत. असे असतानाच आता खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाच्या विलीनीकरणावर मोठे भाष्य केले आहे.
सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, तटकरेंचे मोठे भाष्य
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज दिल्लीचा दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. सोबतच त्यांनी राज्यसभेच्या सभापतींचीही भेट घेतली. नरेंद्र मोदी, अमित शाहा यांच्या भेटीदरम्यान खासदार सुनील तटकरे हेदेखील सुनेत्रा पवार यांच्यासोबत होते. ही भेट झाल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना विलीनीकरणाच्या मुद्द्यावर थेट आणि मोठं भाष्य केलं आहे. “आमच्या पक्षाच्या भूमिकेचा प्रश्नच येत नाही. कारण मी वारंवार विचारत आहोत की विलीनीकरण कोणत्या पक्षात करायचे. दुसरा मुद्दा म्हणजे आम्ही एनडीएमध्ये आहोत. दादा असतानाच मी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. दादांच्या नेतृत्त्वात आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमची हीच भूमिका आजही आहे. आम्ही भविष्यातही एनडीएसोबत असू,” असे सांगत सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या कथित चर्चेला फेटाळून लावले.
भविष्यातही आम्ही एनडीएतच असणार
एनडीएमध्ये येण्याबाबतची स्पष्टता कोणीतरी करणे आवश्यक आहे. आता विलीनीकरण किंवा काय होईल हा मुद्दा वेगळा आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. आता सुनेत्रा पवार याच विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका होती. त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या सर्व बैठकांत आपण एनडीएत जायला हवे, असे अजितदादा नेहमी म्हणायचे. 2019 साली तीन पक्षांपेक्षा दोन पक्षांनी एकत्र आल्यास राज्याचा चांगला विकास होईल, असा अजितदादांचा विचार होता, असे सांगत भविष्यात आम्ही एनडीएत असणार आहोत, असं थेट विधान तटकरे यांनी केलं.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




