फर्ज, रॉकी, बॉबी यांसारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्री अरुणा ईरानी या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिल्या आहेत. अभिनेते महमूद यांच्यासोबतच्या अफेअरमुळे तर कधी दिग्दर्शक कुकू कोहलीसोबतच्या लग्नामुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. अरुणा ईरानी यांनी बऱ्याच काळापर्यंत त्यांचं लग्न लपवून ठेवलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या अभिनेते महमूद यांच्यासोबतच्या रिलेशनशिपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. महमूद यांनी करिअरच्या सुरुवातीला माझी खूप मदत केली होती, परंतु नंतर हेच नातं माझ्यासाठी शोषण आणि वेदनेचं कारण बनलं होतं, असा धक्कादायक खुलासा अरुणा ईरानी यांनी केला.
‘झूम स्पॉटलाइट सेशन्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्या पुढे म्हणाल्या, “महमूदजींनी माझं उघड शोषण केलं होतं. त्यांचं वागणं बदलत होतं आणि आमचं नातं फारच गुंतागुंतीचं झालं होतं.” अरुणा यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली होती. जेव्हा महमूद यांच्याशी त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांनी अरुणा ईरानी यांना मोठी ऑफर दिली होती. “महमूदजींनी मला पहिल्यांदा काम दिलं होतं. हे नातं एका अर्थाने नाईलाज आणि उपकाराच्या आधारावर सुरू झालं होतं. सुरुवातीला हा सहयोग फायदेशीर होता, परंतु जसजसं अरुणा ईरानी म्हणून माझी वेगळी ओळख निर्माण होऊ लागली, तसतसे ते माझ्यापासून दूर गेले”, असं त्यांनी सांगितलं.
अरुणा ईरानी यांनी असाही खुलासा केला की महमूद यांनी त्यांना लग्नाचं आश्वासन दिलं होतं. “ते मला त्यांची तिसरी पत्नी बनवू इच्छित होते. परंतु तसं होऊ शकलं नाही. महमूद यांचं आधीच दोनदा लग्न झालं होतं आणि त्यांनी पत्नीने त्यांना माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. त्यांच्या कुटुंबाने त्यांना माझ्यासोबत काम करण्यापासून रोखलं होतं. ब्रेकअपनंतर मला कुठेच काम मिळत नव्हतं. आम्ही विवाहित आहोत, अशा अफवा त्याकाळी पसरल्या होत्या. यामुळे माझ्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचला होता आणि माझ्या करिअरवरही वाईट परिणाम झाला होता. महमूद यांनी माझं करिअर घडवलं आणि ते उद्ध्वस्तंही केलं”, अशा शब्दांत अरुणा ईरानी व्यक्त झाल्या.
मी महमूद यांना पूर्णपणे दोषी मानत नाही, कारण सुरुवातीला मलाही त्यांची गरज होती, परंतु नंतर हे नातं शोषणासारखं वाटू लागल्याचंही त्या पुढे म्हणाल्या.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




