गेल्या तीन-चार आठवड्यांत तवांगच्या ईशान्येकडीलआणि असफी-ला घाटाजवळ असलेल्या तक्सिंगभागात एलएसी (वास्तविक नियंत्रण रेषा) ओलांडूनचिनी सैन्याने घुसखोरी केल्याच्या बातम्या समोर आल्या. येथे पीएलएने भारतीय सैन्याला त्यांच्या गस्तीच्याठिकाणांपर्यंत जाण्यापासून रोखल्याचे सांगितले जाते .सरकारने अशी कोणतीही घटना घडल्याचे नाकारलेआहे. मात्र ‘अरुणाचल टाईम्स''ने या घडामोडींचे वृत्तप्रसिद्ध केले. तसेच भारताने तक्सिंग भागातील शेरा-5पॅट्रोलिंग पॉइंट सोडून दिल्यानेच हे घडल्याचा आरोपमाजी गृहसचिव आर. के. सिंग यांनी केला. खरे तर, काही घडले आहे त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. येथील एलएसी मॅकमोहन रेषेने निश्चित झाली आहे, हे चीन मान्यच करत नाही. संपूर्णअरुणाचल प्रदेश हा आपलाच भाग असल्याचा दावा तो करतो. तो या भागाला ‘झांगनान'' किंवा ‘दक्षिण तिबेट''असे म्हणतो. 1962 च्या भारत-चीन युद्धात चीनने संपूर्ण ‘नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी''वर ताबा मिळवला होता.तेव्हा अरुणाचल प्रदेश याच नावाने ओळखला जातअसे. युद्धानंतर चीनने आपले सैन्य मॅकमोहन रेषेच्याउत्तरेला मागे घेतले. पण 1950 च्या दशकापासूनच रेषेच्यामूळ मार्गाबाबत मतभेद आहेत. या कारणामुळे भारतआणि चीन यांच्यात दाव्या-प्रतिदाव्यांचे राजकारणचालत आले आहे. 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांच्या बीजिंग दौऱ्याच्यापूर्वसंध्येला एका चिनी गस्ती पथकाने असफी-लाजवळ भारतीय सैनिकांच्या एका लहान तुकडीचे शस्त्रहिसकावून घेतले होते. नंतर त्यांनी हे सैन्य आणि त्यांचीशस्त्रे एका भारतीय ऑब्झर्व्हेशन पोस्टकडे सोपवलीहोती. एलएसीवरील चिनी घुसखोरीत विशिष्ट पद्धतदिसते. एखादा अधिकृत दौरा ठरतो किंवा जवळ येतो,तेव्हा बातमी बनेल अशी घटना घडवून आणली जाते.एलएसी ही दोन्ही देशांना मान्य असलेली सीमा नाही, हेदाखवणे हाच त्यामागील उद्देश असतो. 2013 मध्येचीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या भारत दौऱ्यापूर्वीहीचिनी गस्ती पथक पूर्व लडाखमधील एलएसी ओलांडूनभारताच्या हद्दीत 19 किलोमीटर आत आले होते. त्यांनीराकी नाल्याजवळील एका जागेवर ताबा मिळवलाहोता. यामुळे भारतीय गस्ती पथकांना देपसांग बुल्जभागात प्रभावीपणे गस्त घालणे शक्य राहिले नव्हते. नंतरचीनने आपले सैन्य मागे घेतले. 2014 मध्ये शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्यापूर्वसंध्येलाही चिनी सैनिकांनी एलएसी ओलांडली.वादग्रस्त भागात रस्ता बनवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीदोन्ही बाजूंच्या शेकडो सैनिकांमध्ये चकमक झाली.जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यादरम्यानही हा तणाव कायमहोता. 2019 मध्ये भारताने जम्मू-कश्मीरचे दोनकेंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले, तेव्हा चीननेत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शीजिनपिंग नरेंद्र मोदींसोबतच्या दुसऱ्या अनधिकृत शिखरपरिषदेसाठी चेन्नईत आले. तेव्हा लडाखच्या पॅंगॉन्गतलाव भागात चिनी गस्त अचानक वाढली. यातूनच पुढेभारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. आतापुढील महिन्यात शी जिनपिंग पुन्हा भारतात येऊ शकतातआणि चीनच्या खोडसाळ हालचाली पुन्हा दिसूलागल्या आहेत. यामागे चीनचा नेमका काय हेतू असतो,हे समजणे कठीण आहे. चेन्नई शिखर परिषदेनंतर चीननेपूर्व लडाखमधील भारतीय ठाण्यांची नाकेबंदी का केलीहोती, हे समजणे नवी दिल्लीसाठीही कठीण गेले होते.चीन इथे एक खेळ खेळत आहे. 2017 पासून चीनच्यानागरी व्यवहार मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशातील विविधठिकाणांना स्वतः दिलेली नवी नावे प्रसिद्ध केली.अशा 6याद्यांद्वारे 112 नावे घोषित केली. 7 ऑगस्ट रोजीभारताने त्याला प्रत्युत्तर देत 27 ठिकाणांची अधिकृतनावे जाहीर केली. तेव्हा चीनचा तिळपापड झाला. वस्तुस्थिती हीच आहे की, अरुणाचलमधील लोकांचातिबेटशी वांशिक संबंध नाही. या भागाला ‘दक्षिण तिबेट''असे नाव देऊन चीन एक संदेश देऊ पाहत असेल. पणप्रत्यक्ष युद्ध छेडण्याव्यतिरिक्त तो या प्रकरणात फारकाही करू शकत नाही. आजची स्थिती 1962 पेक्षावेगळी असून भारत आता एक अण्वस्त्रधारी देशहीआहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एलएसीवरील चिनी घुसखोरीमध्ये एकविशिष्ट पद्धत पाहायला मिळते. एखादाअधिकृत दौरा असतो, तेव्हा अशा घटनाघडवल्या जातात. एलएसी ही दोन्हीदेशांना परस्पर मान्य सीमा नाही, हेदाखवणे हाच त्यामागील उद्देश असतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
महाराष्ट्र
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू

























Subscribe to my channel




