पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:शिंगांमध्ये आक्रमकता, शेपटीत‎ सुरक्षा, दोन्हीचे महत्त्व वेगळे

एखादी गोष्ट म्हणी किंवा उदाहरणांतून पटवून देण्यात संत तुलसीदास‎यांचा हात कोणी धरू शकत नव्हते. गरुडाशी संवाद साधताना त्यांनी‎म्हटले होते— ‘रामचंद्र के भजन बिनु जो चह पद निर्बान, ज्ञानवंत‎अपि सो नर पसु बिनु पूँछ बिषान।'' म्हणजेच, श्रीरामांच्या भक्तीशिवाय‎मोक्ष मिळवू पाहतो, तो माणूस कितीही ज्ञानी असला, तरी तो शेपटी व‎शिंगे नसलेल्या जनावरासारखाच आहे. इथे मोक्ष म्हणजे केवळ‎मृत्यूनंतरची अवस्था असा अर्थ घेऊ नये. मनातील वाईट विचार निघून‎जाणे, आयुष्यात खरी शांती मिळणे म्हणजेच मोक्ष होय. पण यासाठी‎देवाचे भजन करत राहिले पाहिजे. इथे त्यांनी प्राण्यांची तुलना शिंगे व‎शेपटीशी केली आहे. शिंगांमध्ये आक्रमकता तर शेपटीत स्वतःचे रक्षण‎करण्याची ताकद असते. तुलसीदास म्हणतात की, या दोन्ही गोष्टी‎नसतील तर तो प्राणी काहीच कामाचा उरत नाही. माणसात हे दोन गुण‎असावेत. स्पर्धेच्या युगात थोडे आक्रमक व सोबत नम्रताही राहावी.‎तरुण पिढीने तुलसीदासांच्या या ओळींचा हाच खरा अर्थ समजून ‎घ्यावा. ‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *