पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:संधी शोधण्यापेक्षा त्या ‎ओळखणे आवश्यक‎

ज्यांच्या स्मृती थोड्या ताज्या आहेत, त्या सर्वांना शाळेत शिकत‎ असताना आपण कोणत्या श्रेणीत होतो हे आठवत असेल. तर जे लोक‎त्या वेळी खूप हुशार होते, पहिल्या बाकावर बसायचे, ते आज कुठे आहेत‎ आणि ज्यांना वर्गात कुणी विचारतही नव्हते, ते कुठे आहेत, याचा शोध‎घ्या. एक गोष्ट समोर येईल की यशासाठी केवळ हुशार मेंदू आणि खूप‎जास्त योग्यताच कामाला येत नाही. आणखी एक गोष्ट आहे, जी‎यशाला पूर्ण करते आणि ती म्हणजे- संधीचा लाभ उठवणे. जेव्हा‎ आपण मिळालेल्या संधींचा लाभ घेतो, तेव्हा यशाची शक्यता वाढते.‎संधी सर्वांना मिळतात, तुम्ही ती कशी पकडता, याचे एक उदाहरण‎ हनुमानजी देतात. सुंदरकांड हनुमानजींसाठी एक संधी आहे, ज्यामध्ये ‎श्रीरामांनी हनुमानजींची निवड केली की त्यांनी लंकेत जावे. संधी ‎आयुष्यात आली, हनुमानजींनी ती पकडली आणि त्या एका रात्रीत ‎हनुमानजी संपूर्ण जगात रामदूत या नावाने ओळखले गेले. संधींची‎ ओळख होणे हीच यशाची गुरुकिल्ली ठरते.‎

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *