भारताची बांगलादेशला मोठी भेट Image Credit source: टीव्ही 9 मराठी
बांगलादेशमध्ये नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, या निवडणुकीमध्ये बीएनपीला बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला मोठं यश मिळालं. तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, दरम्यान तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच आता भारत आणि बांगलादेशमधील संबंध पुन्हा एकदा रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. बांगलादेशमधील एका भारतीय उच्चपदस्थ राजदूताने म्हटलं आहे की, आता भारत लवकरच बांगलादेशमधील सर्व व्हिसा सेवा पूर्ववत करेल. यामुळे आता बांग्लादेश आणि भारतामधील संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. बांगलादेशमध्ये मोहम्मद यूनुसचं काळजीवाहू सरकार असताना दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली होती, दोन्ही देशांमध्ये तणाव पहायला मिळत होता. मात्र आता तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.
बांगलादेशच्या एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार बांगलादेशमधील भारतीय उच्चपदस्थ राजदूत अनिरुद्ध दास यांनी म्हटलं आहे की, भारत लवकरच बांगलादेशमधील सर्व व्हिसा सेवा पूर्वत करेल, त्यासाठी आवश्यक पाऊलं उचलली जात आहेत. मेडीकल आणि डबल एन्ट्री व्हिसा आता जारी करण्यास सुरुवात झाली आहे.ट्रॅव्हल व्हिसा आणि दुसऱ्या इतर विभागातील व्हिसा देखील लवकरच पूर्ववत केले जातील. ते बांगलादेशच्या सिलहट डिस्ट्रिक्ट प्रेस क्लबमध्ये बोलत होते.
भारताने 17 डिसेंबर 2025 मध्ये बांगलादेशची व्हिसा सर्व्हिस सस्पेंड केली होती. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी बांगलादेशमध्ये लोकसभेची निवडणूक झाली, बांगलादेशमध्ये आता बीएपीची सत्ता आली आहे. तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे, त्यानंतर भारताकडून ही घोषणा करण्यात आली आहे.
बांगलादेशमध्ये मोहम्मद यूनुस यांचं काळजीवाहू सरकार असताना भारत आणि बांगलादेशमधील संबंध प्रचंड ताणले गेले होते, बांगलादेशकडून वारंवार या काळात शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित केला जात होता. मात्र आता हे चित्र बदलण्याची शक्यता आहे, कारण नव्या सरकारकडून या आधीही हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा चर्चेद्वारे सोडवला जाईल, मात्र त्यामुळे भारत बांगलादेश संबंधांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



