महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळ लवकरच एक मोठा बदल करणार आहे. गेल्या काही वर्षांतील आर्थिक चणचण आणि बसेसची कमतरता यावर मात करण्यासाठी परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीला नवसंजीवनी देणारा कृती आराखडा जाहीर केला आहे. यानुसार एसटीच्या ताफ्यात ८,३०० नवीन बसेस दाखल होणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १११ कोटी रुपयांचा डिजीटल प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
नव्या बसेसचा ताफा: प्रवाशांची प्रतीक्षा संपणार
कोरोनापूर्व काळात एसटीकडे सुमारे १९,००० बसेस होत्या. मात्र निवृत्त होणाऱ्या बसेस आणि नवीन खरेदी अभावी ही संख्या १२,६०० पर्यंत खाली आली होती. आता शासनाने टप्प्याटप्प्याने बसेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ बसेस सुरु करण्यात येणार आहे. येत्या मार्च महिन्यापासून ३,००० नवीन ‘३x२’ आसन रचनेच्या ५५ आसनी बसेस ताफ्यात येतील. या बसेस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या गर्दीच्या मार्गांवर धावतील.
तसेच ग्रामीण व दुर्गम भागात ५,००० साध्या बसेसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दुर्गम व आदिवासी भागासाठी १०० मिडी बसेसही दाखल केल्या जाणार आहेत. खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी २०० अत्याधुनिक (Premium) बसेसची खरेदी केली जाणार आहे.
आर्थिक गणिताची जुळवाजुळव
सध्या एसटीला दररोज १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागत आहे. सध्या एसटीचा खर्च ३५ कोटी असून त्याचे उत्पन्न ३३.५ कोटी इतके आहे. मात्र, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास या योजनांमुळे प्रवाशांचा ओघ वाढला आहे. “बसेस वाढल्या की प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढले की उत्पन्न वाढून एसटी या वर्षाखेर आर्थिक गर्तेतून बाहेर येईल,” असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
सुरक्षेसाठी ७,०३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे
एसटी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १११ कोटी रुपये खर्चून डिजीटल सुरक्षा कवच तयार करण्यात येत आहे. राज्यातील ६३३ महत्त्वाच्या ठिकाणी (बसस्थानके, आगार, विभागीय कार्यालये, कार्यशाळा) एकूण ७,०३५ कॅमेरे बसवले जातील. यात पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित झाले आहेत. मुंबईत उभारलेल्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून संपूर्ण राज्यातील हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. टेलिकम्युनिकेशन इंडिया लिमिटेड ही संस्था या प्रकल्पाचे काम पाहत आहे.
दरम्यान सध्या एसटीने दररोज ५० लाख प्रवासी प्रवास करतात. नवीन ८,३०० बसेस ताफ्यात आल्यानंतर हे लक्ष्य ७० ते ७५ लाखांपर्यंत नेण्याचे महामंडळाचे मानस आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
[embedded content]
शहर
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
महाराष्ट्र
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel




