कल्पना करा की एखादी व्यक्ती सरकारी कार्यालयात जाऊन आपल्याला मिळणाऱ्या अनुदानाचे काय झाले, अशी विचारणा करते. किंवा ते एका विशिष्ट श्रेणीसाठी पात्र असल्याने ते सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी जातात. परंतु तेथील अधिकारी डोळे मिचकावत म्हणतात- “आमच्या नोंदींनुसार तुमचा खूप आधीच मृत्यू झाला आहे. म्हणून तुम्हाला काही लाभ मिळणार नाही.’ यावर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? मला इतरांबद्दल माहिती नाही. परंतु कर्नाटकच्या बेळगावातील ५३ वर्षीय इरप्पा नागप्पा अब्बाई भेटणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला ओरडून म्हणत होते- “माझा मृत्यू झालेला नाही, जिवंत आहे.’ पण कुणीही त्यांना मदत करत नव्हते. कारण सरकारी नोंदींनुसार ते खूप पूर्वी मरण पावले आहेत. आज किंवा उद्या नाही, तर पाच वर्षांपूर्वी. हो. संघर्षाची ही खरी कहाणी बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील सुतगट्टी येथे राहणाऱ्या इरप्पा या एका लहान ऊस उत्पादक शेतकऱ्याची आहे. हे ठिकाण कर्नाटकची राजधानी बेंगळुरूपासून सुमारे ४५० किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे इरप्पा स्वतः त्यांना सहा महिन्यांपूर्वीच कळले की त्यांचे नाव २०२१ मध्ये सरकारी नोंदींमधून वगळण्यात आले होते. त्यांचा मृत्यू रेकॉर्डवर कसा आला हे तुम्हाला आश्चर्य वाटत आहे का? ही कथा आहे. इरप्पांचा मुलगा २०२१ मध्ये मरण पावला. त्यांच्या मुलाचा मृत्यू दाखला तयार करताना गावच्या अधिकाऱ्याने चुकून त्यांच्या वडिलांचीही मृत म्हणून नोंद केली. मृत्युपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याने इरप्पा यांना विचारले की त्यांचे मृताशी काय नाते आहे. इरप्पांनी ते त्यांचे वडील असल्याचे स्पष्टीकरण देऊनही अधिकाऱ्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या वडिलांनाही मृत म्हणून नोंदवले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाला गमावलेल्या इरप्पा त्या दिवशी त्यांच्या स्वतःच्या मृत्यूची नोंद झाली आहे हे त्यांना माहिती नव्हते. २०२५ च्या मध्यात इरप्पा सरकारी ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करण्याशी संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या लघुसिंचन कार्यालयात गेले. त्यांचा अर्ज मंजूर झाला असता तर त्यांना ३ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकले असते. अनुदान मंजूर झाले. परंतु इरप्पा यांना आर्थिक मदत मिळण्यात एक अधिकृत नोंद अडथळा ठरली. त्यात असे म्हटले होते की ते मृत व्यक्तीचे पुत्र होते. त्यांचेही ८ जुलै २०२१ रोजी निधन झाले. त्यामुळे त्यांना कोणत्याही सरकारी लाभांसाठी अपात्र ठरवण्यात आले. गेल्या पाच महिन्यांपासून इरप्पा नावाचा हा शेतकरी आपली कैफियत घेऊन सरकारी कार्यालयांत खेटे मारत आहे. मला स्पर्श करून बघा. मी जिवंत आहे की नाही पाहावे, असे आर्जव तो लोकांकडे करत आहे - असा विरोधाभास क्वचितच कुणी अनुभवला असेल. आजही त्यांना आपण जिवंत आहोत, हे सिद्ध करण्याचे अविश्वसनीय काम करावे लागत आहे. म्हणजेच आपण चालते-बोलते भूत नाही, हे सांगावे लागत आहे. त्यांच्या घरापासून तहसीलदारांच्या कार्यालयापर्यंत त्यांना खेटे मारावे लागतात. त्यासाठी दीड तास लागतो. हा काळ चिंता आणि अनिश्चिततेने भरलेला असतात. आपण जिवंत परतू की नाही असा विचार करून ते घराबाहेर पडतात. तुम्ही विचार करत आहात तसे मला म्हणायचे नाही. सरकार त्यांचे अस्तित्व मान्य करेल का, असा प्रश्न आहे. प्रत्येक वेळी अधिकारी त्यांना सांगतात, अशा सुधारणांसाठी एक औपचारिक प्रक्रिया आहे. ती स्थानिक पातळीवर लगेच करता येत नाही. तहसीलदारांनी त्यांचा अर्ज स्वीकारला असून प्रक्रिया सुरू केली आहे. हा अहवाल जिल्हा सांख्यिकी कार्यालय आणि तेथून बेंगळुरूला पाठवला आहे. संपूर्ण प्रक्रियेला आणखी एक महिना लागू शकतो.
फंडा असा की- या कटू अनुभवातून एक धडा घेतला पाहिजे की अशा बेजबाबदार सरकारी विभागांकडून कोणतेही काम करून घेत असाल तेव्हा आपण दिलेली माहिती त्या प्रणालीत अचूकपणे समाविष्ट झाली किंवा नाहीची खात्री करा. अन्यथा, इरप्पा यांच्यासारखी चपला झिजवण्याची वेळ येऊ शकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

