माणसाच्या आयुष्यात नेहमी चढउतार येतात. कधी सुखाचे क्षण असतात तर कधी दु:खाचे क्षण असतात. त्या काळात तुम्ही कसे वागता? ती परिस्थिती कशी हाताळता यावर सर्व काही अवलंबून असतं. महाराष्ट्रातही अशाच दोन घटना घडल्या आहेत. राज्यात सध्या इयत्ता बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थीनीला वर्गातच चक्कर आली. तिला लगेच रुग्णालयात अॅडमिट केलं. तिच्यावर उपचार सुरू केले. बरं वाटायला लागल्यावर तिने रुग्णालयात बसून पेपर सोडवला. दुसरी घटना तर अत्यंत हृदयद्रावक आहे. वाचून कुणाच्याही मनात कालवाकालव झाल्याशिवाय राहणार नाही. काय आहे ही घटना?
अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान एक धक्कादायक पण तितकीच दिलासादायक घटना समोर आली आहे. हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि च्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या अमरावती विभागीय मंडळांतर्गत सुरू असलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीची अचानक प्रकृती बिघडली होती. 21 फेब्रुवारी रोजी गणिताची परीक्षा सुरू असताना मूर्तीजापूर तालुक्यातील हरिपूर येथील अनंतराव देशमुख ज्युनिअर कॉलेज येथील श्रेया गुणवंत देशमुख हिची सकाळी सुमारे 10:50 वाजता प्रकृती अचानक खालावली आणि चक्कर येऊन ती बेशुद्ध पडल्याने परीक्षा केंद्रातील कर्मचारी आणि उपस्थित पालकांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या घटनेची माहिती केंद्र संचालकांनी तत्काळ वरिष्ठांना कळवली.
विभागीय अध्यक्ष संदीप सांगवे यांनी तातडीने मार्गदर्शन करत त्यानुसार सकाळी 11:40 वाजता संबंधित अधिकाऱ्यांनी महाजन रुग्णालयात भेट देत विद्यार्थिनीच्या प्रकृतीची विचारपूस केली. तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर विद्यार्थिनीने परीक्षा देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर मूर्तीजापूर येथून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका रुग्णालयात पोहोचवण्यात आली. शिक्षकांच्या उपस्थितीत आणि नियमांचे पालन करत विद्यार्थिनीने रुग्णालयातच गणिताचा पेपर पूर्ण केला.
घरी आईचे पार्थिव… आणि…
दुसरी घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. भंडारा येथील विद्यार्थ्याची आई अनेक दिवसापासून दुर्धन आजाराने आजारी होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या आदल्याच रात्री काळाने सुखरामची परीक्षा घेतली. त्याच्या आईचा मृत्यू झाला. परीक्षेच्या तणावात आई पाठराखण करत असते. मात्र आता त्या आईचेच छत्र हरपल्याने विद्यार्थ्याचे अश्रू अनावर झाले. मात्र आईचे स्वप्न पूर्व करावे या उद्देशातून सुखराम निदराम भुसारी या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्याने स्वतःला सावरले आणि धैर्य दाखवत करिअरमधील पहिला पेपर दिला. सुखराम निदराम भुसारी असे विद्यार्थ्याचे नाव असून तो भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल पालांदूर येथील विद्यार्थी आहे. आईचे छत्र हरवून गेल्याने विद्यार्थ्याने धैर्य न सोडता शुक्रवारी जड अंतःकरणाने मराठीचा पेपर दिला. विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक केले जात असून शिक्षणप्रती असलेली तडमड दाखविली आहे.
पेपरफुटीप्रकरणी दोघांना अटक
दरम्यान, नागपुरात बारावी पेपरफुटी प्रकरणी ट्युशन संचालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. निशिकांत मून (मानकापूर) फरहान अख्तर (कामगारनगर) अशी त्यांची नावे आहेत. निशिकांत मून हा शिकवणी वर्ग चालवत होता, तर फरहान हा तिथे शिक्षक म्हणून काम करत होता. सिव्हिल लाइन्स येथील सेंट उर्मूला हायस्कूल परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. रसायनशास्त्राच्या पेपरदरम्यान विद्यार्थिनीच्या झडतीत स्मार्टफोन सापडला. व्हॉट्सअॅप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरे अपलोड होत होती. ‘एक्सआयआय’ नावाच्या 21 सदस्यीय ग्रुपवर पेपर फोडण्यात करण्यात आला होता. मोबाईलमध्ये 16 फेब्रुवारीचा भौतिकशास्त्र पेपरही या ग्रुपवर आढळला. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक तपासातून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शहर
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
महाराष्ट्र
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


