सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांना मिळालेल्या कथित क्लीन चीटवरून महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. पार्थ पवार यांना क्लीनचीट देणारी बातमी पूर्णपणे खोटी आणि राजकीय हेतूने पेरलेली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील काही नेते स्वतःच्या हातात सूत्रे घेण्यासाठी घाई करत आहेत, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पार्थ पवारांबद्दल भाष्य केले. कोणताही अधिकृत अहवाल अद्याप बाहेर आलेला नसताना बातम्या कशा काय छापून येत आहेत? खारगे समितीला असा निकाल देण्याचा किंवा क्लीनचीट देण्याचा कोणताही अधिकार नाही. ही बातमी त्यांच्याच गटाकडून किंवा राजकारण्यांनी युतीचा भाग म्हणून माध्यमांमध्ये पेरली आहे, असे अंजली दमानिया म्हणाले. पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची घाई असल्यानेच ही प्रतिमा सुधारण्याची मोहीम राबवली जात असल्याचेही अंजली दमानिया म्हणाल्या.
अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीवरही अंजली दमानिया यांनी भाष्य केले. अजित पवारांच्या निधनानंतर ज्या प्रकारची घाई केली जात आहे. त्यावरून समाजात मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. माझ्या मते भाजपची बी टीम उरलेले सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी हे सर्व घडवून आणले आहे. त्यांना आता पक्षाची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घ्यायची आहेत, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला.
ब्लॅक बॉक्समधील माहिती का रिकव्हर होत नाही?
यावेळी अंजली दमानिया यांनी प्रशासकीय ढिसाळपणावर बोट ठेवले. ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये नियमांचे उल्लंघन करून डान्स बार सर्रास सुरू आहेत. याचे व्हिडिओ माझ्याकडे रोज येतात. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आणि नाईक यांच्या नवी मुंबईत हे प्रकार सर्वाधिक आहेत. व्ही आर एस कंपनीवर तातडीने गुन्हा दाखल व्हायला हवा होता, पण मुख्यमंत्र्यांनी ते केले नाही. ब्लॅक बॉक्समधील माहिती का रिकव्हर होत नाही?” असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.
पार्थ तुमचा मुलगा आहे म्हणून त्याला सोडून दिले जाते का?
मंत्रालयात आज प्रत्येक कामाला रेट कार्ड आहे. ही लोकं कोणत्या ट्रस्टच्या माध्यमातून पैसे घेतात, याची चौकशी व्हायला हवी. सुनेत्रा पवार जर झिरवाळ यांच्यावर नाराज आहेत, तर त्या पार्थवर का नाहीत? तो मुलगा आहे म्हणून त्याला सोडून दिले जाते का? अशीही टीका अंजली दमानिया यांनी केली. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना मेसेज करून या प्रकरणाच्या अहवालाची PDF मागितली आहे. जोपर्यंत अधिकृत अहवाल समोर येत नाही, तोपर्यंत बातम्या देणे चुकीचे आहे. राजकीय दबावाखाली अहवाल बाहेर येऊ दिले जात नाहीत, जसे एकनाथ खडसे यांच्या प्रकरणात घडले होते, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.
[embedded content]
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



