न्यायाधीशांच्या निकालांमधील विरोधाभास आणिविलंबांमुळे देशातील लोकांमध्ये संताप वाढत आहे. आजजिल्हा न्यायालयांमध्ये सुमारे 5.88 कोटी खटले प्रलंबितआहेत, तरीही तेथे न्यायाधीशांच्या 5721 रिक्त पदांवरभरती होत नाहीये. सर्व उच्च न्यायालयांमध्येही 63.98लाख खटले प्रलंबित आहेत, तिथेही न्यायाधीशांची 325पदे रिक्त आहेत. सुप्रीम कोर्टाचा विचार केल्यास, 2015 ते 2019 या काळाततिथे सुमारे 60 हजार प्रकरणे प्रलंबित होती. ती वाढून आता93 हजारांच्या वर गेली आहे. जिल्हा व उच्चन्यायालयांमधील न्यायाधीशांची रिक्त पदे भरण्याऐवजीसर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीश वाढवण्यासाठीकायद्यात दुरुस्ती केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढल्याने लोकांना लवकर न्यायमिळेल का? याच्याशी संबंधित 5 पैलू समजून घेऊ या. 1. संविधानानुसार बहुतांश प्रकरणांमध्ये अंतिम निकालासाठी उच्च न्यायालय हेच सर्वोच्च न्यायालयअसते. मात्र, प्रभावशाली पक्षकार आणि मोठ्यावकिलांच्या प्रकरणांमध्ये हळूहळू सर्वोच्च न्यायालयातूनच निकाल दिले जाऊ लागले. यामुळे ‘व्हीआयपी जस्टिस’ आणि खटल्यांचा आजार वाढण्यासोबतच विरोधाभासी निकालांचा पूर आला. सबरीमाला प्रकरणाच्यासुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी म्हटले होते की, 2006मध्ये दाखल झालेली याचिका त्याच वेळी कचऱ्याच्याडब्यात टाकली असती, तर न्यायालयीन वाद वाढलानसता. न्यायाधीशांच्या मते, धार्मिक प्रकरणांमध्येन्यायपालिकेने आपली लक्ष्मणरेषा ओलांडू नये. मर्यादितमुद्द्यांवर प्रकरणे लवकर निकाली काढण्याऐवजीलांबलचक तात्त्विक चर्चा सुरू आहेत. यामुळे हजारो इतरखटल्यांचा भार वाढत आहे. 2. संविधान लागू झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे सर्व आठन्यायाधीश एकत्र बसून निवडक खटल्यांमधीलघटनात्मक मुद्दे निश्चित करत असत. खटल्यांची संख्यावाढल्याने ‘डिव्हिजन बेंच’ स्थापन करण्यास सुरुवातझाली. रघुवीर सिंह प्रकरणातील 1989 च्या निकालानुसार,सोयीनुसार दोन किंवा तीन न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापनकेले जाऊ शकते. न्यायालयीन कामकाजाच्या थेटप्रक्षेपणात लोक पाहत आहेत की, बहुतांश प्रकरणांमध्येआपापसात चर्चा न करताच वरिष्ठ न्यायाधीश आदेशलिहून देतात. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ, न्यायाधीशांनी आधीच निकालावरसहमती दर्शवली होती का? तसे असेल तर मगवकिलांच्या युक्तिवादाचा अर्थ काय? जर कनिष्ठ(ज्युनियर) न्यायाधीशांशी चर्चाच झाली नाही, तरत्यांच्यासोबत खंडपीठात बसण्याची गरज काय? दोनन्यायाधीशांच्या खंडपीठात दुसरे न्यायाधीश सहमतनसतील, तर प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडेपाठवले जाईल. त्यामुळे दोनऐवजी तीन न्यायाधीशांच्याखंडपीठाच्या स्थापनेतून न्यायाधीशांची योग्यता आणिअनुभवाचा अधिक चांगला फायदा घेण्याची गरज आहे. 3. पश्चिम बंगालमधील मतदार यादी प्रकरणात जिल्हान्यायालयांच्या न्यायाधीशांनी एका महिन्यात लाखो विवादनिकाली काढले होते. जिल्हा न्यायाधीशांच्या दर्जाचे लोक‘रजिस्ट्रार’ बनतात, ज्यांना जिल्हा न्यायालयात फाशीचीशिक्षा देण्यापर्यंतचा अधिकार असतो. सर्वोच्चन्यायालयाच्या नियमांनुसार रजिस्ट्रारला मूळ कागदपत्रे,अनुवादित प्रत, कोर्ट फी प्रकरणांमध्ये सवलतीचा अर्ज,खटल्यांचे लिस्टिंग आणि नियमित अर्जांच्यानिकालासाठी न्यायालयीन आदेश पारित करण्याचाअधिकार मिळायला हवा. यामुळे कनिष्ठ वकिलांनायुक्तिवाद करण्याची संधी मिळण्यासोबतच न्यायाधीशांनामुख्य प्रकरणाच्या सुनावणीसाठी अधिक वेळ मिळेल. 5. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांमध्ये 2020 मध्येझालेल्या बदलानुसार जामीन, खटल्यांचे हस्तांतरणयांसारख्या प्रकरणांची सुनावणी एकल पीठ करू शकते.उल्लेखनीय बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशहोण्यापूर्वी बहुतांश न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीश म्हणून सर्वशक्तिमान असतात. सर्वोच्चन्यायालयाच्या धर्तीवर जर उच्च न्यायालयातहीन्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 65 वर्षे झाले, तर क्वचितचएखादे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात ‘ज्युनियरजज’ म्हणून पदोन्नती घेणे पसंत करतील.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार बहुतांशखटल्यांची सुनावणी एका न्यायाधीशाद्वारे केली जाऊशकते. यामुळे न्यायाधीशांची संख्या न वाढवताही प्रलंबितखटल्यांचा भार कमी होऊ शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) संविधानानुसार बहुतांश प्रकरणांत अंतिमनिकालासाठी उच्च न्यायालय हेच सर्वोच्चन्यायालय असते. मात्र, सध्या लांबलचकतात्त्विक चर्चा सुरू आहेत. यामुळे हजारोप्रकरणांची सुनावणी लांबणीवर पडतआहे आणि खटल्यांचा भार वाढत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



