न्यायाधीशांच्या निकालांमधील विरोधाभास आणिविलंबांमुळे देशातील लोकांमध्ये संताप वाढत आहे. आजजिल्हा न्यायालयांमध्ये सुमारे 5.88 कोटी खटले प्रलंबितआहेत, तरीही तेथे न्यायाधीशांच्या 5721 रिक्त पदांवरभरती होत नाहीये. सर्व उच्च न्यायालयांमध्येही 63.98लाख खटले प्रलंबित आहेत, तिथेही न्यायाधीशांची 325पदे रिक्त आहेत. सुप्रीम कोर्टाचा विचार केल्यास, 2015 ते 2019 या काळाततिथे सुमारे 60 हजार प्रकरणे प्रलंबित होती. ती वाढून आता93 हजारांच्या वर गेली आहे. जिल्हा व उच्चन्यायालयांमधील न्यायाधीशांची रिक्त पदे भरण्याऐवजीसर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीश वाढवण्यासाठीकायद्यात दुरुस्ती केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढल्याने लोकांना लवकर न्यायमिळेल का? याच्याशी संबंधित 5 पैलू समजून घेऊ या. 1. संविधानानुसार बहुतांश प्रकरणांमध्ये अंतिम निकालासाठी उच्च न्यायालय हेच सर्वोच्च न्यायालयअसते. मात्र, प्रभावशाली पक्षकार आणि मोठ्यावकिलांच्या प्रकरणांमध्ये हळूहळू सर्वोच्च न्यायालयातूनच निकाल दिले जाऊ लागले. यामुळे ‘व्हीआयपी जस्टिस’ आणि खटल्यांचा आजार वाढण्यासोबतच विरोधाभासी निकालांचा पूर आला. सबरीमाला प्रकरणाच्यासुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी म्हटले होते की, 2006मध्ये दाखल झालेली याचिका त्याच वेळी कचऱ्याच्याडब्यात टाकली असती, तर न्यायालयीन वाद वाढलानसता. न्यायाधीशांच्या मते, धार्मिक प्रकरणांमध्येन्यायपालिकेने आपली लक्ष्मणरेषा ओलांडू नये. मर्यादितमुद्द्यांवर प्रकरणे लवकर निकाली काढण्याऐवजीलांबलचक तात्त्विक चर्चा सुरू आहेत. यामुळे हजारो इतरखटल्यांचा भार वाढत आहे. 2. संविधान लागू झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे सर्व आठन्यायाधीश एकत्र बसून निवडक खटल्यांमधीलघटनात्मक मुद्दे निश्चित करत असत. खटल्यांची संख्यावाढल्याने ‘डिव्हिजन बेंच’ स्थापन करण्यास सुरुवातझाली. रघुवीर सिंह प्रकरणातील 1989 च्या निकालानुसार,सोयीनुसार दोन किंवा तीन न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापनकेले जाऊ शकते. न्यायालयीन कामकाजाच्या थेटप्रक्षेपणात लोक पाहत आहेत की, बहुतांश प्रकरणांमध्येआपापसात चर्चा न करताच वरिष्ठ न्यायाधीश आदेशलिहून देतात. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ, न्यायाधीशांनी आधीच निकालावरसहमती दर्शवली होती का? तसे असेल तर मगवकिलांच्या युक्तिवादाचा अर्थ काय? जर कनिष्ठ(ज्युनियर) न्यायाधीशांशी चर्चाच झाली नाही, तरत्यांच्यासोबत खंडपीठात बसण्याची गरज काय? दोनन्यायाधीशांच्या खंडपीठात दुसरे न्यायाधीश सहमतनसतील, तर प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडेपाठवले जाईल. त्यामुळे दोनऐवजी तीन न्यायाधीशांच्याखंडपीठाच्या स्थापनेतून न्यायाधीशांची योग्यता आणिअनुभवाचा अधिक चांगला फायदा घेण्याची गरज आहे. 3. पश्चिम बंगालमधील मतदार यादी प्रकरणात जिल्हान्यायालयांच्या न्यायाधीशांनी एका महिन्यात लाखो विवादनिकाली काढले होते. जिल्हा न्यायाधीशांच्या दर्जाचे लोक‘रजिस्ट्रार’ बनतात, ज्यांना जिल्हा न्यायालयात फाशीचीशिक्षा देण्यापर्यंतचा अधिकार असतो. सर्वोच्चन्यायालयाच्या नियमांनुसार रजिस्ट्रारला मूळ कागदपत्रे,अनुवादित प्रत, कोर्ट फी प्रकरणांमध्ये सवलतीचा अर्ज,खटल्यांचे लिस्टिंग आणि नियमित अर्जांच्यानिकालासाठी न्यायालयीन आदेश पारित करण्याचाअधिकार मिळायला हवा. यामुळे कनिष्ठ वकिलांनायुक्तिवाद करण्याची संधी मिळण्यासोबतच न्यायाधीशांनामुख्य प्रकरणाच्या सुनावणीसाठी अधिक वेळ मिळेल. 5. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांमध्ये 2020 मध्येझालेल्या बदलानुसार जामीन, खटल्यांचे हस्तांतरणयांसारख्या प्रकरणांची सुनावणी एकल पीठ करू शकते.उल्लेखनीय बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशहोण्यापूर्वी बहुतांश न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीश म्हणून सर्वशक्तिमान असतात. सर्वोच्चन्यायालयाच्या धर्तीवर जर उच्च न्यायालयातहीन्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 65 वर्षे झाले, तर क्वचितचएखादे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात ‘ज्युनियरजज’ म्हणून पदोन्नती घेणे पसंत करतील.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार बहुतांशखटल्यांची सुनावणी एका न्यायाधीशाद्वारे केली जाऊशकते. यामुळे न्यायाधीशांची संख्या न वाढवताही प्रलंबितखटल्यांचा भार कमी होऊ शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) संविधानानुसार बहुतांश प्रकरणांत अंतिमनिकालासाठी उच्च न्यायालय हेच सर्वोच्चन्यायालय असते. मात्र, सध्या लांबलचकतात्त्विक चर्चा सुरू आहेत. यामुळे हजारोप्रकरणांची सुनावणी लांबणीवर पडतआहे आणि खटल्यांचा भार वाढत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!


























Subscribe to my channel

