वडिलांसोबतच्या वादातून छ्त्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या वडिलांचाही त्याच डोंगरावरून पडून मृत्यू झाला. पती आणि मुलगा डोळ्यांसमोर गेला हे पाहून तिथे असलेल्या त्या मुलाच्या आईनेही त्याच डोंगरावरून काही क्षणाच्या आत उडी घेत आपले जीवन संपवले. कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय 19), मुरलीधर दामोदर चांदगुडे (वय 48) आणि संगीता मुरलीधर चांदगुडे (वय 42) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना आणि एका संपूर्ण कुटुंबाचा झालेला करुण अंत मन सुन्न करणारा आहे. या पार्श्वभूमीवर, समुपदेशक अलका वाळूंजकर यांनी मांडलेले मानसशास्त्रीय विश्लेषण समाज आणि पालकांसाठी डोळे उघडणारे आहे. वाचा या विशेष लेखातून… आजकाल सकाळी उठून बातम्या वाचताना मनात एक अनामिक धाकधूक (Fear) असते. काहीतरी अघटीत वाचायला मिळणार की काय, अशी भीती वाटते. शनिवारी, 21 ऑगस्ट 2026 च्या सकाळी अशीच एक हृदयद्रावक बातमी नजरेसमोर आली. तिसगाव येथील खवड्या डोंगरावरून एका 19 वर्षीय मुलाने आणि त्याच्या आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतला. हे वाचून मन सुन्न झाले. मृत्यू अटळ आहे हे माहीत असूनही, मृत्यूच्या साध्या विचाराने भलेभले घाबरतात; मग या 19 वर्षांच्या मुलाला त्याची भीती कशी वाटली नसेल? एवढी हिंमत त्याच्यात कुठून आली असेल? काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले..! मरणाची ही भावना एवढी वरचढ (Overpower) कशी झाली? आता समाजाने खडबडून जागे होण्याची वेळ आली आहे. यासाठी सुजाण पालकत्व, उत्तम नातेसंबंध, संवेदनशील समाज, आयुष्यामध्ये उद्दिष्ट निश्चिती, त्यासाठी कष्ट करण्याची तयारी, शिस्त आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सारासार बुद्धी या सगळ्यांची नितांत आवश्यकता आहे. आत्महत्येचे विचार किंवा कृती यामध्ये भावनांचा आवेग वरचढ ठरतो. भावनांच्या नियमनाची (Emotional Regulation) सवय नसेल तर हे कोणत्याही वयात घडू शकते. या घटनेचा केंद्रबिंदू केवळ 'आयफोन' किंवा भौतिक वस्तू नसून, आई-वडिलांचे तणावपूर्ण संबंध, त्यातून होत असलेले कौटुंबिक कलह आणि या सर्व गोष्टींचा मुलावर झालेला मानसिक परिणाम असू शकतो. कारणे कोणतीही असली तरी, कोणतीही अतिरेकी गोष्ट करताना भान नसणे ही गोष्ट केंद्रस्थानी येते. कोणत्याही अतिरेकी विचारांमागे 'अपेक्षा–नकार–निराशा–भावनिक असंतुलन–आवेगपूर्ण कृती' असा घटनाक्रम असतो. मात्र, अशा घटनेचे विश्लेषण करताना एका कारणावर निष्कर्ष न काढता अनेक मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक घटकांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. बातमीत वाचल्यानुसार त्या कुटुंबामध्ये मागील 6 वर्षांपासून कलह होता. हा गृहकलह घरातील कोणत्याही सदस्याच्या मानसिक स्वास्थ्यासाठी घातक ठरतो. घरातील कलह आणि मनावर होणारे संभाव्य परिणाम (Domestic Conflict and Its Impact on Mind) 1. दीर्घकालीन ताण आणि अति-सतर्कता (Chronic Stress आणि Hyperarousal): घरात सतत भांडण, ओरडणे, अपमान किंवा तणाव असेल तर मुलाची मज्जासंस्था (Nervous System) सतत 'धोक्याच्या मोडमध्ये' (Danger Mode) राहू शकते. त्यामुळे चिडचिड, चिंता (Anxiety), झोपेचे प्रश्न आणि भावनिक थकवा (Emotional Exhaustion) वाढू शकतो. 2. भावनिक असुरक्षितता (Emotional Insecurity): पालकांमधील सततच्या संघर्षामुळे मुलाच्या मनात 'माझं घर सुरक्षित आहे का?', 'उद्या काय होईल?' अशी अनिश्चितता निर्माण होते. यातून असुरक्षितता (Insecurity) आणि असहायता (Helplessness) वाढू शकते. 3. स्वतःला दोष देणे आणि अपराधीपणा (Self-blame आणि Guilt): विशेषतः लहान किंवा संवेदनशील मुले पालकांच्या संघर्षाचे कारण स्वतःला मानतात. 'माझ्यामुळे आई-बाबा भांडतात' या विचारातून त्यांच्यात अपराधीपणा (Guilt) आणि कमी आत्मसन्मान (Low Self-Worth) वाढू लागतो. 4. आत्मसात केलेली असहायता (Learned Helplessness): वारंवार प्रयत्न करूनही घरातील परिस्थिती बदलत नाही असे वाटल्यास, 'मी काहीच बदलू शकत नाही' अशी हतबलता निर्माण होते. दीर्घकाळ नैराश्य (Depression) किंवा निराशा (Hopelessness) असलेल्या व्यक्तीत ही अवस्था आत्महत्येच्या विचारांच्या (Suicidal Thinking) जोखमीशी संबंधित असू शकते. 5. भावनिक अनियंत्रण (Emotional Dysregulation): घरात भावना निरोगी पद्धतीने व्यक्त करण्याचे आदर्श उदाहरण (Modelling) नसेल, तर मुलाला राग, भीती, निराशा यांचे नियमन करणे अवघड जाते. परिणामी, आवेगपूर्ण प्रतिक्रिया (Impulsive Reactions) वाढतात. 6. पलायनवादी विचार (Escape Thinking): सततच्या संघर्षातून काही मुलांच्या मनात 'इथून दूर जायचं आहे' अशी पलायनवादी विचारसरणी (Escape-Oriented Thinking) निर्माण होते. अत्यंत ताण आणि इतर धोके (Risk Factors) असल्यास ही विचारसरणी आत्महत्येच्या विचारांपर्यंत (Suicidal Ideation) घेऊन जाऊ शकते. 7. भावनिक जोडणी आणि विश्वासावर परिणाम (Attachment आणि Trust वर परिणाम): घर हे सुरक्षित आधारस्थान असण्याऐवजी संघर्षाचे ठिकाण झाले, तर पालकांशी असलेले भावनिक संबंध (Emotional Connection) कमी होतात. मुलाला 'माझं ऐकून घेणारं कोणी नाही' असे वाटणे विशेषतः धोकादायक ठरू शकते. 8. सामाजिक अलिप्तता (Social Withdrawal): घरातील तणावामुळे मुले मित्रांपासून दूर जातात, संवाद कमी करतात आणि स्वतःच्या भावनांमध्ये अडकून राहतात. त्यामुळे त्यांना मिळणारा संरक्षणात्मक आधार (Protective Support) कमी होतो. 9. झोप, एकाग्रता आणि शैक्षणिक समस्या (Sleep, Concentration आणि Academic Problems): दीर्घकालीन कौटुंबिक ताणामुळे (Chronic Family Stress) झोप, एकाग्रता (Concentration), मेमरी (Memory), शैक्षणिक कामगिरी (Academic Performance) आणि दैनंदिन कामकाजावर (Daily Functioning) परिणाम होतो, ज्यामुळे नैराश्य (Frustration) आणखी वाढते. आत्महत्येचे विचार, भावना आणि कृती यामागील मानसशास्त्रीय कारणे (Psychological Reasons Behind Suicidal Thoughts) उपाय आणि मार्ग (Solution) सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष (Conclusion) मुलांना केवळ सुखी ठेवण्यापेक्षा त्यांना सुख आणि दुःख दोन्ही पेलण्यास सक्षम बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. पालकत्वाचा उद्देश "माझ्या मुलाला कधीच दुःख होऊ नये" हा नसून— "दुःख आले तरी माझं मूल स्वतःला सावरू शकेल" हा असायला हवा. मानसिकदृष्ट्या सुदृढ समाज घडवणे ही आपली सर्वांची जिम्मेदारी आहे. (लेखिका मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक आहेत.) संबंधित वृत्त नाते निरोगी राहण्यासाठी!:राग का येतो, दु:ख का होते, भावनांचे नियमन म्हणजे काय, ते कसे करावे?; जाणून घेऊयात...! महाराष्ट्र हादरवणारे संभाजीनगरमधले ते 3 मृत्यू टळले असते:अशा प्रसंगातून मुलांना कसे सावरावे, कोणता पॉज घ्यावा, वाचा तज्ज्ञांच्या नजरेतून...!
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




