महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. राज्य सरकारने संपूर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा गाजावाजा केला आहे. बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला या अभियानाचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत. राज्यात एकूण ४२ विद्यार्थ्यांवर कारवाई झाली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील सामूहिक कॉपीच्या प्रकाराने शिक्षण विभागाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षेच्या गांभीर्याला हरताळ फासण्यात आला. भरारी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, या केंद्रावर विद्यार्थी कोणत्याही भीतीशिवाय एकमेकांच्या उत्तरपत्रिकांमधून उत्तरे उतरवून काढत होते. विशेष म्हणजे, ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा धाक दाखवून पारदर्शकतेचा दावा केला जातो, त्याच कॅमेऱ्यांमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला. विद्यार्थी एकमेकांशी बोलताना, पेपरची अदलाबदल करताना आणि पर्यवेक्षकांच्या उपस्थितीतच कॉपी करताना स्पष्ट दिसत आहेत.
फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू
या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. केवळ विद्यार्थ्यांवर कारवाई न करता, या प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या यंत्रणेवरच त्यांनी प्रहार केला आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत केंद्रसंचालकासह तब्बल १९ पर्यवेक्षकांवर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावरील जुन्या सर्व कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करून त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या नवीन क्लीन स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केवळ विभागीय चौकशीच नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचालीही सुरू आहेत.
अमरावती अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानी
राज्यातील कॉपी बहाद्दरांची आकडेवारी पाहता शिक्षण विभागात चिंतेचे वातावरण आहे. अमरावती विभागात सर्वाधिक २२ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. ग्रामीण भागात कॉपी पुरवणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे यावरून स्पष्ट होते. पुणे विभागात १० विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच इतर विभाग उर्वरित १० प्रकरणे राज्याच्या इतर भागांत विखुरलेली आहेत.
पालक आणि शिक्षण तज्ज्ञांमध्ये संताप
एकीकडे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक कडक शिस्तीचे स्वागत करत आहे. तर दुसरीकडे जैतापूरसारख्या ठिकाणी होणाऱ्या सामूहिक कॉपीमुळे गुणवत्तेवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. केंद्रावर सीसीटीव्ही असूनही जर पर्यवेक्षक गप्प बसत असतील, तर हे अभियान केवळ कागदावरच आहे का? असा संतप्त सवाल विचारत आहेत.
जैतापूरची घटना ही इतर केंद्रांसाठी इशारा आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही आणि फिरते पथक प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असेल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले.
शहर
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
महाराष्ट्र
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू

























Subscribe to my channel




