महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. राज्य सरकारने संपूर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा गाजावाजा केला आहे. बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला या अभियानाचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत. राज्यात एकूण ४२ विद्यार्थ्यांवर कारवाई झाली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील सामूहिक कॉपीच्या प्रकाराने शिक्षण विभागाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षेच्या गांभीर्याला हरताळ फासण्यात आला. भरारी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, या केंद्रावर विद्यार्थी कोणत्याही भीतीशिवाय एकमेकांच्या उत्तरपत्रिकांमधून उत्तरे उतरवून काढत होते. विशेष म्हणजे, ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा धाक दाखवून पारदर्शकतेचा दावा केला जातो, त्याच कॅमेऱ्यांमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला. विद्यार्थी एकमेकांशी बोलताना, पेपरची अदलाबदल करताना आणि पर्यवेक्षकांच्या उपस्थितीतच कॉपी करताना स्पष्ट दिसत आहेत.
फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू
या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. केवळ विद्यार्थ्यांवर कारवाई न करता, या प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या यंत्रणेवरच त्यांनी प्रहार केला आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत केंद्रसंचालकासह तब्बल १९ पर्यवेक्षकांवर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावरील जुन्या सर्व कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करून त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या नवीन क्लीन स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केवळ विभागीय चौकशीच नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचालीही सुरू आहेत.
अमरावती अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानी
राज्यातील कॉपी बहाद्दरांची आकडेवारी पाहता शिक्षण विभागात चिंतेचे वातावरण आहे. अमरावती विभागात सर्वाधिक २२ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. ग्रामीण भागात कॉपी पुरवणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे यावरून स्पष्ट होते. पुणे विभागात १० विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच इतर विभाग उर्वरित १० प्रकरणे राज्याच्या इतर भागांत विखुरलेली आहेत.
पालक आणि शिक्षण तज्ज्ञांमध्ये संताप
एकीकडे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक कडक शिस्तीचे स्वागत करत आहे. तर दुसरीकडे जैतापूरसारख्या ठिकाणी होणाऱ्या सामूहिक कॉपीमुळे गुणवत्तेवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. केंद्रावर सीसीटीव्ही असूनही जर पर्यवेक्षक गप्प बसत असतील, तर हे अभियान केवळ कागदावरच आहे का? असा संतप्त सवाल विचारत आहेत.
जैतापूरची घटना ही इतर केंद्रांसाठी इशारा आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही आणि फिरते पथक प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असेल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




