उत्क्रांती आणि विकास होणे हा सृष्टीचा नियम आहे. काळ अनुरूप तो होतच राहणार. विकास हा संतुलित हवा. असंतुलित विकास हा विनाशाचे कारण बनतो. कपडे बदलले म्हणून संस्कार बदलत नसतात, संस्कार बदलू नयेत, विसरू नये. सृष्टीमध्ये उत्क्रांती होत गेली, अनेक जीव जातींचा विकास झाला, परंतु विज्ञानाला हे पकडता आले नाही की आत्मिक विकास देखील होत गेला. त्यातच संस्कृती सुरक्षित असते. हजारो वर्षांपूर्वी ज्या घरट्यात चिमणी राहत होती त्याच घरट्यात आज ही राहते. पशुपक्षी प्राण्यांचे जसे रंग रूप होते ते तसेच आहे. सूर्य पूर्वेला उगवत होता आजही पूर्वेला च उगवतो व पश्चिमेलाच मावळतो. फरक माणसात पडला. माणसाने विकासाचा वेगळा अर्थ घेतला. मग कला असो ,साहित्य असो, फिल्म इंडस्ट्री असो, कारखाने असो सर्वांचे स्वरूप बदलणार यात वाद नाही, बदल हे जीवंतपणाचे लक्षण असते. परंतु मूळ आत्मस्वरूपात बदल नको. हाच संस्कार अपेक्षित आहे. चार ठिकाणचे संस्कार गेले म्हणून जगातून संस्कार नष्ट झाले असे नव्हे. रुचिपालटावर आपले नियंत्रण असायला हवे. आणि हे काम साहित्याचे, सामाजिक आणि धार्मिक नायकांचे आहे. साहित्य समाजाला वळण देते. तसेच साहित्य निर्माण व्हावे. नवीन नृत्याचे विचित्र प्रकार आले. तरी स्पर्धेमध्ये लावणी सादर होतेच ना तितक्याच नजाकतीने. लोककलेचा ऱ्हास व्हायला नको. तसेच कलेच्या मूळ स्वरूपातही बदल नको. म्हणूनच विकास व्हावा परंतु तो संतुलित पद्धतीने. आज जगाच्या सोबत चालत असताना भौतिक विकासात आपला देश आणि आपण मागे राहता कामा नये. वैज्ञानिक विकास परम सीमेवर असताना त्यात आपलाही सहभाग असावा ही काळाची गरज आहे, ज्ञानवंतांची मोठी पिढी बाहेर देशात कामासाठी आणि उपजीविकेसाठी मोठ्या प्रमाणावर जाताना दिसते. विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारतीय संशोधकांचे मोठे प्रमाण आहे. हा ज्ञानवंतांचा विज्ञानवंतांचा बाहेर जाणारा लोंढा थांबवला आला तर हाच विकास त्यांच्या माध्यमातून आपल्या देशात होईल. एक पिढी बाहेर जाऊन परत आपल्या देशात येते त्यावेळेस त्यांच्यामध्ये थोडासा बदल घडून आलेला असतो आणि त्यांच्या पुढची पिढीही त्या रंग रूपाची , त्या आवडी-निवडीची बनलेली असते. असाच पूर्वेकडील आपल्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा ऱ्हास होऊन त्यामध्ये हे सांस्कृतिक प्रदूषण होत आहे. म्हणूनच ज्या काही प्रमाणात आपल्याकडे विकास होत आहे त्याच प्रमाणात सांस्कृतिक संतुलन थोडेसे कमी झाले आहे की काय असे वाटते आणि आपलेही राहणीमानात, विचारात, वागण्यात पाश्चिमात्यकरण अधिकाधिक प्रमाणात होत असल्यासची मोठी भीती आहे आणि तसे प्रत्यक्ष दिसत आहे. कोणत्याही समस्येवर घाबरून जाऊन माघार घेतल्यापेक्षा त्याचा संघर्ष केला पाहिजे आणि त्याचे उपाय शोधून त्याप्रमाणे निराकरण केले पाहिजे. विकासही झाला पाहिजे, आपण जगाच्या मागे राहू नये परंतु आपली संस्कृती ही आपल्याला जपायची आहे.आपल्यात असलेला परस्पर आदर आपले संस्कार, आपली जीवनशैली, म्हणजेच आपली भारतीय संस्कृती सांभाळून आपल्याला हे सर्व करायचे आहे. यासाठीच तर आपण आपली पिढी या दृष्टीने घडवली पाहिजे. ही आपल्या प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. म्हणूनच धार्मिक, सांस्कृतिक शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे शैक्षणिक प्रक्रियेमध्ये, धोरणामध्ये या गोष्टींचा अंतर्भाव होतो आहे की नाही हे प्रत्येक भारतीयांनी तपासण्याचे कर्तव्य आहे. पूर्वीच्या आणि आजच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये खूप फरक पडला. आज आपला स्वर्णीम इतिहास आणि जगामध्ये असलेली अद्वितीय अशी भारतीय संस्कृती ही किती प्रमाणामध्ये शालेय अभ्यासक्रमामधून प्रत्यक्ष दिसते ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भारतीय संस्कृतीच्या मूल्यावर आधारित शिक्षणाचा अंतर्भाव शैक्षणिक अभ्यासक्रमात असायलाच हवा. त्यासोबतच आपण स्वतः आपल्या कुटुंबामध्ये पुढच्या पिढीवर आपला धर्म आणि आपल्या संस्कृतीनुसार संस्कार होत आहेत का नाहीत किंवा ते केले पाहिजेत आणि ते आपणच करायचे आहेत. ते आपलेच कर्तव्य आहे हे समजून केले पाहिजे. अजूनही काही भारतीय समाजामध्ये पुढच्या पिढीला लहान मुलांना धार्मिक शिक्षणाला पाठवले जाते, धार्मिक शिक्षणाची व्यवस्था असते त्यामध्ये संस्कृती जपल्या जाते आणि संस्कार होतातही परंतु हे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यातच पुढे भौतिकतेशी लढताना स्पर्धेच्या युगात जगताना या गोष्टींचा विसर पडतो. हेही लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच या ठिकाणी लेखाद्वारे असा आग्रह आहे की विकास व्हावा, आपण जगाच्या मागे नसावे. तांत्रिक विकास व्हावा, तंत्रज्ञान विज्ञान वैद्यकीय सर्व क्षेत्रांमध्ये आपण पुढे गेले पाहिजे. आपल्या प्रतिभेचा, विज्ञानवंतांचा, ज्ञानवंतांचा आपल्याच देशाला उपयोग व्हावा अशी ही योजना कशी अमलात आणली जाईल हा एक विचार व्हावा आणि या विकासासोबत संस्कृतीला न विसरता संस्कृतीचा हात धरून पुढे गेले पाहिजे म्हणूनच हे प्रकर्षाने प्रभावाने येथे मांडायचे आहे की विकास व्हावा परंतु तो संतुलित. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- राज्य सरकारचा मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे छापील पेपर बंद, आता फक्त ई-पेपर व ऑनलाइन बातम्या!
- मुंबई: भिवंडी मध्ये कोहिनूर अपार्टमेंटची ४ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, ९ जणांचा मृत्यूसहित युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
- पुण्यात पावसाचा जोर वाढला! खडकवासला धरणातून २२,८८० क्युसेकने विसर्ग सुरू; मुठा नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट
- पुणे: रेल्वे यार्डात २ ऑगस्टला नऊ तासांचा ब्लॉक; ७ गाड्या रद्द, अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल
महाराष्ट्र
- राज्य सरकारचा मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे छापील पेपर बंद, आता फक्त ई-पेपर व ऑनलाइन बातम्या!
- मुंबई: भिवंडी मध्ये कोहिनूर अपार्टमेंटची ४ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, ९ जणांचा मृत्यूसहित युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
- पुण्यात पावसाचा जोर वाढला! खडकवासला धरणातून २२,८८० क्युसेकने विसर्ग सुरू; मुठा नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट
- हिंगोली: कळमनुरीत कयाधू नदीला महापूर; सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे ६ गावांचा संपर्क तुटला, शेकडो हेक्टरमधील पिके पाण्याखाली
गुन्हा
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

परभणीत एसटी बस पलटली; १५ ते २० प्रवासी जखमी, काहींची प्रकृती गंभीर
लोअर परेलमधील प्ले झोनमध्ये मुलाच्या पास्तामध्ये झुरळ? पालकांचा गंभीर आरोप
वसमतजवळ १९ जनावरे पोलिसांच्या ताब्यात; कत्तलीच्या संशयावरून कारवाई
देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई


























Subscribe to my channel




