पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:जीवनात आत्मज्ञानाचा अंगीकार केल्यास आत्महत्या कमी होतील

स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये दहा इंद्रिये समानच असतात, मात्र, एक विचार या दोघांमध्येही समान आढळतो आणि तो म्हणजे आत्महत्येचा. विपरीत परिस्थिती उद्भवल्यास दोघेही मृत्यूचा विचार करू लागतात, ज्याला ‘जेंडर पॅराडॉक्स’ म्हटले जाते. मात्र, आकडेवारीनुसार महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक प्रमाणात आत्महत्या करतात. एक वस्तुस्थिती अशीही आहे की, आत्महत्येचा प्रयत्न महिला जास्त करतात, परंतु त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण पुरुषांत अधिक असते. आत्महत्या हा असा विचार आणि कृती आहे, जी मानवाने कधीही स्वीकारता कामा नये. ज्या देशात अनेक महात्म्यांनी ‘आत्मा’ या विषयावर इतके उदात्त विचार मांडले आहेत, तिथे दर तासाला 18 लोक आत्महत्या करतात. त्यात तरुणांची संख्या मोठी आहे. विशेषतः परीक्षा काळात पालकांनी मुलांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. लोकांनी आत्मज्ञानाचा योग्य अर्थ लावून तो जीवनात उतरवला, तर आत्महत्या कमी होतील. ‘मन’ शरीराला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त करते, पण ‘आत्मा’ त्याला वाचवण्याचा संदेश देतो.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *