
Mhada High Court : म्हाडानं पेशवाई कारभार करू नये, या शब्दांत कानउघडणी करत तब्बल 48 वर्षे हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबाला हायकोर्टानं गुरूवारी दिलासा दिला आहे. या कुटुंबाला तात्काळ घर देण्याचे आदेश देत ताबापत्र उद्या शुक्रवारी देत त्याची माहिती न्यायालयात सादर करा, अशी ताकीदच हायकोर्टानं म्हाडाला दिली आहे. या प्रकरणावरुन म्हाडाच्या कामकाजाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे.
काय आहे प्रकरण
मुंबईतील मौलाना आझाद मार्गावरील 'झेनत मंझील' या इमारतीत रवींद्रचे गोरखनाथ भातूसे यांचे आजोबा जानू राहत होते. ही इमारत मोडकळीस आल्याने म्हाडाने साल 1975 मध्ये येथील रहिवाशांना वडाळा येथील संक्रमण शिबिरात घरं दिली होती. मात्र काही काळात त्या संक्रमण शिबिराची इमारतही मोडकळीस आली. त्यानंतर भातूसे तुटुंबाला तिथूनही काढण्यात आलं. मात्र, दुसऱ्या संक्रमण शिबिरात घर दिलं गेले नाही. त्यामुळे हे कुटुंब त्यांच्या मूळ गावी सातारा इथं निघून गेलं. पात्र असूनही घर न मिळाल्यानम रवींद्र यांनी ॲड. आकाश जैस्वार यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. ॲड. यशोदीप देशमुख यांनी रवींद्र यांची बाजू मांडली तर म्हाडाकडून ॲड. प्रकाश लाड यांनी युक्तिवाद केला.
|
Sanjay Raut : शिवसेना कोणाची हे पाकिस्तानला माहित पण, संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर प्रहार |
या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खथा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. गेली 48 वर्षे हे कुटुंब आपल्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहे. रवींद्र यांचे आजोबा साल 1975 मध्ये त्यांच्या घरातून बाहेर पडले. तेव्हापासून ते संक्रमण शिबिरातच राहत होते, तिथंच त्यांचे निधन झाले. त्यानंतर तिथं रवींद्र यांच्या वडिलांचंही निधन झालं. दोन पिढ्या गेल्या तरी भातूसे कुटुंबाला त्यांच्या हक्काचं घर काही मिळालेलं नाही, हे अत्यंत चुकीचे आहे, असं मत हायकोर्टानं हे निर्देश देताना व्यक्त केलं.
भातूसे कुटुंब घरासाठी पात्र असूनही त्यांना इतक्या वर्षात घर मिळालेलं नाही. मोडकळीस आलेली इमारत पाडल्यानंतर पात्र रहिवाशांना घर देण्याची जबाबदारी म्हाडाची आहे. इतरांप्रमाणे भातूसे कुटुंबालाही त्यांच्या हक्काचं घर मिळायला हवं होतं. इतकी वर्षे हे कुटुंब हक्काच्या घरासाठी झगडत आहे. या कुटुंबाची आम्हाला फार खंत वाटते, असंही निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




