एक गोष्ट स्पष्ट आहे, आपण हिमालयाबद्दल अजिबात गंभीर नाही. हे आजचे नाही, तर गेल्या दोन दशकांपासून हिमालयात घडणाऱ्या घटना याच गोष्टीकडे इशारा करत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घटनांसाठी हिमालय किंवा तिथल्या लोकांना दोषी धरता येणार नाही. यासाठी दोषी भलतेच कुणीतरी आहेत. स्थानिक रहिवाशी तर इतरांच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत आहेत. नेपाळमधील काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनेनंतर संपूर्ण हिमालयात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे. कारण यापूर्वीच्या दुर्घटनाही कोणतीही पूर्वसूचना देऊन आलेल्या नव्हत्या. नेपाळच्या भोटेकोशी नदीपासून ते बिहारच्या कोशी नदीपर्यंत पुराच्या हाहाकारची दृश्ये समोर आली आहेत. नेपाळमधील या दुर्घटनेचा संबंध भूकंपाशीही जोडला जात आहे. पण हिमनद्यांवर भूकंपाचा तितकासा परिणाम होत नाही. वाढत्या तापमानामुळेच हे बर्फाचे डोंगर कमकुवत झाले असावेत आणि ही दुर्घटना घडली असावी. हिमालय किंवा सीमेला लागून असलेले भाग संवेदनशील आहेत, हे लक्षात घेऊन आपण त्यांची राज्ये किंवा देशांमध्ये पुनर्रचना जरूर केली. येथील पर्यावरणाचा विचार कधी केलाच गेला नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, येथील पर्यावरण समजून घेणे म्हणजे केवळ त्याची संवेदनशीलता समजणे नव्हे. जगभरात होणाऱ्या बदलांचा हिमालयावर काय परिणाम होईल, हे समजण्यात आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत. जगभरात कार्बन उत्सर्जनाची कारणे काहीही असोत- मग त्या आपल्या जीवनशैलीतील सुविधा असोत, चैनीच्या गोष्टी असोत किंवा विकासाचा आराखडा असो. गेल्या 200 वर्षांत झालेल्या कार्बन उत्सर्जनामुळे ग्लोबल वार्मिंगसारखी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. थोडक्यात सांगायचे तर, हिमालय हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. येथील निसर्ग आणि पर्यावरण अतिशय नाजूक आहे. त्यात थोडी छेडछाड केली, तरी त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. कदाचित आपली धोरणे ठरवताना या गोष्टीचा विसर पडला आहे. नेपाळपूर्वी केदारनाथ, सिक्कीम आणि धराली येथे झालेल्या दुर्घटनाही अशाच प्रकारच्या होत्या. नेपाळमध्ये हिमनदी फुटल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला. हिमालयातून निघणाऱ्या सर्व नद्यांना प्रचंड पूर आला आणि काठावरची गावे अन् शहरे वाहून गेली. अशा संकटात पाण्यासोबत प्रचंड प्रमाणात दगड-मातीचा चिखल वाहत येतो. हा चिखल घरे तर उद्ध्वस्त करतोच, शिवाय लोकांनाही वाहून नेतो किंवा गाडतो. अशा परिस्थितीत मदत आणि बचावकार्यासाठी मोठा वेळ लागतो. नेपाळमधील अनेक धरणेही या पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. विकासाचा संपूर्ण पायाच नष्ट झाला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे; कार्बन उत्सर्जन संतुलित होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. याचा सरळ अर्थ असा की, हे उत्सर्जन आपल्यासाठी एक मोठे संकट बनले आहे. यामुळेच तापमान आपल्या नियंत्रणाबाहेर जात आहे आणि त्याचा थेट परिणाम समुद्रांवर होत आहे. समुद्र हे आपल्या पृथ्वीचे हवामान आणि पर्यावरण नियंत्रित करणारे मुख्य घटक आहेत. समुद्रात होणारा कोणताही बदल संपूर्ण पृथ्वीवर परिणाम करतो. याचाच परिणाम म्हणून आपण मोसमी पावसाचे नैसर्गिक चक्र गमावून बसलो आहोत. कधी आणि कुठे अचानक ढगफुटी होईल, याचा काहीही अंदाज लावता येत नाही. हवामान खातेही अनेकदा चक्रावून जाते, कारण निसर्गाचा संपूर्ण समतोल ढासळला आहे. अशा वेळी या दुर्घटनेकडे केवळ काही हजार लोकांचे नुकसान म्हणून पाहू नये. तर ही येणाऱ्या काळात करोडो लोकांसाठी येणाऱ्या मोठ्या संकटाचा इशारा आहे. हे सर्व घडले. कारण जगातील मोठा भाग स्वतःच्या विकास व सुविधांमध्ये व्यस्त आहे. तर त्याचा भुर्दंड या नाजूक पर्यावरणात राहणाऱ्या लोकांना सहन करावा लागत आहे. आपण हे कटू सत्य स्वीकारणार नाही, तोपर्यंत हिमालयास न्याय देऊ शकणार नाही. नेपाळची दुर्घटना , त्याआधीच्या घटना हाच धडा देतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) हिमालय हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. येथील पर्यावरण नाजूक आहे. थोड्याही हस्तक्षेपाने गंभीर परिणाम समोर येतात. दुर्दैवाने आपल्या धोरणांमध्ये ही जाणीव अजूनही दिसलेली नाही. आधी केदारनाथ, सिक्कीम, धरालीमध्येही अशा भयंकर दुर्घटना घडल्या आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- पुणे: सोनकिरणांनी घेतले भुलेश्वराचे अलौकिक दर्शन! सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडताच मंदिर परिसरात दुमदुमले 'हर हर महादेव'चे गजर!
- बीड: पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड ते थेट पुणे रेल्वे सेवा सुरू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पूर्ण केला अजितदादांचा शब्द!
- पुणे: लाडक्या बाप्पा आणि दुर्गादेवीच्या सन्मानपूर्वक पुनर्विसर्जनासाठी महापालिका घेणार खाण भाडेतत्त्वावर!
महाराष्ट्र
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- पुणे: सोनकिरणांनी घेतले भुलेश्वराचे अलौकिक दर्शन! सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडताच मंदिर परिसरात दुमदुमले 'हर हर महादेव'चे गजर!
- मुंबई: आता बास झालं, नाहीतर आम्हालाही कायदेशीर पावले उचलावी लागतील; दिशा सालियन प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा विरोधकांना सज्जड दम!
- बीड: पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड ते थेट पुणे रेल्वे सेवा सुरू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पूर्ण केला अजितदादांचा शब्द!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान

























Subscribe to my channel




