चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून ‘नाही’ म्हणण्याच्या क्षमतेची अपेक्षा केली जायची. असा एक काळ होता. असा अधिकारी राजकीय नेत्याशी असहमती दर्शवताना अजिबात संकोचत नसे. आपल्या विरोधाला निष्ठेचा अभाव मानले जाईल की काय, अशी भीती त्याला वाटत नसे. दुसरीकडे राजकीय नेतेही आपल्या विचारांवर ठाम राहणाऱ्या अधिकाऱ्याच्या धैर्याचा आदर करत असत. तो संबंध आता हळूहळू संपताना दिसत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना कधीकाळी भारताची ‘स्टील फ्रेम’ म्हटले जायचे. देशात राजकीय बदल झाले तरी हे अधिकारी कामात सातत्य ठेवतील व अडचणीचे वाटले तरी नेहमी व्यावसायिक सल्लाच देतील, अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती. मंत्री हे राजकीय इच्छेचे प्रतिनिधित्व करतात. परंतु सनदी अधिकाऱ्याने मंत्र्यांना हे सांगणे अपेक्षित होते की प्रशासकीयदृष्ट्या काय शक्य आहे, कायदेशीरदृष्ट्या काय स्वीकारार्ह आहे आणि संस्थात्मक दृष्टीने काय योग्य आहे. राजकीय नेत्यांना ‘अनुकूल अधिकाऱ्यांची’ गरज नेहमीच राहिली आहे. पण यात नोकरशाहीसुद्धा निर्दोष नाही. किंबहुना अधिकारी स्वतःहूनच राजकीय नेत्याला तडजोड करण्यास तयार असल्याचे सुचवण्याची शक्यता जास्त असते. परंतु या वृत्तीने प्रशासकीय सेवेच्या त्या मूल्याला कमकुवत केले आहे. त्यानुसार अधिकाऱ्याची पहिली निष्ठा तो काम करत असलेल्या संस्थेशी असली पाहिजे. त्याची निष्ठा संविधान, कायदा व लोकहिताशी असायला हवी- पदावरील व्यक्तीशी नाही.या तडजोडीचे फायदे नोकरशाहीलाही मिळतात. आवडीची पोस्टिंग, सेवाकाळातील मुदतवाढ, पदोन्नती, सत्तेच्या जवळ राहण्याची संधी किंवा कारकिर्दीत कोणताही अडथळा येणार नाही याचे आश्वासन. यातून परस्पर सोयींवर आधारित एक युती तयार होते. राजकीय नेत्याला निष्ठा हवी असते; तर नोकरशहाला संरक्षण. दोघेही एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात. मला न्यूयॉर्कमधील एक घटना आठवते. एका मंत्र्याची पत्नी विमानतळावर आली असता तिच्या स्वागतासाठी मंत्र्याचे खाजगी सचिव काही मिनिटे उशिरा पोहोचले. यासाठी त्या सचिवाचा जाहीर अपमान करण्यात आला. तरीही त्यांनी ते गुपचूप सहन केले. कारण त्यांना खाजगी सचिवाचे पद गमावायचे नव्हते. कराराच्या अटींवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जर अशा प्रकारे सत्तेपुढे मान झुकवावी लागत असेल, तर ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यांना पदाने मिळणारा आत्मसन्मान पुन्हा मिळवणे गरजेचे आहे. कारण प्रशासकीय सेवा ही सरकारचे निर्णय नागरिकांसाठी प्रत्यक्ष व्यवहारात आणणारी जागा आहे. यात संस्था स्वतः भ्रष्टाचाराचा भाग बनतात तेव्हाच भ्रष्टाचार फोफावतो. एखादे अयोग्य काम करण्यासाठी नेत्याला ते पूर्ण करून देणाऱ्या अधिकाऱ्याची गरज असते. तर दुसरीकडे, नियमांकडे दुर्लक्ष करण्याच्या बदल्यात संरक्षण हवे असणाऱ्या अधिकाऱ्याला राजकीय पाठिंब्याची गरज असते. हे परस्परावलंबन दिवसेंदिवस मजबूत होत जाते, ज्यामुळे प्रामाणिक अधिकारी एकाकी पडतात.वास्तविक, अशा वातावरणात प्रामाणिक अधिकारीच नकोसा व्यक्ती बनतो. त्याची वारंवार बदली केली जाते. त्याला ‘अडेलतट्टू’ किंवा ‘अडथळा आणणारा’ ठरवले जाते, त्याच्यावर ‘संघभावनेचा’ अभाव असल्याचा आरोप केला जातो. प्रशासकांनी आपली निष्पक्षता गमावली, तर नागरिकांचे हक्क केवळ कायद्यावर अवलंबून राहत नाहीत. ते हक्क नागरिकाची ओळख कोणाशी आहे, तो कोणत्या गटाशी जोडलेला आहे आणि तो किती लाच देऊ शकतो, यावर ठरू लागतात. हे कायद्याच्या राज्याच्या मूळ भावनेच्या पूर्णपणे विरोधात आहे. म्हणूनच ‘स्टील फ्रेम’ला पुन्हा मजबूत करण्यासाठी सुधारणा आवश्यक आहेत. पहिली सुधारणा: बदल्या आणि नियुक्त्यांची प्रक्रिया पारदर्शक व स्पष्ट नियमांनी बांधलेली असावी. तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्ण संरक्षण मिळाले पाहिजे. दुसरी सुधारणा : महत्त्वाचे निर्णय आणि निर्देशांची लेखी नोंद सक्तीची केली पाहिजे, जेणेकरून तोंडी आदेश देऊन नंतर त्यापासून मागे हटण्याची वाव राहणार नाही. तिसरी सुधारणा: व्हिसलब्लोअर अधिकाऱ्यांना विश्वासार्ह संस्थात्मक संरक्षण मिळाले पाहिजे. चौथी सुधारणा: व्यावसायिक कौशल्य आणि प्रामाणिकपणाचा योग्य सन्मान केला पाहिजे. राजकीय नेत्यांनी हेसुद्धा समजून घेतले पाहिजे की, त्यांच्याशी असहमती दर्शवणारा अधिकारी हा त्यांचा विरोधकच असेल असे नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) बेकायदा आदेशांना विरोध करणाऱ्या व्हिसलब्लोअर अधिकाऱ्यांना संरक्षण मिळाले पाहिजे. व्यावसायिक कौशल्य व प्रामाणिकपणाचा सन्मान व्हायला हवा. राजकीय नेत्यांनी हे समजून घ्यावे की, त्यांच्याशी असहमती दर्शवणारा अधिकारी हा त्यांचा विरोधक नसतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- पुणे: सोनकिरणांनी घेतले भुलेश्वराचे अलौकिक दर्शन! सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडताच मंदिर परिसरात दुमदुमले 'हर हर महादेव'चे गजर!
- बीड: पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड ते थेट पुणे रेल्वे सेवा सुरू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पूर्ण केला अजितदादांचा शब्द!
- पुणे: लाडक्या बाप्पा आणि दुर्गादेवीच्या सन्मानपूर्वक पुनर्विसर्जनासाठी महापालिका घेणार खाण भाडेतत्त्वावर!
महाराष्ट्र
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- पुणे: सोनकिरणांनी घेतले भुलेश्वराचे अलौकिक दर्शन! सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडताच मंदिर परिसरात दुमदुमले 'हर हर महादेव'चे गजर!
- मुंबई: आता बास झालं, नाहीतर आम्हालाही कायदेशीर पावले उचलावी लागतील; दिशा सालियन प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा विरोधकांना सज्जड दम!
- बीड: पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड ते थेट पुणे रेल्वे सेवा सुरू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पूर्ण केला अजितदादांचा शब्द!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान

























Subscribe to my channel




