चेतन भगत यांचा कॉलम:‘सत्य निकेतन”ने समाजाचे‎ कोणते सत्य दाखवून दिले?

‎‎‎‎‎‎‎‎‎‎पूर्वी असे मानले जायचे की, शिक्षणाच्या आधारेच‎विद्यार्थी आपल्या गरिबीतून आणि वाईट परिस्थितीतून‎बाहेर पडू शकतात. आज परिस्थिती तशीच असली,‎तरी एक मोठा फरक पडला आहे. ही झेप आता‎दिवसेंदिवस अधिक कठीण होत चालली आहे. सत्य‎निकेतन दुर्घटनेने आपल्याला हेच दाखवून दिले आहे.‎ सत्य निकेतन ही दक्षिण दिल्लीतील एक लहानशी वस्ती‎आहे. ती आलिशान कॉलनींनी वेढलेली आहे. इथे‎लहान-लहान भूखंडांवर दाटीवाटीने बांधलेली घरे‎तणांसारखी वाढत गेली आहेत. यातील अनेक‎इमारतींमध्ये विद्यार्थी लहान-लहान खोल्या भाड्याने‎घेऊन राहतात. ते तिथे कॉलेजचे शिक्षण किंवा प्रवेश ‎‎परीक्षांची तयारी करण्यासाठी राहतात.‎ या वस्तीत विद्यार्थ्यांच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ देणारे ‎‎विविध व्यवसायही चालतात-अन्न पोहोचवणाऱ्या‎सेवा, झेरॉक्सची दुकाने, चहाच्या टपऱ्या, पेइंग गेस्ट ‎‎(पीजी) आणि कोचिंग सेंटर्स. याच वस्तू आणि‎सेवांच्या उपलब्धतेमुळे सत्य निकेतनसारख्या वस्त्या‎फुलत जातात. हे एखाद्या झोपडपट्टीसारखे दिसू शकते; ‎‎फरक एवढाच की, ही शिक्षण-केंद्रित झोपडपट्टी आहे. ‎‎विद्यार्थी येत-जात राहतात. काही जण प्रवेश परीक्षेत‎यशस्वी होतात, तर बहुतांश अपयशी ठरतात. पण या‎विद्यार्थ्यांना वस्तू आणि सेवा पुरवणारे व्यावसायिक‎तिथेच टिकून राहतात. परीक्षेचा निकाल काहीही लागो.‎त्यांची कमाई नेहमीच होते. केवळ नफ्याच्या शोधात‎गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जाते आणि नियम धाब्यावर‎बसवले जातात. अग्निसुरक्षा यंत्रणा नसलेले बेकायदा‎गेस्टहाऊसही भाड्याने दिले जाते; कारण विद्यार्थ्यांकडे‎दुसरा पर्याय तरी काय असतो? 80 वार (720 चौरस‎फूट) जमिनीवर परवानगीपेक्षा जास्त मजले उभारले‎जातात, तरीही कोणाला काही फरक पडत नाही. खोली‎रिकामी असेल, तर कोणी ना कोणी विद्यार्थी ती‎भाड्याने घेईलच. इमारतीच्या चहूबाजूला विजेच्या‎उघड्या तारा लटकत असतात. पण झोपायला एक खाट‎मिळतेय, तोपर्यंत कोणाला काय पडले आहे?‎थोडक्यात सत्य निकेतनचे जगणे बॉलीवूडच्या कॉलेज‎कॅम्पसवर आधारित चित्रपटांसारखे मुळीच नाही.‎देशभरातून कितीतरी तरुण विद्यार्थी अशा ठिकाणी‎येतात आणि जीर्ण, बेकायदा निवाऱ्यात डेरादाखल‎होतात. मग सुरू होतो दोन ते पाच वर्षांचा एक लांब‎आणि कठीण प्रवास. हे एखादे कॉलेज हॉस्टेल नाही.‎इथे ना कोणते ओरिएंटेशन असते, ना वर्गमित्रांशी भेट.‎इथे विद्यार्थ्यांसाठी ना कोणताही कॉमन रूम आहे, ना‎खेळाच्या सुविधा. ना सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. ना‎अवांतर उपक्रम. इथे फक्त एकच उद्देश आहे आणि‎एकच काम-आयुष्याच्या चक्रात सतत भरडले जाणे.‎आणि ते भरडले जातात—दिवस-रात्र. परीक्षा उत्तीर्ण‎होण्याची एकच आशा. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश‎मिळवण्यासाठी किंवा मेडिकल कॉलेजमध्ये‎जाण्यासाठी. किंवा सरकारी नोकरी‎मिळवण्यासाठी—उच्च दर्जाच्या नागरी सेवांपासून ते‎खालच्या स्तरावरील कोणत्याही सरकारी भरतीपर्यंत.‎काहीही सोपे नाही. संधी अत्यंत कमी आहेत—पेपर‎फुटो ना फुटो, कोणाला काही फरक पडत नाही. तुमची‎कोणाला पर्वा नाही. अलीकडच्या दुर्घटनेने दाखवून‎दिल्याप्रमाणे, तुमच्या प्राणाचीही कोणाला पर्वा नाही.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. एक देश व‎समाज म्हणून आपण काय करत आहोत, हा प्रश्न‎आपण स्वतःला विचारला पाहिजे. आपण पुढच्या‎पिढीला कसली संस्कृती देत आहोत? कोणता संदेश‎देत आहोत? भारतात आयुष्य असेच असते, हाच का‎तो संदेश? आपली शिक्षणव्यवस्था तरुणांना खूप कमी‎संधींसाठी अत्यंत तीव्र स्पर्धेत ढकलते, तर आपला‎समाज चांगल्या आयुष्यासाठी पुरेसे पर्यायी मार्ग तयार‎करण्यात अपयशी ठरला आहे. आणि संधींच्या या‎अभावाभोवतीच संशयास्पद व्यवसायाचे एक मोठे‎जाळे उभे राहिले आहे. जेव्हा निराशा हाच एक उद्योग‎बनतो, तेव्हा त्याला काय म्हणावे? सत्य निकेतनचा‎अर्थ ‘सत्याचे घर'' असा होतो. पण या दुर्घटनेने‎विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दुःखद सत्य समोर आणले‎आहे. आपण हवे तर याला एक वेगळी किंवा किरकोळ‎घटना मानून सोडून देऊ शकतो किंवा एका मोठ्या‎सत्याचा सामना करण्यासाठी याचा वापर करू‎शकतो—ते म्हणजे या परिस्थितीत मुळापासून बदल‎करावे लागतील. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎ आपली शिक्षणव्यवस्था तरुणांना‎मोजक्या संधींसाठी अत्यंत तीव्र स्पर्धेत‎ढकलते. चांगल्या आयुष्याकडे‎जाण्यासाठी पुरेसे मार्ग तयार केले.‎समाज अपयशी ठरला आहे. आणि‎संधींच्या या अभावाभोवती संशयास्पद‎व्यवसायाचे जाळे उभे राहिले‎.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *