उत्तर प्रदेश आणि पंजाब ही दोन महत्त्वाची राज्ये आहेत.येथे निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्ष यानिवडणुकांसाठी कंबर कसून कामाला लागले आहेत.नवनवीन जबाबदाऱ्या तयार केल्या जात आहेत आणिनवीन प्रभारी नेमले जात आहेत. सर्व बाजूंनी आणि पूर्णताकदीने तयारी सुरू आहे. कुणी बिनधास्त बसले असेल,एखादा काहीही तयारी करत नसेल, तर ते आपण आहोत.सामान्य माणसे! सर्वसामान्य मतदार! कारण आपल्याला कुणी काहीही म्हणो—अन्नदाता,जनता जनार्दन किंवा आणखी काही—पण सत्य हेचआहे की, दर दोन, अडीच किंवा पाच वर्षांनी होणाऱ्या यानिवडणुकांचे आपण मालक नाही. आपण आपल्यामनाला स्वातंत्र्य दिले आहे, ते फक्त एवढेच की आपणस्वतःसाठी पिंजरा निवडू शकतो. शेवटी राहायचे तरकैदेतच आहे. देशात विविध प्रकारचे कैदखाने आहेत...
विविध प्रकारच्या कैद्यांच्या अवस्थाही.
मुले वजनदार दप्तराच्या ओझ्याखाली शिक्षणात बंदिस्तआहेत. मुली स्वतःच्या सुरक्षिततेच्या भीतीपोटीस्वतःमध्येच सुरक्षित राहण्यास भाग पडल्या आहेत.महिला, वृद्धांच्या बंधनांना तर सीमाच उरलेली नाही.तथाकथित सुसंस्कृत समाज या बंदिस्तपणाला घर,ऑफिस, गल्ली, शेत, शिवार, रस्ता आणि बाजारपेठअशी नावे देतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या कैदेत अडकला आहे, तेव्हा कसले स्वातंत्र्य, कसली लोकशाही आणि कसली निवडणूक? या पक्षांना, या नेत्यांना खरोखरच निवडणूक जिंकायची असेल, तर त्यांनी आधी स्वत:लाया कैदेतून मुक्त करावे. मग त्यांनी राज्य करावे. अगदी चहुकडे. एकतर्फी. मग कोणत्याही नेत्याला मतासाठी गयावया करावी लागणार नाही. लोक स्वतःच आपला तारणहार निवडून देतील. इंग्रज निघून गेल्यानंतर आज विविध बंदिवास दिसतात. त्यातील बहुतांश राजकीय व्यवस्थेनेच उभारले आहेत. आणि यात आपल्यालानवल वाटण्याचेही काही कारण नाही. कारण प्रत्येक बंदिवासाचे उद्घाटन होत असताना आपणच मोठ्या उत्साहाने टाळ्या वाजवल्या आहेत.
सुसंस्कृत समाज म्हटला जाणारा हा मोठा तुरुंग तरआपण स्वतःच तयार केला आहे. जुनाट विचारांच्याचुकीच्या प्रथांच्या अनेक शाखा आपण उघडल्या आहेत. त्यात आपले बालपण, तारुण्य आणि म्हातारपणअडकले आहे. निवडणुकीच्या वेळीही ही बंधने काम करतात. जातीयवादाची कैद ही सर्वात मोठी वदीर्घकालीन आहे. त्यानंतर गाव, शहर, पंचायत, सरपंच,पाटील व नातेवाईक यांचा प्रांतवाद वेगळेच तुरुंग तयारकरतो. निवडणुकीच्या काळात ही बंधने कानठळ्याबसवतात. हिवाळ्याच्या दिवसांत दातांमध्ये फणी धरूनफुंकर मारल्यावर एक प्रकारचा विस्कळीत, बारीक आणिनुकत्याच वयात येणाऱ्या मुलांसारखा तुटक आवाजयेतो, अगदी तसाच. मतदान करताना हे आवाज आणखीमोठे होतात. आपण ही बंधने, या साखळ्या तोडून मतदानकरणार नाही तोपर्यंत अशीच सरकारे येत राहतील.बेफिकीर आणि आळशी. लोकप्रतिनिधी असेच राहतील.हव्यास असलेले आणि टोळीबाज. खरे तर, आपल्यालाया बेड्यांची, या कैदेची सवय झाली आहे. सरकार भ्रष्टनसेल तर काम लवकर होणार नाही असे आपल्यालावाटते. व्यवस्था नीट झाली तर काम पक्के होणार नाहीअसे आपल्याला वाटते. आणि लोकप्रतिनिधी हव्यासअसलेला किंवा टोळीबाज नसेल तर तो बावळट किंवाकमकुवत आहे असे आपण मानतो. मत विकून चांगल्यासरकारचे स्वप्न पाहणाऱ्या मानसिकतेतून आपल्यालाबाहेर पडावेच लागेल. अन्यथा आपण असेच भरडलेजाऊ. व्यवस्था अशीच चालत राहील आणि सरकारेअशीच येत-जात राहतील—घोटाळे करत, सत्य दाबूनटाकत, प्रामाणिकपणाला बाजूला फेकत आणि जनतेलावाऱ्यावर सोडून देणारी. आपली अवस्था आज आहेतशीच राहील. विजेच्या बोर्डावर लावलेल्या जुन्या,गंजलेल्या आणि पानाच्या डागांसारख्या दिसणाऱ्या फ्यूजप्लेटसारखी. औषधांच्या बाटल्यांवर एक अंतिम मुदतलिहिलेली असते. औषध घेताना बहुतेक लोक तीचतारीख पाहतात. ती मुदत संपली की औषध निरुपयोगीठरते. कधीकधी तर ते विषारीही बनते. ‘आप'' नवीनआला होता, तेव्हा त्यांना पाहून काही अंशी वाटले होतेकी, जुन्या पक्षांची मुदत आता संपली आहे. पण तसे होऊशकले नाही. जुने पक्ष अधिक घट्ट रोवले गेले. वाढत गेलेव त्यांच्या भक्कम पकडीने ‘आप''ची पार दाणादाणउडवून दिली. वास्तविक, राजकारण हे नात्यांचा,भावनांचा आणि मानवी मूल्यांचा अनादर केला जातोअशी संस्कृती आहे. या शब्दांची जाणीवही ठेवली जातनाही. एकंदरीत, ही संस्कृती म्हणजेच भावनाशून्यतेचेप्रतीक आहे. ...आणि भावना नसतात तिथेअपमानाशिवाय दुसरे काहीही उरत नाही. आपल्याला या बेड्यांची ,या कैदेची सवय झालीयेखरे तर, आपण या बेड्यांचे व कैदेचे सवयझालेले लोक आहोत. सरकार भ्रष्ट नसेलतर काम लवकर होणार नाही , व्यवस्थानीट झाली तर काम होणार नाही असेवाटते. लोकप्रतिनिधी हावरट किंवाटोळीबाज नसेल तर तो बावळट किंवाकमकुवत आहे असे आपण मानतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; गाड्यांना फटका बसणार? हडपसर-घोरपडी-पुणे मार्गावरील कामाची संपूर्ण माहिती
- मुंबई: महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! आता शेतीशी संबंधित सर्व व्यवहार एकाच डिजिटल छताखाली होणार, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
- पुणे: कात्राज-कोंढवा रस्ता बनला मृत्यूचा सापळा! महापालिका आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणखी एका निष्पाप तरुणीचा बळी
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
महाराष्ट्र
- जालना: अमृता फडणवीस यांनी प्रेमाने जेवणाचं आमंत्रण दिलं, तर भाऊबिजेला नक्की घरी जाईन मनोज जरांगे पाटील
- मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!
- पुणे: रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; गाड्यांना फटका बसणार? हडपसर-घोरपडी-पुणे मार्गावरील कामाची संपूर्ण माहिती
- नांदेड: मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्र ज्वाला! नांदेडमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर्स फाडले, तर मनोज जरांगे पाटलांचा सरकारला सज्जड दम
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा


























Subscribe to my channel



