अभिनेता गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे सध्या सतत चर्चेत आहे. पत्नी सुनीता अहुजाने त्याच्यावर विवाहबाह्य संबंधापासून ते मुलाचं करिअर घडवण्यासाठी काहीच पावलं उचलली नसल्याची टीका केली. इतकंच नव्हे तर “तू तुझ्या वडिलांसारखा अजिबात बनू नकोस” असा सल्ला सुनीताने तिच्या मुलाला दिला. या सर्व आरोपांवर आता गोविंदाने प्रतिकिया दिली आहे. कुटुंबासाठीच मी राजकारणातून बाहेर पडलो आणि साजिद नाडियादवालाकडे मुलासाठी मदत मागितल्याचा खुलासा त्याने केला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने त्याच्या पत्नीच्या आरोपांवर भाष्य केलं.
“कुटुंबासाठी राजकारण सोडलं”
“ज्यावेळी, मी राजकारणातून बाहेर पडलो, तेव्हा मी विचार केला की माझ्यासोबत असलेली स्पर्धा, द्वेष, ईर्षा यांचा माझ्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये. विशेषकरून मुलांखातर मी राजकारण सोडून दिलं. मी साजिद नाडियादवालाकडे मुलाची शिफारस केली. त्याने यशसाठी केबिन दिलं. चित्रपट कसे बनवले जातात, काम कसं चालतं हे सगळं त्याला समजावून सांगितलं. घरात आधीपासूनच असं वातावरण होतं की मी इंडस्ट्रीतील नाती जपण्यात अपयशी ठरलोय. मला फार काही विचारलं गेलंच नाही”, असं गोविंदाने स्पष्ट केलं.
“घरातलेच असं म्हणू लागले तर मी कुठे जाऊ?”
याविषयी गोविंदा पुढे म्हणाला, “मुलांसाठी मी काही करू शकेन, यासाठी मी स्वत: देवाकडे प्रार्थना करतो. माझ्याच घरातले लोक असा विचार करू लागले तर मी कुठे जावं? 18 नवीन दिग्दर्शक आणले, 19-20 निर्माते आणले, 12-13 कलाकार आणले आणि जेव्हा देवाने वेळ दिला, तेव्हा मी पूर्ण सेवा प्रदान केली. या विषयावर मी आणखी चर्चा करणार नाही. याने माझाच अनादर होईल. यशबद्दल बोलायचं झाल्यास, टेक्निकली तो माझ्यापेक्षा उत्तम हे. त्यामुळे त्याला योग्य संधी मिळाली, तर तो नक्की मोठा कलाकार बनू शकेल.”
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या आरोपांवर उत्तर
या मुलाखतीत गोविंदाने त्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या आरोपांवरही उत्तर दिलं. “मला सांगा, माझ्यावर असे आरोप कधी लागले नव्हते? सुरुवातीला अभिनेत्रींना स्पर्श करतानाही माझा हात थरथर कापायचा. तेव्हासुद्धा लोकांनी आरोप केले होते. त्यामुळे जे आरोप लावले जात आहेत, ते माझ्या बालपणातील प्रेम आहे. प्रेमाच्या बाबतीत मी कधीच बरोबर चाललो नाही. तरुणाईतल्या प्रेमानेही मला सोडलं. आता ज्या प्रकारे माझ्यावर आरोप होत आहेत, तर हे म्हातारपणातील प्रेम आहे. मी चार-चार मिस युनिव्हर्स हिरोइन्ससोबत काम केलंय. त्यांच्याकडे मी कधी बघायचोसुद्धा नाही. कोणतीच अभिनेत्री माझ्यावर आरोप करू शकत नाही की मी तिला त्रास दिला किंवा अपशब्द म्हटले”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.
अभिनेत्रीसोबत नाव जोडल्याबद्दल तो पुढे म्हणाला, “जी हिरोइन माझ्या घरी येतेय, माझ्या घरातल्या चित्रपटाने करिअर सुरू होतंय, मी कधीच खोटं बोलणार नाही. मी सर्व कलाकार आणि खासकरून अभिनेत्रींचे आभार मानतो. त्यांच्यामुळे मी वर्षानुवर्षे इंडस्ट्रीवर राज्य करू शकलो. मी कधीच कोणाशी गैरवर्तन करत नाही आणि अशात ती माझं नाव घेत आहे. माझी आई मला म्हणायची की, गोविंद जेव्हा कुटुंबातील चार सदस्यांना तू तुझं जग मानून बसलास, तर एके दिवशी जेव्हा ते तुझी फसवणूक करतील, तेव्हा तू काय करशील? आणि हे जग जे तुझ्यावर प्रेम करतं, ते मूर्ख आहे का? त्यांचे पैसे हे पैसे नाहीत का, त्यांची आब्रू ही आब्रू नाही का? त्यामुळे मी सर्व अभिनेत्रींचा, जे आता आहेत आणि पुढेही बनतील त्यांचं माझ्या घरात स्वागतच ककतो. मी आज याठिकाणी तुमच्यामुळेच आहे.”
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


