कर्ट व्होनेगट यांनी आपल्या ‘प्लेयर पियानो’ (1952) याकादंबरीत एका जगाची कल्पना केली होती. तेथे यंत्रांनीबहुतांश उद्योगांचे स्वयंचलन केले आहे आणि संपूर्णव्यवस्था सांभाळण्यासाठी केवळ काही अभियंते वव्यवस्थापक उरले आहेत. इतर सर्व लोकांच्या अन्न वनिवाऱ्याची व्यवस्था सरकार करते, पण त्यांच्या हातातकोणतेही काम नाही. व्होनेगट यांची ही कल्पनादूरदृष्टीची ठरली का? कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)मानवी कार्यशक्तीचा मोठा भाग अनावश्यक ठरवेल,असे आत्ताच निश्चितपणे म्हणता येणार नाही. मात्रएआय मानवी जीवनाच्या अर्थासमोर गंभीर आव्हानेउभी करत आहे, हे निश्चित आहे. आपली बहुतांश कामे ऑटोमॅट सरासरी आपण अधिक समृद्ध होऊ. परंतुयातून समाधानाची पातळीही वाढायला हवी. संशोधन सांगते की तुमचे उत्पन्न दुप्पट झाले, तरी जीवनाचे मूल्यमापन करण्याचे तुमचे निकषही तितकेच कठोरहोतात. पण जीवनाला अर्थ असणे हा वेगळाच विषयआहे. आपण काम करतो, त्यातून आपल्याला केवळ उत्पन्न मिळत नाही; ते आपल्या ओळखीचाही एक भाग असते. उलट हातात कोणतेही काम नसल्यास पूर्ण उत्पन्नमिळत असूनही त्याचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. वेतनाबरोबरच काम व्यक्तीला शिस्त,आपलेपणाची भावना, सामाजिक प्रतिष्ठा आणिएखाद्या उद्दिष्टात योगदान दिल्याचे समाधान देते. यागोष्टींचे पुनर्वाटप पैशांप्रमाणे करता येत नाही. प्रत्यक्षातएआय किमान तीन प्रकारे जीवनाच्या अर्थाला आव्हानदेत आहे. तुमच्या उद्देशभावनेला कमकुवत करण्यासाठीएआयने तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असण्याची गरज नाही; तेकेवळ कार्यक्षम, पुरेसे चांगले आणि कमी खर्चिकअसले तरी पुरेसे आहे. एखाद्या असामान्य व्यक्तीकडून मागे पडणे वेगळे; पणकेवळ ‘पुरेसे चांगले’ असलेल्या तंत्रज्ञानामुळेअप्रासंगिक ठरणे ही पूर्णपणे वेगळी बाब आहे.याशिवाय, एआयवर आधारित मनोरंजन आणि‘सहवास’ (एआयलाच मित्र समजून त्याच्यासोबत वेळघालवणे) लोकांच्या वेळेचा आणि सामाजिकसंबंधांच्या गरजेचा मोठा भाग व्यापू शकतो. जीवनालाअर्थ देणाऱ्या अधिक आव्हानात्मक अनुभवांची जागा तोघेऊ शकतो. सहज, अखंड जवळीक देऊन एआयप्रयत्न, कर्तव्य, परस्परता, निःस्वार्थपणा आणिअसुविधा यांना मागे टाकू शकतो, जे खऱ्या नात्यांसाठीआवश्यक असतात. एआयशी असलेल्या नात्यातआपल्याकडून बदल्यात काहीच अपेक्षित नसते.प्रत्यक्षात ते नाते नसून उपभोगाचा एक प्रकार असतो.डिजिटल जीवनाने आधीच मानवी संबंध बदललेआहेत. तरुणांमध्ये सोशल मीडियाचा वाढता वापरजीवनातील समाधान कमी होण्याशी संबंधित असल्याचेदिसून आले आहे. यात अद्याप एआयची भूमिका नाही, पण यावरून एवढेस्पष्ट होते की डिजिटल माध्यमांमधील अधिक संपर्कम्हणजे मानवी नात्यांमध्ये अधिक खोली असे नाही. खरेतर, जीवनाचा अर्थ क्वचितच आरामाच्या परिस्थितीतसापडतो. तो एखादे निवडलेले ध्येय गाठण्यासाठीकेलेल्या प्रयत्नांतूनच मिळतो. मग ते स्वतःच्या मुलांचेसंगोपन असो किंवा एखाद्या कौशल्यात प्रावीण्यमिळवणे असो. आयुष्याकडे मागे वळून पाहताना लोकएखाद्या अर्थपूर्ण ध्येयासाठी केलेल्या संघर्षालाचअधिक मौल्यवान मानतात. कदाचित म्हणूनच अधिकसमृद्ध आणि विकसित समाज अधिक सुविधाअनुभवतात; पण जीवनाच्या उद्देशाची अधिक सखोलजाणीव त्यांना होत नाही. हेही लक्षात ठेवले पाहिजे की,एआय मानवी क्षमतांपेक्षा पुढे गेला तरी प्रत्येक प्रकारचेकाम संपणार नाही. संगणक बुद्धिबळात माणसांपेक्षाश्रेष्ठ ठरले, तरी लोकांनी बुद्धिबळ खेळणे सोडलेलेनाही. आजही लोक धावतात, स्वयंपाक करतात, संगीतरचतात, फर्निचर तयार करतात आणि प्रत्यक्षसादरीकरणे पाहण्यासाठी महागडी तिकिटे विकत घेतात. (प्रोजेक्ट सिंडिकेट) जीवनात अर्थाचा शोध क्वचितचसुखसोयींच्या कुशीत लागतो. तो एखादेध्येय गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतूनचसापडतो. मग ते मुलांचे संगोपन असोकिंवा एखाद्या कौशल्यात प्रावीण्यमिळवणे असो. माणूस शेवटी एखाद्याअर्थपूर्ण उद्दिष्टासाठी केलेल्यासंघर्षालाच सर्वाधिक मौल्यवान मानतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
महाराष्ट्र
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- जालना: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात उद्या जालना, बीड, परभणी आणि लातूर कडकडीत बंद; काय सुरू आणि काय राहणार बंद?
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात


























Subscribe to my channel




