गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीचतमिळनाडूत 31 वी दक्षिण प्रादेशिक परिषद पार पडली.या बैठकीत लोकसभेतील सदस्यसंख्या वाढवू नये,अशी मागणी तमिळनाडू आणि कर्नाटकने केली.तमिळनाडू विधानसभेने तर याआधीच तसा ठराव संमतकेला आहे. मात्र लोकसभेच्या जागा वाढवण्याच्याप्रस्तावामुळे एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो. त्यावरफारशी चर्चा झालेली नाही. एवढ्या मोठ्या विस्ताराचासंसदेवर नेमका काय परिणाम होईल? याचा पहिला आणि थेट परिणाम आर्थिक असेल.अतिरिक्त खासदारांचे वेतन, भत्ते, निवासस्थान,कर्मचारी, प्रवास व संसदीय पायाभूत सुविधांवर मोठाखर्च होईल. सध्या प्रत्येक खासदार आपल्यामतदारसंघात वर्षाला 5 कोटी रुपयांपर्यंतच्या विकासकामांची शिफारस करू शकतो. खासदारांची संख्या 543 वरून 850 केल्यास ‘खासदार निधी''''चा खर्च 2,715 कोटींवरून 4,250 कोटीरुपयांवर पोहोचेल. म्हणजेच दरवर्षी 1,535 कोटीरुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केवळ खासदारांची संख्या वाढवून संसदआपोआप मजबूत होत नाही. पक्षांतरबंदी कायदा आणि व्हिपच्या व्यापक वापरामुळेखासदारांना स्वतःच्या पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेणेकठीण जाते. त्यामुळे 300 हून अधिक नवीन खासदारजोडल्याने प्रतिनिधींची संख्या नक्कीच वाढेल. पणसंसदेत स्वतंत्र कायदेतज्ज्ञ किंवा स्वतंत्र विचारांचेआवाज वाढतीलच असे नाही. संसदेच्या वेळेचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.खासदार वाढले की प्रश्न विचारणारे, चर्चेत भाग घेणारेआणि समित्यांमध्ये काम करू इच्छिणारे सदस्यवाढतील. संसदेच्या कामकाजाचे दिवस, प्रश्नोत्तराचातास आणि संसदीय समित्यांची क्षमता न वाढवल्यासउलट प्रत्येक खासदाराला बोलण्याची संधी कमीमिळेल. 1950 च्या दशकात लोकसभेच्या कामकाजाचेसरासरी दिवस वर्षाला 127 होते ते 1990 नंतर घटूनसुमारे 71 दिवसांवर आले. त्यामुळे सहभागाच्या संधी न वाढवता केवळ खासदारवाढवले, तर संसदेतील चर्चेचा दर्जा सुधारणार नाही.लोकसभेच्या विस्ताराचा थेट परिणाम राज्यसभेवरहीहोईल. राज्यसभा ही राज्यांच्या हितांचे रक्षण करूनवेगळ्या प्रकारचे प्रतिनिधित्व देते. लोकसभेचा आकारवाढल्यास राज्यसभेचा संख्यात्मक प्रभाव कमी होईल.विशेषतः दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यसभेचेवजन कमी पडेल. या सर्व चिंतांचा अर्थ असा नाही की लोकसभेचीसदस्यसंख्या कायमची 543 वरच स्थिर ठेवावी. जागावाढवण्यामागेही ठोस कारणे आहेत. प्रत्येक खासदारकिती लोकांचे प्रतिनिधित्व करतो. हे लोकसभेच्याआकारावरून ठरते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी लोकसभेत 489 जागा होत्या आणि देशाचीलोकसंख्या सुमारे 38 कोटी होती. म्हणजेच एक खासदार साधारण 8 लाख लोकांचेप्रतिनिधित्व करत होता. 2024 पर्यंत भारताचीलोकसंख्या 144 कोटी झाली, पण खासदारांची संख्या543 वरच राहिली. त्यामुळे आता एका खासदारामागेसरासरी 26.5 लाख लोक येतात. खासदाराचे काम फक्तसंसदेत मतदान किंवा चर्चा करणे एवढेच नसते. त्यालाआपल्या मतदारसंघातील लोकांचे प्रतिनिधित्व करायचेअसते आणि त्यांच्या समस्या सरकारसमोर मांडायच्याअसतात. मतदारसंघ जितका मोठा, तितकी हीजबाबदारी पार पाडणे कठीण होते. पण त्याआधी आपणलोकसंख्या आणि खासदारांचे नेमके कोणते प्रमाणसाधू इच्छितो, हे ठरवावे लागेल. 144 कोटी लोकसंख्येसाठी 850 खासदार असल्यासएका खासदारामागे सुमारे 17 लाख लोक येतील. 900खासदार केल्यास हे प्रमाण 16 लाखांवर आणि 1,000खासदार केल्यास 14.4 लाखांवर येईल. मग अशा वेळी 850 हीच संख्या योग्य का मानली जावी?भविष्यात लोकसंख्या वाढतच राहील. त्यानुसारवेळोवेळी खासदार वाढवत राहिल्यास लोकसभेचाआकार अवाजवी मोठा होऊ शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) विस्तारित लोकसभेवर किती खर्च येईल,तिचे कामकाज कसे चालेल आणिअतिरिक्त खासदारांमुळे प्रतिनिधित्व वउत्तरदायित्व खरोखर मजबूत होईल का,याचा आधी संसदेने विचार करायलाहवा. या सर्व बाबींचा मेळ घालणारीयोग्य संख्या कोणती, हे आधी निश्चितव्हायला हवे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
महाराष्ट्र
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात

























Subscribe to my channel




