नवनीत गुर्जर यांचा स्तंभ:सोना कितना सोणा है,भारतीय विवाह सोहळ्यांत सोन्याचे वजनच सांगते की लग्न समारंभ किती दिमाखदार झाला..‎

माणूस झोपताना ‘भावशून्य'' होतो तसेच सोन्याचे‎भावही सामान्य माणसासाठी फारसे महत्त्वाचे नसतात.‎ खरेदी करायचे असेल तर कितीही महाग असो, तो खरेदी‎करतोच.‎ ...आणि खरेदी करायचे नसेल तर स्वस्त झाले तरी‎महागच वाटते.‎ इथेही भाव शून्य!‎ तरीही सामाजिक प्रतिष्ठा किंवा वादाचे मुख्य मूळ सोनेच‎असते.‎ ‘फ्रीडम ॲट मिडनाइट ''पासून आजपर्यंत सोने मोठे सोणा‎(सुंदर) आहे. लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपिएर‎यांचे हे पुस्तक अनेक कारणांनी वादात सापडले. त्यात‎एक कारण सोने हेही होते. सोन्याचे सिंहासन.‎ ओडिशाच्या महाराजांची शय्या सोन्याची आहे आणि‎तिची बनावट ब्रिटिश राणीच्या सिंहासनाशी मिळतीजुळती‎आहे असे त्यात म्हटले होते. झाला वाद सुरू!‎ असो, पूर्वी शेअर्स वाढायचे तसेच आता सोने वाढते‎आहे. बाजार जणू थरथराट आणि घराघरांत वाद सुरू‎आहेत.‎ वाढते भाव पाहून कोणी म्हणते- आजच खरेदी करा.‎ कोणी म्हणते- अजून स्वस्त होईल. बे-भाव सोने.‎घराघरांत भाव.‎ पंतप्रधान सांगत आहेत की सध्या सोने खरेदी करू नका.‎खरे तर ते याकडे आंतरराष्ट्रीय संदर्भातून पाहत आहेत.‎ सोने मोठ्या प्रमाणावर आयात केले जाते आणि त्याची ‎‎किंमत डॉलरमध्ये मोजावी लागते. त्यामुळे पंतप्रधानांच्या ‎‎आवाहनाचा सरळ अर्थ परकीय चलन साठा टिकवून‎किंवा वाचवून ठेवण्याचा आहे.‎ हे योग्यही आहे. लाखो रुपये खर्च करून आपण सोन्याचे ‎‎दागिने खरेदी करतो. शोरूममधून बाहेर पडताच पन्नास ‎‎हजार- लाखभर रुपये तर बट्ट्यात जातात.‎ इथेही अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. हॉलमार्क नसेल‎तर 22 कॅरेटचा दागिना विकताना सत्तर-ऐंशी टक्केच खरा ‎‎निघतो. सोन्याविषयीची एक कविता आहे-‎ ‘गढ़ो ऐसो सोना, जास्यूं कान जो टूटे,‎ प्रेम कर्यो, कुछ बैर बसायो!''‎ म्हणजे कान फाटतील असे सोने काय कामाचे? प्रेम केले‎की वैर काढले आहे!‎ असो, भारताच्या संदर्भात पाहिले तर सोन्याशिवाय काम ‎‎चालत नाही.‎ आयुष्यही चालत नाही. दिवसभराच्या धावपळीचे मूळ‎, ‎‎अनेक मोठ्या आजारांवरचा उपाय ‘झोपण्यात''(सोना)‎आहे. आजार दूर ठेवण्यासाठी शांत झोप गरजेची असते.‎एका काळात गळ्यातील वेदना आणि हाताच्या‎लचक्यासाठी सोन्याचा हार किंवा कडे गरजेचे मानले‎जायचे.‎ याच कारणामुळे सोन्याचे वाढलेले भावही अनेक भावना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎जागी करत आहेत. आपल्या देशातील बँकेच्या‎लॉकरमध्ये लाखो टन सोने शांत झोपले आहे. ते खरेदी‎तर केले जाते, पण काही मोजक्या प्रसंगी वापरल्यानंतर‎पुन्हा लॉकरच्या हवाली केले जाते.‎ कितीही मोठे आर्थिक संकट आले तरी सोन्याचे दागिने‎कोणी विकत नाही आणि कोणी विकूही देत नाही.‎ पण प्रत्येक प्रसंगात ते खरेदी करणे मात्र गरजेचे असते.‎ भारतीय लग्नांमध्ये तर सोन्याचे वजनच सांगते की लग्न‎किती दिमाखदार झाले.‎ असो, कोणाला सोने आवडते, तर कोणी त्याची लंका‎बनवते. लंकेवरून एक कठीण प्रश्न आठवला-‎ लंका तर हनुमान जाळून आले होते. मग राजतिलकाच्या‎वेळी रामाने विभिषणाला कोणती लंका सोपवली?‎जळलेली की डागडुजी केलेली?‎ उत्तर अगदी सोपे आहे-‎ उष्णतेमुळे सोने जळत नाही, तर त्याला अधिकच‎चकाकी येते! पण सोन्याशी जुळत नसलेले बिचारे‎गुलजार यांच्यासारखे गोट्या ठेवूनही आपल्या खिशात‎आभाळ सामावून घेतात.‎ ते काहीसे असे-‎ "सैकड़ों बार गिने थे मैंने, जेब में नौ ही कंचे थे!‎ एक जेब से दूसरी जेब में रखते- रखते‎ इक कंचा खो बैठा हूं!‎ न हारा, न गिरा कहीं पर-‎ प्लूटो मेरे आसमान से गायब है!''‎ सोन्याचे भाव वधारतायत ..‎पूर्वी शेअर्स वधारत होते.आता सोन्याचे‎भाव वधारतायत. बाजारात हा थरथराट‎तर आणि घराघरांत वाद सुरू आहेत.‎वाढते भाव पाहून कोणी म्हणते- आजच‎खरेदी करा. कोणी म्हणते- अजून स्वस्त‎होईल. भावाची पर्वा न करणारे सोने; पण‎घराघरांत मात्र त्याचेच भाव सुरू आहेत.‎पंतप्रधान सांगत आहेत की सध्या सोने‎खरेदी करू नका. ते याकडे आंतरराष्ट्रीय‎संदर्भातून पाहत आहेत.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *