मुंबई : महाराष्ट्रात शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघाती निधन झाल्यानंतर केवळ चारच दिवसात ७५ संस्थांना अल्पसंख्याकांचे प्रमाणपत्र जारी झाल्याचे उघडकीस आले आहे. अल्पसंख्याक विभागाचा प्रभार अजित पवार यांच्याकडे होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑगस्ट २०२५ पासून कोणत्याही संस्थेला प्रमाणपत्र जारी झालेले नव्हते, परंतू २८ जानेवारीनंतर अचानक संस्थांना मंजूरी दिली गेली.
२९ जानेवारी रोजी Poddar International School च्या २५ शाळांना एकाच दिवशी अल्पसंख्यांक संस्थेचा दर्जा दिला गेला. याच प्रकारे सेंट झेवियर्सच्या पाच शाळांना आणि स्वामी शांती प्रकाश आणि देवप्रकाश ट्रस्टच्या चार शाळांना देखील प्रमाणपत्र जारी केले आहे. २८ जानेवारीच्या दुपारी ३.०९ वाजता श्री माता कन्या सेवा संस्थेला प्रमाणपत्र मिळाले आणि याच दिवशी अजितदादा यांचे विमान अपघातात निधन झाले होते. निधन झाले त्या दिवशी देखील सात संस्थांना मंजूरी देण्यात आली. १ फेब्रुवारी ( रविवारी ) रोजी कोणतेही प्रमाणपत्र जारी झाले नाही, परंतू २ फेब्रुवारी रोजी पुन्हा मंजूरी मिळण्यास सुरुवात झाली. काही अनुमोदन सायंकाळी ६.४५ आणि ६.५८ वाजेपर्यंत नोंदवले गेले.
अल्पसंख्यांक दर्जा का महत्वाचा ?
शिक्षण संस्थेला अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्यानंतर शाळांना अनेक नियमातून सूट मिळते.
१ – आरटीई अंतर्गत २५ टक्के आरक्षित नियमातून सुट मिळते.
२ – शिक्षक भरतीत अनिवार्य TET ची गरज नाही
३ – अल्पसंख्यांक कल्याण योजनांतून अतिरिक्त फंडींग
४ – दान आणि व्यवस्थापनात अधिक स्वातंत्र्य
तांत्रिक उणीवा ( खेळ मैदान आणि क्रीडा शिक्षक विवरण आदी ) कारणांनी ऑक्टोबरपासून प्रक्रिया रोखली होती. नंतर हा विभाग अजित पवार यांच्याकडे सोपविली होता. काँग्रेस नेते अक्षय जैन यांनी आरोप केला की राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुखवटा जाहीर केला असतानाही मंत्रालयात फायलींवर वेगाने निर्णय घेण्यात आले.
हा एक मोठा घोटाळा
हा “आणखी मोठा घोटाळा” असू शकतो. ते म्हणाले, “काही लोकांनी अजित पवार यांच्या मृत्यूचा फायदा घेतला. त्यांच्या मृत्यूच्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. राज्यातील ९५% अल्पसंख्याक शाळा बोगस आहेत आणि भ्रष्टाचारात गुंतलेल्या आहेत असा दावा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला आहे.
ते म्हणाले पुढे म्हणाल की,’मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. एसआयटीने शिक्षण विभागातील ६,०००-७,००० लोकांचा सहभाग उघड केला. पण हा त्याहूनही मोठा घोटाळा आहे. आम्ही याची चौकशी करू आणि मकोका अंतर्गत कारवाई करू. मी अजित पवारांशी बोललो तेव्हा ते म्हणाले की केवळ चांगल्या शाळांनाच प्रमाणपत्रे मिळतील. या प्रकरणाची चौकशी सीआयडीने करावी.”
शहर
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
महाराष्ट्र
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.

























Subscribe to my channel



