Atomic शक्तीमुळे बलाढ्य झालेली राष्ट्र स्वतःला काय समजतात? ही पृथ्वी यांच्या मालकीची आहे काय? रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू असतानाच इस्रायल-पॅलिस्टाईन, इराण, अमेरिका यांच्यात सुरू झालेलं हे युद्ध कधी आणि कोण थांबवणार? सैनिकी हल्ल्यांचे व्हिडिओ अतिशय भयावह आहेत. अनेक शहरांमध्ये मृत्यूचे तांडव सुरू आहे. बॉम्ब हल्ल्यांमध्ये इमारती पत्त्याच्या महलासारख्या पडत आहेत. सामान्य नागरिक, स्त्रिया आणि मुले आपले प्राण वाचवण्यासाठी देश सोडून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. किती हे विदारक चित्र आहे!
जगातील सगळ्या जबाबदार राष्ट्रप्रमुखांना यामागील भीषण भविष्य जाणवत नाही का? कुणीतरी या युद्धाला आवरायला हवं आहे. ऑक्सिजन बॉम्ब, फॉस्फरस बॉम्ब, मिसाईल्स, हे चाललंय तरी काय? हे भीषण तांडव थांबवण्यासाठी आता सगळ्या चर्चा आणि राजकारण विफल होताना दिसत आहेत.
जगातील सगळेच देश एकमेकांविरुद्ध उभे राहिले तर भविष्यात काय घडेल, याची कल्पना सुद्धा करवत नाही. युद्धाच्या उंबरठ्यावर संपूर्ण जग उभे आहे. प्रत्येक देशाने आपापली संहारक शस्त्रे उपसली तर काय अनर्थ घडेल? कुणीच कसा हा विचार करत नाही? गेल्या पन्नास-साठ वर्षांत भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी मानवाने आपली अफाट बुद्धिमत्ता वापरून सुखसोयी निर्माण केल्या, मोठमोठ्या टोलेजंग इमारती आणि सुंदर शहरं वसवली; पण मनात एवढी असुया आणि द्वेषभावना ठेवून काय साध्य होणार आहे? आपण स्वतः निर्माण केलेलं स्वतःचंच घर मोडायला निघालो आहोत.
सगळ्या देशांजवळ सध्या अण्वस्त्रांचा साठा कमी-अधिक प्रमाणात आहे. या अण्वस्त्रांचे नक्की काय करणार? तर, एकमेकांविरुद्ध वापरणार, हेच त्याचे एकमेव उत्तर आहे. अण्वस्त्रांनी काय कधी विकासाची कामे केली जातात का? मुळीच नाही! मग स्वतःच्या बचावासाठी संतापाच्या भरात अण्वस्त्रांचा वापर केला तर काय होईल?
तर काय घडेल हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. आज संपूर्ण जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे आणि जर काही सशक्त, सक्षम शांततावादी हात पुढे आले नाहीत, तर मानवाचा हा विनाश अटळ आहे. दुसऱ्या महायुद्धात जगाने रेडिएशनच्या धोक्याचा अत्यंत भयानक अनुभव घेतला आहे. यात केवळ मनुष्यहानीच नाही, तर निसर्गाची अपरिमीत आणि कधीही भरून न निघणारी हानी होणार आहे.
जंगलात प्राण्यांचे आपापसात कधी युद्ध झालेच तर काही प्रमाणात वातावरण ढवळून निघते आणि काही काळातच सगळं पूर्ववत शांत होते; पण मानवाचं आपसातील हे युद्ध मात्र जीव, संपत्ती आणि निसर्गाची कधीही भरून न निघणारी हानी करणारे ठरत आहे. हे युद्ध वेळीच थांबायला हवे.
दोन देशांच्या वैमनस्यातूनच या विनाश पर्वाची सुरुवात होते. जमिनीचा विस्तार, सत्तेचा लोभ किंवा धर्मद्वेष यांसारख्या संकुचित कारणांमुळे जोपासले गेलेले वैमनस्य शेवटी युद्धाच्या अत्यंत दुर्दैवी निर्णयावर येऊन थांबते. युद्ध म्हणजेच विनाश, अथांग मनुष्यहानी, जीवहानी आणि मुख्य म्हणजे युद्धामुळे संपूर्ण निसर्गाची होणारी अपरिमित हानी! डावपेच, सत्तेची हाव आणि क्रौर्य म्हणजेच आजचे युद्ध बनले आहे.
आज युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असलेले युक्रेन, रशिया, चीन, तायवान, इस्रायल, पॅलिस्टाईन, इराण आणि संपूर्ण युरोप यांसारखे अण्वस्त्रधारी देश कोणत्याही परिणामांची पर्वा न करता या युद्धा रुपी विनाशाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहेत. उद्या नक्की काय घडेल याचा विचार करणं सुद्धा अत्यंत भयावह आहे. मनुष्यप्राण्याने एवढा मोठा वैज्ञानिक विकास केला, पण त्याचा शेवट जर असा विनाशात झाला, तर ती मानवाच्या बुद्धीची सर्वात मोठी अधोगती ठरेल.
हे ईश्वरा, या बुद्धीचे वरदान लाभलेल्या मानवाला थोडी सदिच्छा आणि सुबुद्धी दे!
— सुहास सोहोनी
(माझ्या संवेदना)
संपर्क: ९४०५३४९३५४
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



