Atomic शक्तीमुळे बलाढ्य झालेली राष्ट्र स्वतःला काय समजतात? ही पृथ्वी यांच्या मालकीची आहे काय? रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू असतानाच इस्रायल-पॅलिस्टाईन, इराण, अमेरिका यांच्यात सुरू झालेलं हे युद्ध कधी आणि कोण थांबवणार? सैनिकी हल्ल्यांचे व्हिडिओ अतिशय भयावह आहेत. अनेक शहरांमध्ये मृत्यूचे तांडव सुरू आहे. बॉम्ब हल्ल्यांमध्ये इमारती पत्त्याच्या महलासारख्या पडत आहेत. सामान्य नागरिक, स्त्रिया आणि मुले आपले प्राण वाचवण्यासाठी देश सोडून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. किती हे विदारक चित्र आहे!
जगातील सगळ्या जबाबदार राष्ट्रप्रमुखांना यामागील भीषण भविष्य जाणवत नाही का? कुणीतरी या युद्धाला आवरायला हवं आहे. ऑक्सिजन बॉम्ब, फॉस्फरस बॉम्ब, मिसाईल्स, हे चाललंय तरी काय? हे भीषण तांडव थांबवण्यासाठी आता सगळ्या चर्चा आणि राजकारण विफल होताना दिसत आहेत.
जगातील सगळेच देश एकमेकांविरुद्ध उभे राहिले तर भविष्यात काय घडेल, याची कल्पना सुद्धा करवत नाही. युद्धाच्या उंबरठ्यावर संपूर्ण जग उभे आहे. प्रत्येक देशाने आपापली संहारक शस्त्रे उपसली तर काय अनर्थ घडेल? कुणीच कसा हा विचार करत नाही? गेल्या पन्नास-साठ वर्षांत भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी मानवाने आपली अफाट बुद्धिमत्ता वापरून सुखसोयी निर्माण केल्या, मोठमोठ्या टोलेजंग इमारती आणि सुंदर शहरं वसवली; पण मनात एवढी असुया आणि द्वेषभावना ठेवून काय साध्य होणार आहे? आपण स्वतः निर्माण केलेलं स्वतःचंच घर मोडायला निघालो आहोत.
सगळ्या देशांजवळ सध्या अण्वस्त्रांचा साठा कमी-अधिक प्रमाणात आहे. या अण्वस्त्रांचे नक्की काय करणार? तर, एकमेकांविरुद्ध वापरणार, हेच त्याचे एकमेव उत्तर आहे. अण्वस्त्रांनी काय कधी विकासाची कामे केली जातात का? मुळीच नाही! मग स्वतःच्या बचावासाठी संतापाच्या भरात अण्वस्त्रांचा वापर केला तर काय होईल?
तर काय घडेल हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. आज संपूर्ण जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे आणि जर काही सशक्त, सक्षम शांततावादी हात पुढे आले नाहीत, तर मानवाचा हा विनाश अटळ आहे. दुसऱ्या महायुद्धात जगाने रेडिएशनच्या धोक्याचा अत्यंत भयानक अनुभव घेतला आहे. यात केवळ मनुष्यहानीच नाही, तर निसर्गाची अपरिमीत आणि कधीही भरून न निघणारी हानी होणार आहे.
जंगलात प्राण्यांचे आपापसात कधी युद्ध झालेच तर काही प्रमाणात वातावरण ढवळून निघते आणि काही काळातच सगळं पूर्ववत शांत होते; पण मानवाचं आपसातील हे युद्ध मात्र जीव, संपत्ती आणि निसर्गाची कधीही भरून न निघणारी हानी करणारे ठरत आहे. हे युद्ध वेळीच थांबायला हवे.
दोन देशांच्या वैमनस्यातूनच या विनाश पर्वाची सुरुवात होते. जमिनीचा विस्तार, सत्तेचा लोभ किंवा धर्मद्वेष यांसारख्या संकुचित कारणांमुळे जोपासले गेलेले वैमनस्य शेवटी युद्धाच्या अत्यंत दुर्दैवी निर्णयावर येऊन थांबते. युद्ध म्हणजेच विनाश, अथांग मनुष्यहानी, जीवहानी आणि मुख्य म्हणजे युद्धामुळे संपूर्ण निसर्गाची होणारी अपरिमित हानी! डावपेच, सत्तेची हाव आणि क्रौर्य म्हणजेच आजचे युद्ध बनले आहे.
आज युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असलेले युक्रेन, रशिया, चीन, तायवान, इस्रायल, पॅलिस्टाईन, इराण आणि संपूर्ण युरोप यांसारखे अण्वस्त्रधारी देश कोणत्याही परिणामांची पर्वा न करता या युद्धा रुपी विनाशाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहेत. उद्या नक्की काय घडेल याचा विचार करणं सुद्धा अत्यंत भयावह आहे. मनुष्यप्राण्याने एवढा मोठा वैज्ञानिक विकास केला, पण त्याचा शेवट जर असा विनाशात झाला, तर ती मानवाच्या बुद्धीची सर्वात मोठी अधोगती ठरेल.
हे ईश्वरा, या बुद्धीचे वरदान लाभलेल्या मानवाला थोडी सदिच्छा आणि सुबुद्धी दे!
— सुहास सोहोनी
(माझ्या संवेदना)
संपर्क: ९४०५३४९३५४
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



