देशभरात नवनवीन राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि उड्डाणपुलांचे जाळे अतिशय वेगाने पसरवले जात आहे. मात्र, अलीकडच्या काळात अनेक नवनिर्मित महामार्गांवरील कामाचा निकृष्ट दर्जा, उद्घाटनाच्या काही दिवसांतच रस्ते खचणे, रस्त्यांवर मोठे खड्डे पडणे, पावसाळ्यात पाणी साचणे किंवा ड्रेनेज व्यवस्था कोलमडणे यांसारख्या गंभीर समस्या वारंवार समोर येत आहेत. अनेक मोठ्या प्रकल्पांच्या बाबतीत असे दिसून आले आहे की, रस्त्यांची कामे घाईघाईने पूर्ण करून त्यांचे उद्घाटन केले जाते आणि नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा टोल टॅक्स वसूल केला जातो, मात्र काही दिवसांतच प्रवाशांना खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागतो. या सर्व गंभीर बाबींची दखल घेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आता एक महत्त्वपूर्ण आणि जनहितार्थ कडक धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकार घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, आता देशात कोणताही नवा राष्ट्रीय महामार्ग किंवा एक्सप्रेसवे थेट लोकांसाठी खुला केला जाणार नाही किंवा त्याचे थेट उद्घाटन केले जाणार नाही. त्याऐवजी, प्रत्यक्षात लोकार्पण करण्यापूर्वी प्रत्येक नवनिर्मित महामार्गाची कडक 'फिटनेस टेस्ट' (Fitness Test) घेतली जाईल. यासाठी महामार्गावर २ ते ३ महिने 'ट्रायल रन' (Trial Run) किंवा रोड टेस्ट घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, या २ ते ३ महिन्यांच्या चाचणी कालावधीत किंवा महामार्ग पूर्णपणे तंदुरुस्त घोषित होईपर्यंत त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या कोणत्याही वाहनाईकडून टोल कर (Toll Tax) आकारला जाणार नाही, म्हणजेच हा मार्ग पूर्णपणे 'टोल फ्री' (Toll Free) राहील.
या नवीन नियमामागील मुख्य उद्देश कंत्राटदार (Contractors) आणि सल्लागार (Consultants) यांची जबाबदारी निश्चित करणे हा आहे. अनेकदा उद्घाटन झाल्यानंतर रस्त्यात त्रुटी आढळल्यास प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि टोलही भरावा लागतो. मात्र, आता या २ ते ३ महिन्यांच्या चाचणी कालावधीत जर रस्त्याचा एखादा भाग खचला, रस्त्यावर पादचारी किंवा वाहनांच्या वजनामुळे खड्डे पडले, किंवा पाण्याची योग्य निचरा होण्याची व्यवस्था नसल्याचे समोर आले, तर ती सर्व दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदाराला स्वतःच्या खर्चाने तातडीने करावी लागणार आहेत.
जोपर्यंत ही महामार्ग यंत्रणा प्रत्येक तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या कसोटीवर पूर्णपणे खरी उतरत नाही, तोपर्यंत त्यावर टोल वसुलीला मंजुरी दिली जाणार नाही. अलीकडेच काही मोठ्या महामार्ग प्रकल्पांमध्ये उद्घाटनानंतर निर्माण झालेल्या अडचणी पाहता मंत्रालयाने ही पावले उचलली आहेत. या नव्या धोरणामुळे एकीकडे निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर वचक बसणार आहे, तर दुसरीकडे सामान्य वाहनचालक व प्रवाशांना दर्जेदार रस्ते मिळण्यासोबतच सुरुवातीच्या काही महिन्यांत टोलच्या आर्थिक भुर्दंडातून मोठा दिलासा मिळणार आहे.
शहर
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
- नागपूर: "मी दिलेला निर्णय टिकून राहणार; सिब्बलांचे मत म्हणजे न्यायालयाचे मत नाही" एका विधानामुळे कायदेशीर व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
- पुणे: "राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या पक्षासोबत युती करू नये, हेच महाराष्ट्राच्या आणि माझ्या मनातील आहे" हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्ट भाष्य!
महाराष्ट्र
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- रत्नागिरी: चिपळूणमधील दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू! मासेमारीसाठी गेलेले दोघे मित्र बुडाले, गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल


























Subscribe to my channel




