मुंबई: घाटकोपरमध्ये दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई: घाटकोपर येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली. मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक ३ ते ४ घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेमधील मृतांचा आकडा वाढला. आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. घटनास्थळावर बचावकार्य सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पश्चिम येथील चिरागनगर परिसरातील गौशिया चाळीवर दरड कोसळली. मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण साखर झोपेत असताना ३ ते ४ घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुरूवातीला २ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते.

 


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, घाटकोपर पोलिस, वॉर्ड कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मध्यरात्रीपासून घटनास्थळावर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

या दुर्घटनेत ३ ते ४ घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. या घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मृतांच्या नातेवाईकांना ३ लाखांची मदत जाहीर केली. तर जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्वसनाच्या सूचना दिल्या आहेत. दरड कोसळल्यामुळे या ठिकाणी सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेने पावसापूर्वी नागरिकांना तिथून दुसरीकडे राहायला जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. मनपानं नोटीस देऊनही नागरिकांनी दुर्लक्ष केले असल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *