मोठी बातमी! सोलापूर-पुणे हायवेवरील ६० मीटर अंतरातील ढाबे, हॉटेल ६ महिन्यांत हटणार; 'एनएचएआय'कडून नोटिसा, ६ महिन्यांत ४२६ जणांचा अपघाती मृत्यू

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ६० मीटर अंतरातील सर्व ढाबे, हॉटेल्स, खानावळी आणि व्यावसायिक बांधकामे पूर्णत: हटविली जाणार आहेत. वाढते अपघात रोखण्यासाठी आणि रस्ते वाहतूक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय यंत्रणेला कडक निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने (एनएचएआय) बाळे, मोहोळ, मोहोळ-टेंभुर्णी, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-तुळजापूर यासह अन्य महामार्गांलगतच्या अतिक्रमित ढाबे चालकांसह १०० हून अधिक व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत.

 

नियम आणि महामार्गाची सुरक्षितता:

  • सोलापूर-पुणे महामार्गासाठी एकूण ६० मीटर (एकूण २१० फूट) अंतर मोकळे सोडणे बंधनकारक आहे.

  • महामार्गाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी ३० मीटर अंतरात कोणताही ढाबा, खानावळ, हॉटेल किंवा व्यावसायिक बांधकाम असू नये आणि तेथे वाहने देखील थांबवू नयेत, असा स्पष्ट नियम आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 'एनएचएआय'ची यंत्रणा अलर्ट झाली असून, त्या अंतरात बांधकाम केलेल्यांचा सर्व्हे करून नोटिसा बजावल्या जात आहेत.

अपघातांची वाढती संख्या आणि चिंताजनक आकडेवारी:

  • सोलापूर जिल्ह्यातील रस्ते अपघात व अपघाती मृत्यू दिवसेंदिवस वाढ Tत आहेत. गतवर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ७७४ अपघातात ४१३ जणांचा मृत्यू झाला होता.

  • चालू वर्षात अपघात ७६२ झाले, मात्र अपघातांमध्ये वाढ होऊन ४२६ जणांचा मृत्यू (दरमहा सरासरी ४२ मृत्यू) झाला आहे. याशिवाय १ जुलै ते १० ऑगस्टपर्यंत सुमारे ५० जणांचा अपघाती मृत्यू झाला असून, कुर्डुवाडी, टेंभुर्णी, वेळापूर, करमाळा, बार्शी, पंढरपूर ग्रामीण व मोहोळ भागात सर्वाधिक नोंदी आढळल्या आहेत. यातील बहुतेक अपघात महामार्गांवरच झाले असून अनधिकृत बांधकामांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *