जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली

जम्मू-काश्मीर: एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा भीषण दहशतवादी हल्ल्याने हादरले असून, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील केल्लम परिसरात दहशतवाद्यांनी अत्यंत निर्दयीपणे बिगर-काश्मिरी मजुरांना लक्ष्य केले आहे. या भ्याड हल्ल्यामध्ये छत्तीसगडवरून रोजगारसाठी आलेल्या दोन परप्रानतीय मजुरांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुलगाममधील केल्लम परिसरातील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांवर अज्ञात दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये दीपक आणि भूपिंदर अशी दोन्ही मजुरांची नावे असून ते मूळचे छत्तीसगड राज्यातील राहणारे आहेत. हल्ल्यादरम्यान एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मजुराला तत्काळ उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

या अत्यंत निंदनीय आणि  हल्ल्यानंतर दहशतवादी संघटनेने आपली क्रूरता दाखवत या कृत्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तैयबा'ची प्रॉक्सी संघटना असलेल्या 'द रेजिस्टेंस फ्रंट' (TRF) ने या हल्ल्यामागे आपला हात असल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे संपूर्ण परिसराला चोहोबाजूने वेढा घातला आहे. दहशतवाद्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी संपूर्ण भागात व्यापक प्रमाणात कडक सर्च ऑपरेशन आणि घराघरांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरक्षा दलांना आणखी आक्रमकपणे मोहीम राबवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. निरपराध मजुरांवर झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.

 



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *