पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:माता-भगिनींच्या सहवासामुळे‎ कार्यस्थळी अंगणाचा जिव्हाळा‎

भारतीय संस्कृतीत अंगण हे कुटुंबातील एकोप्याचे प्रतीक मानले जाते.‎अनेक साहित्यिकांनी अंगणाला स्त्रीविश्वाचे केंद्र म्हटले. तुळस हे तर‎अंगणाची महाराणी आहे. काही ऋषींनी मनालाही अंगणाचे रूपक दिले.‎तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये लिहिले की— “बरनि न जाइ रुचिर‎अँगनाई, जहँ खेलहिं नित चारिउ भाई.” म्हणजे तेथे चारही भाऊ रोज‎खेळतात. त्या सुंदर अंगणाचे वर्णन शब्दांत करता येत नाही. काकभुशुंडी‎गरुडाला हा प्रसंग सांगतात. श्रीरामांचे अंगणात खेळणे तुलसीदासांना प्रिय‎होते. म्हणूनच त्यांनी “मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदसरथ अजिर‎बिहारी.” ही चौपाई रचली. भावार्थ असा की, हे दशरथांच्या अंगणात विहार‎करणारे प्रभू श्रीरामांनी आमच्या अंगणातही यावे . महिलांच्या‎उपस्थितीमुळे कार्यस्थळाची संस्कृती आपुलकीची बनते. वातावरणाला‎जिव्हाळा लाभतो. भारताच्या एकूण कार्यबलात पुरुषांच्या तुलनेत‎महिलांचे प्रमाण केवळ 10 टक्के आहे. अंगणाच्या प्रेरणेतून देशातील‎महिला कामगारांचा सहभाग वाढविण्याचा सामूहिक संकल्प करावा.‎


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *