Delayed Monsoon Sparks Vegetable Price Surge: Supply Plummets by 40% as Prices Skyrocket

मान्सून खोळंबल्याने भाजीपाला महागला! बाजार समित्यांमध्ये आवक ४० टक्क्यांनी घटली; गृहिणींचे बजेट कोलमडले

Delayed Monsoon Sparks Vegetable Price Surge: Supply Plummets by 40% as Prices Skyrocketजळगाव: यंदा मान्सूनच्या (पावसाच्या) आगमनाला होत असलेला विलंब आणि वाढत्या उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आणि गृहिणींना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पावसाने ओढ दिल्यामुळे बाजारात येणाऱ्या पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक तब्बल ४० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी, बाजारात भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले असून ते थेट आकाशाला भिडले आहेत.

खिसा आणखी सैल करावा लागणार: सध्या पडत असलेले कडक ऊह आणि पाण्याचे आटत चाललेले स्त्रोत यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. पावसाने अशीच ओढ कायम ठेवल्यास आगामी दिवसांत भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आपला खिसा आणखी सैल करावा लागण्याची चिन्हे आहेत.

कोणत्या भाजीचे काय आहेत दर? सध्या बाजारपेठेत बहुतांश फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव तेजीत आहेत. टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, सिमला मिरची आणि भेंडी यांसारख्या महत्त्वाच्या भाज्या थेट ८० रुपये प्रति किलो दराने विकल्या जात आहेत. यासोबतच मेथी, पालक, कोथिंबीर, वांगी आणि कोबीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे दिवसेंदिवस ही भाववाढ वेगाने होत असून, यामुळे सर्वसामान्यांचे मासिक घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *