Death Trap on Wakad-Hinjewadi Service Road? Risk of Fatal Accidents Due to Dangling WiFi Cables; Citizens Demand Immediate Action

पिंपरी-चिंचवड: वाकड-हिंजवडी मार्गावर मृत्यूचे जाळे! रस्त्यावर विखुरलेल्या वायफाय केबल्स, सबवेतील खोल खड्ड्यांमुळे वाहनचालक धोक्यात

Death Trap on Wakad-Hinjewadi Service Road? Risk of Fatal Accidents Due to Dangling WiFi Cables; Citizens Demand Immediate Action
पिंपरी-चिंचवड: मुंबई-पुणे महामार्गालगत वाकड परिसरातील विश्वनाथ हॉटेलपासून पेट्रोल पंप, लाईफपॉईंट हॉस्पिटल मार्गे हिंजवडी पुलापर्यंतच्या सर्व्हिस रोडवर गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी वायफाय केबलचे तुकडे गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत पडून असल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सध्या पावसाळ्याची सुरुवात झाली असून रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत हे केबलचे तुकडे पाण्यावर तरंगत राहिल्यास दुचाकीस्वारांच्या चाकात अडकून गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसात दृश्यमानता कमी असताना हा धोका अधिक वाढू शकतो.

याशिवाय मुंबई-पुणे महामार्गावरील दुभाजकातील वीज खांबांवर हजारो मीटर लांबीच्या वायफाय केबल्स विविध केबल ऑपरेटरकडून अनधिकृतपणे टाकण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. या केबल्स वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे खाली आल्यास वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी हा जीवघेणा धोका ठरू शकतो.

सबवे परिसरातील खड्ड्यांनी वाढवली चिंता

दरम्यान, सखाराम चोखू वाघमारे सबवे परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोल खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. चारचाकी वाहन चालवतानाही वाहनांचे संतुलन बिघडत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यात हे खड्डे पाण्याखाली जात असल्याने त्यांची खोली लक्षात न आल्याने अपघाताचा धोका आणखी वाढणार आहे.

 

प्रशासनाला नागरिकांचे आवाहन

या गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष देत महापालिका प्रशासन, वाहतूक विभाग, आरटीओ आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त कारवाई करून रस्त्यावर पडलेल्या केबल्स हटवाव्यात, अनधिकृत केबल नेटवर्कवर कारवाई करावी तसेच सबवे परिसरातील खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

"अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून आधीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा निष्काळजीपणाची किंमत नागरिकांना जीव गमावून चुकवावी लागू शकते," अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *