शिरूर : पिंपरखेडच्या सौम्या वरे आणि आयुष केदारीची नवोदय विद्यालयात निवड; मराठी शाळांचा दबदबा कायम

पिंपरखेड,(शिरूर) प्रफुल्ल बोंबे (दि. ०८) ; शिरूर तालुक्यातील पिंपरखेड  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड येथील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी सौम्या सुनिल वरे व जांबुत केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फाकटे येथील इयत्ता आयुष नागेश केदारी यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश संपादन करून ग्रामीण भागातील मराठी शाळांचा नावलौकिक वाढविला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.


जवाहर नवोदय विद्यालयातील अवघ्या ८० जागांसाठी तब्बल १,६०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या तीव्र स्पर्धेत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या सौम्या ने तब्बल  ९७.५० %  तर आयुष ने ९६ .२५  % एवढे गुण मिळवत यश प्राप्त करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. सौम्या आणि आयुष हे दोघेही हा अत्यंत हुशार, मेहनती, कष्टाळू आणि हजरजबाबी विद्यार्थी म्हणून ओळखला जातात.

आजच्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या आकर्षणाच्या काळात ग्रामीण भागातील मराठी शाळांमधूनही गुणवंत विद्यार्थी घडत असल्याचे आयुषच्या यशाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मराठी शाळांमध्ये उपलब्ध असलेले दर्जेदार शिक्षण, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे अशा यशकथा घडत असल्याचे शिक्षण क्षेत्रातून सांगितले जात आहे.


सौम्या हिचे वडील सुनिल वरे हे पिंपरखेड येथे नागरी सुविधा केंद्र चालवत आहेत तर आई सारिका वरे या ग्राममहसूल मध्ये कोतवाल म्हणून कार्यरत आहेत. तर आयुषची आई सीमा केदारी या फाकटे गावच्या ग्रामपंचायत सदस्या असून वडील नागेश केदारी हे गुरुनाथ विद्यालय, वडनेर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संस्कारांसह शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आयुषच्या यशामागे महत्त्वाचे ठरले.

त्याला मार्गदर्शन करणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी. सी. बारहाते, लहू गाजरे, पोपट भालेराव तर शिष्यवृत्ती तज्ज्ञ व आदर्श शिक्षक बाबाजी पोपट हिलाळ यांनी गुणवंतांचे विशेष कौतुक केले. तसेच शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्या सुनिता कड, गटशिक्षणाधिकारी प्रितम कोकणे, विस्ताराधिकारी बाळकृष्ण कळमकर, केंद्रप्रमुख गणेश काळे, मुख्याध्यापिका प्रिया काळे तसेच ग्रामस्थांनी सौम्या व आयुषचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.ग्रामीण भागातील मराठी शाळांमधून घडणाऱ्या अशा यशस्वी विद्यार्थ्यांमुळे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळत असून मराठी शाळांबद्दलचा विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *