इतके दिवस हवीहवीशी , सुखकर वाटणारी थंडी हळूहळू राज्यातून गायब होत चालली आहे. महाराष्ट्रात आता उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरूवात झाली आहे. सकाळी जरी थोडाफार गारवा असला तरी दिवस जसजसा वर यायला लागतो तसतसा उकाडा वाढण्यास सुरूवात होताना दिसत आहे. राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने गारठा काहीसा वाढला होता. मात्र थंडी पुन्हा कमी होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. आजपासून म्हणजेच 11 तारखेपासून राज्याच्या किमान तापमानात पुन्हा वाढ होऊ शकते, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यासोबत कमाल तापमानातही वाढ होत असल्याने उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता घामाच्या धारा वाहण्यास सुरूवात होणार आहे.
असं असलं तरीही केंद्रीय हवामानशास्त्र विभाग, आयएमडीकडून मध्य भारतासह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसाचा इशाराही जारी करण्यात आला आहे. पुढील 48 तासांमध्ये केरळासह महाराष्ट्राचा काही भाहग, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणामध्ये पावसाची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
उकाडा वाढतोय घ्या काळजी
राज्यात मुंबईसह परिसरातील थंडी जवळपास पूर्णपणे नाहीशी झाली आहे. येत्या काळात वातावरणात तीव्र बदल दिसेल. सकाळी जाणवणारा गारवा आता लुप्त होत जाईल आणि दुपारी चांगलाच उकाडा जाणवेल. हवामान कोरडं आणि निरभ्र राहील. कमाल तापमान सुमारे 32 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहील, तर किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पुढील काही दिवसांतही उष्णतेची तीव्रता अशीच राहू शकते.
तापमानातील चढउतार नवे नसले तरी अचानक होणाऱ्या बदलांमुळे शरीराला त्रास होऊ शकतो. तापमान वाढ सुरू झाली असून कमाल तापमान सातत्याने वर चढताना दिसेल. हळहूळ उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून उष्माही चांगलाच जाणवायला लागला आहे. त्यामुळे हवामानातील या बदलांचा आरोग्यावर होणारा परिणाम पाहता, नागरिकांनी जपून रहाव, प्रकृती, आरोग्य जपावे असा सल्ला यंत्रणांनी दिला आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




